शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी मिळाली, आता विरोधी पक्षांनी सुदृढ व्हावे!

By विजय दर्डा | Updated: March 19, 2018 01:18 IST

अलीकडेच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाने विरोधी पक्षांना नक्कीच आशेचे किरण दिसू लागले आहेत. जनता भाजपा सरकारविषयी खूश नाही व त्याचेच प्रतिबिंब या पोटनिवडणुकांमध्ये उमटले, याची खूणगाठ विरोधी पक्षांना पटली आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाने विरोधी पक्षांना नक्कीच आशेचे किरण दिसू लागले आहेत. जनता भाजपा सरकारविषयी खूश नाही व त्याचेच प्रतिबिंब या पोटनिवडणुकांमध्ये उमटले, याची खूणगाठ विरोधी पक्षांना पटली आहे. त्रिपुराची गोष्ट वेगळी आहे. कारण तेथील २५ वर्षांच्या डाव्या सरकारवर लोक नाराज होते व तेथे भाजपाला घट्ट पाय रोवू देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठी भूमिका बजावली. त्यामुळे त्रिपुरातील विजयाचे श्रेय भाजपाकडे नव्हे तर संघाकडे जाते! इकडे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सामील असलेल्या मित्रपक्षांशी भाजपाचे वागणे ठीक नाही. एकेकाळी अडचणीच्या वेळी साथ देणारी शिवसेना नाराज आहे आणि तेलगू देसम पक्ष तर आघाडीतून सरळ बाहेर पडला आहे.भ्रष्टाचारमुक्ती, उत्तरदायी प्रशासन, युवकांना रोजगार, विदेशांत गेलेला काळा पैसा परत आणून त्यातील १५ लाख रुपये प्रत्येक गरिबाच्या खात्यात जमा करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देणे आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी अनुकूल वातावरण यासारख्या मुद्यांवर भाजपा सरकार केंद्रात सत्तेवर आले. लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मते दिलीत, हेही लक्षात घ्यायला हवे. मोदींच्याच करिश्म्यावर नंतर अनेक राज्यांमध्येही भाजपाची सरकारे स्थापन झाली. पण ज्या गोष्टींचे गाजर दाखवून मते घेतली त्यांचे काय, असे आता जनता विचारू लागली आहे. २ जी स्पेक्ट्रम वाटपातील कथित घोटाळ््याचे प्रकरण कापरासारखे हवेत उडून गेले आहे. सर्व आरोप निराधार ठरून सर्व आरोपी निर्दोष ठरले आहेत. त्याच काळात भाजपाने गवगवा केलेल्या इतरही प्रकरणांची अशीच अवस्था होणार आहे, कारण मुळातच त्या आरोपांमध्ये काही सत्यता नव्हती. दुसरीकडे भाजपाच्या कार्यकाळातील हजारो कोटी रुपयांचे नवनवे बँक घोटाळे रोज समोर येत आहेत. एखाद्या सामान्य माणसाला बँकेकडून कर्ज मिळविताना किती अडचणी येतात, हे आपण सगळेच जाणतो. मग एखादा नीरव मोदी किंवा मेहुल चोकसी बँकांना हजारो कोटींनी फसवून कसा काय सहीसलामत देशाबाहेर निघून जाऊ शकतो, असा प्रश्न साहजिकच सामान्य जनतेला पडतो. असेही समजते की, असे ३३ लोक बँकांची फसवणूक करुन मोठी रक्कम हडपून देशातून फरार झाले आहेत.गरिबांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? किती बेरोजगारांना नोकºया मिळाल्या? छोट्या आणि मध्यम उद्योगांची स्थिती आजही हलाखीची का आहे, याचाही लोक विचार करू लागले आहेत. जीएसटीने कंबरडे मोडले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्ट नकारात्मक आहेत व त्यातूनच जनता भाजपा सरकारपासून दुरावत चालली आहे, हे विरोधी पक्षांना स्पष्ट जाणवत आहे. पोटनिवडणुकांच्या निकालांनी हेच दाखविले आहे. मोदींचे राज्य असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही सत्ता टिकवून ठेवताना भाजपाच्या नाकीनऊ आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरविणेही शक्य आहे, पण त्यासाठी एकजूट करणे अपरिहार्य आहे, याचीही पक्की जाणीव विरोधी पक्षांना झाली आहे. त्यासाठी मतांचे विभाजन रोखावे लागेल. याच जाणिवेतून उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव व मायावती यांनी हातमिळवणी केली आणि गेली ३० वर्षे भाजपाच्या एकछत्री ताब्यात असलेली गोरखपूरची जागा त्यांना जिंकता आली. फूलपूरमध्येही विरोधी पक्षांनी बाजी मारली. म्हणजेच विरोधकांनी एकी केली तर निवडणुकीत भाजपाला धूळ चारणे अशक्य नाही. मग २०१९ साठी विरोधी पक्ष खरंच हाच मार्ग पकडून एकजूट करू शकतील का, हा प्रश्न आहे. एकजुटीच्या प्रसववेदना भाजपेतर पक्ष कशा आणि कितपत सहन करतील याचे उत्तर काळ देईलच. सर्वांनी एकजुटीच्या आणाभाका घेतल्या तरी प्रत्यक्षात त्या नवजात अर्भकाचे हे पक्ष पालनपोषण करून त्याला निवडणुकीतील यशाच्या तारुण्याकडे नेऊ शकतील का? एकजुटीच्या झाडाला फळ आले तरी त्याची शेवटपर्यंत जपणूक केली जाईल का? अशा एकजुटीतूनच खरी लोकशाही जन्माला येईल का, यासारख्या अनेक प्रश्नांनी सामान्य माणसाच्या मनात कल्लोळ सुरू आहे.याहूनही महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विरोधी पक्षांच्या या ऐक्याचे पालकत्व कोण स्वीकारणार? किंबहुना विरोधी पक्षांच्या ऐक्याला ज्याने खो बसू शकतो, तो नेमका हाच मुद्दा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) स्थापन झाली तेव्हा सर्व पक्षांनी मिळून सोनिया गांधींचे अध्यक्ष म्हणून नेतृत्त्व मान्य केले होते. एवढेच कशाला या पक्षांनी सोनियाजींना पंतप्रधानपदाची खुर्चीही देऊ केली होती. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत व विरोधी पक्ष आपापल्या कसोटीवर त्यांना तोलत आहेत. गेल्याच आठवड्यात सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांना रात्री जेवणासाठी निमंत्रित केले. एकूण २० पक्षांचे नेते तेथे गेले. परंतु अखिलेश यादव, मायावती व ममता बॅनर्जी स्वत: गेले नाहीत. मी येथे लालूप्रसाद यादव यांचे नाव अवश्य घेईन. एकेकाळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले. ते सशक्त नेते होते तरी स्वत: बाजूला राहून त्यांनी देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान केले होते.आज देशाला विरोधी पक्षांकडून अशाच त्यागाची अपेक्षा आहे. या सर्वांमध्ये देशाच्या कानाकोपºयात पाळेमुळे असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सर्व मतभेद विसरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला हवे. राहुल गांधी यांनाही आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, असे सोनियाजींच्या रात्रभोजनानंतर ते म्हणाले. एवढेच नव्हे गेल्या आठवड्यात राहुल गांधी शरद पवार यांनाही भेटले. सन २०१९ च्या निवडणुकीत विरोधी पक्षांची खरोखरच एकी झाली तर भाजपाची स्थिती कठीण होईल. परंतु नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजकारणातील जोडी जादुई आहे व ऐनवेळी फासे पलटविण्यात ते माहीर आहेत, हेही विरोधी पक्ष जाणून आहेत.हे लिखाण संपविण्यापूर्वी...केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. नेमबाजीत भारताचे नाव संपूर्ण जगात गाजविणाºया अनीष भानवाला यांना इयत्ता १० च्या तीन विषयांची परीक्षा नंतर देण्याची मुभा या मंडळाने दिली आहे. सीबीएसईची १० वीची नियमित परीक्षा होईल तेव्हा अनीष विविध स्पर्धांसाठी परदेशात असणार आहेत. एरवी खेळायला परदेशी गेल्यावर त्यांना परीक्षा देता आली नसती. परंतु त्यांना सीबीएसईने नंतर परीक्षा देण्याची खास परवानगी दिली आहे. अनेक वेळा नामवंत खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमुळे परीक्षेस मुकावे लागते. पण अशा खेळाडूंसाठी या निर्णयाने नवा मार्ग खुला होणार आहे.(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)