शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

साहेब, आपलं नेमकं काय चाललंय?

By अतुल कुलकर्णी | Updated: February 21, 2018 06:18 IST

आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय.

प्रिय उद्धवराव ठाकरेजी,जय महाराष्टÑ,आपण भाजपावाल्यांना सुनावले आणि स्वतंत्र लढण्याचा आपल्या पक्षाचा ठराव केला. त्यामुळे गावागावात शिवसैनिकांमध्ये एकदम दांडगा उत्साह संचारलाय. हल्ली भाजपाचा कार्यकर्तासुध्दा आपल्या आॅफिससमोरून जाण्याची हिंमत करत नाही. भाजपाने आपल्याला गृहित धरून वागायचं म्हणजे काय गंमत आहे का साहेब? आपण खरं तर यांचे मोठे बंधू. पण ते स्वत:ला मोठा भाऊ मानायला लागले. लहान भावाने मोठ्या भावाची कापडं घातली म्हणून काय तो मोठा भाऊ होतो का साहेब? शेवटी आपणच मोठे आहोत हे खडसावून सांगायची वेळ आलीच. (खडसावून म्हणजे खडसेंचा काही संबंध नाही बरं का साहेब. उलट तुम्ही म्हणालात तर ते आपल्याकडे येतीलही...) बरं झालं तुम्ही आपल्या पक्षाच्या बैठकीत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर करुन टाकली ते. नाहीतर पुन्हा २०१४ सारखं व्हायचं. भाजपावाल्यांचा काही भरवसा नाही साहेब, आयत्यावेळी हे सांगतील की एवढ्याच जागा देतो, नाहीतर स्वतंत्र लढतो. त्यावेळी शोधाशोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तयारी केलेली बरी.कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही हे सांगायला तुम्ही मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटला. लगेच कुजबुजी सुरू झाल्या. आपले खा. संजय राऊत. शरद पवारांना जे हवं तेच ते बोलतात. मिलिंद नार्वेकर पूर्वी सतत मुख्यमंत्र्यांकडे जायचे. आता त्यांना पक्षाचं पद दिलं ते बरं झालं. त्यामुळे तरी ते तिकडे गेल्यास अधिकृत कामासाठी गेले असं बोलता येईल. तेवढ्याच अफवा थांबतील.पण आणखी बºयाच अफवा आहेत साहेब. परवा दादासाहेब भेटले. ते सांगत होते, की भाजपा-शिवसेनेतील भांडणं ही लुटूपुटूची आहेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो हे तुम्ही ठरवून करत आहात असाही त्यांचा आक्षेप होता. त्यासाठी त्यांनी काही तर्कही दिले. त्यांच्या मते तुम्ही दोघं आतून एकच आहात. बाहेर मात्र तुमच्यात फार पटत नाही असं तुम्ही मुद्दाम दाखवता. याआधी तुमच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्याची घोषणा केली होती. खिशात ठेवलेले राजीनामेही दाखवले होते. पुढे काय झाले त्यांचे...?नंतर कर्जमाफीवरून देखील आम्हाला या असल्या सरकारमध्ये रहायचे नाही असेही तुम्ही घोषित केले होते. मात्र त्याचेही पुढे काहीच झाले नाही. नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमावर तुम्ही बहिष्कार टाकणार असं तिकडे ठाण्यात आपल्या पक्षाने जाहीर केलं, मात्र ठाण्याचेच मंत्री एकनाथ शिंदे स्वत:च तिकडे हजर होते म्हणे... शिवाय आपले मंत्री सुभाष देसाई देखील बीकेसीमध्ये झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ कार्यक्रमात व्यस्त होते. मग आपला बहिष्कार होता की नाही...?२०१७ हे या सरकारमध्ये राहण्याचं शेवटचं वर्ष असेल असं आपले नेते आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं होतं. आता २०१८ चे दोन महिने संपत आले. काहीच झालं नाही. उलट याच वर्षात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी वर्षावर बंद दाराआड चर्चाही केलीत... त्यामुळे नेमकं काय चालू आहे ते काही केल्या कळत नाही असंही ते म्हणत होते. त्यामुळे आमचा पार केमिकल लोचा झालाय. काय करावं ते जरा सांगता का? आपण नेमकं कुठं आहोत हे जरा समजावून सांगता का साहेब...-अतुल कुलकर्णी

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे