शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 09:28 IST

एक लाख रुपये भरल्यावर दरमहा तीन हजार रुपये व्याज आणि ३६ महिन्यानंतर एक लाख रुपये मुद्दल परत! - हा धुमाकूळ राज्यात पुन्हा सुरू झाला आहे !!

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुण्यापासून नाशिक ते अगदी नागपूरपर्यंत गेल्या काही महिन्यांत दामदुप्पट गुंतवणूक योजनांचा धुमाकूळ सुरू आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये व्याजापोटी मिळणार आणि ३६ महिन्यानंतर पुन्हा एक लाख रुपये मुद्दल परत मिळणार असे ढोबळमानाने या योजनांचे स्वरुप असते (आकडे थोडे मागे-पुढे इतकेच). वेगवेगळ्या नावाने किमान पाच ते सहा कंपन्या अशी गुंतवणूक करून घेत आहेत. आम्ही शेअर मार्केटमधील चढ-उताराचा अभ्यास करून  फायदा मिळवतो व त्याचा लाभ कोरोनाने हतबल झालेल्या लोकांना मिळवून देतो असे त्यांचे मार्केटिंग आहे. त्यांच्या या फसवणुकीच्या तंत्राला लोक मोठ्या संख्येने बळी पडले आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान एक हजार कोटींची गुंतवणूक या योजनांमध्ये झाल्याचा अंदाज आहे. या योजनांची भुरळ पडलेला वर्ग मुख्यत: सुशिक्षित आहे. शिक्षक, सरकारी नोकरदार, डॉक्टरांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनीच त्यामध्ये गुंतवणूक केली आहे. बँका, पतसंस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, शिक्षक बँकेकडून कर्जे आणि खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन लोकांनी यामध्ये गुंतवले आहेत. दागिने विकूनही गुंतवणूक झाली आहे.  समाजातल्या मोठ्या वर्गाला कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याची हाव आहे. ती हावच या कंपन्यांनी कॅश केली आहे. या कंपन्या कोण चालविते, ते पैसा कशात गुंतवतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात परतावा कशातून मिळतो याची कोणतीही चौकशी न करता मेंढरासारखी गावेच्या गावे या कंपन्यांच्या मागे पळतात. अशा योजनांमध्ये सुरुवातीला आकर्षक परतावा दिला जातोच. त्यामुळे अमक्याला एवढे पैसे मिळाले, मग, मी मागे का राहू म्हणून पैसे गुंतवणूक करण्यासाठी झुंबड उडते. छोट्या गावांतून दीड-दोन कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक जमा करून दिल्यास चक्क सहा लाखांची गाडी भेट दिली जात आहे. जंगी पार्ट्या, हैदराबादची विमान सफर, मोटारसायकली भेट असे  भुरळ घालणारे  विश्व या कंपन्यांकडून उभे केले गेले आहे. अनेक शिक्षक  शाळा सोडून ही गुंतवणूक गोळा करण्याच्या मागे लागले आहेत. यात महिलांची गर्दी मोठी ! पिअरलेस, कल्पवृक्ष, संचयनी, जपान गादी, पॅनकार्ड क्लब, समृद्ध जीवन अशा  अनेक कंपन्यांनी आजवर वेगवेगळ्या नावाने फसव्या योजना आणल्या. त्यातून लोकांची लुबाडणूक झाली. ज्यांनी कंपन्या काढल्या ते डल्ला मारून गब्बर झाले व गुंतवणूकदार आयुष्यातून उठले. आतापर्यंत अशा अव्यवहार्य आमिषापोटी ज्यांनी आयुष्याची पुंजी पणाला लावली त्यांना एखादा अपवाद वगळता काहीही परत मिळालेले नाही. पुढे दरी आहे हे माहीत असतानाही लोक त्यात उड्या घेत असल्याचा जुनाच अनुभव नव्याने येत आहे. ज्यांनी आतापर्यंत फसवणूक केली, त्यांनीच नव्याने या कंपन्या सुरु केल्या आहेत. म्हणजे लोक तेच आहेत फक्त कंपन्यांची नावे नवीन व फसवणुकीचे तंत्र वेगळे ! आता जी गुंतवणूक होत आहे, त्यास कसलाही कायदेशीर आधार नाही. तीन वर्षात दामदुप्पट व्याज देणारी जगात एकही वित्तीय संस्था नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लगेच पैसे दुप्पट होत असते तर, सर्वजण कष्टाची कामे सोडून शेअर मार्केटमध्येच पैसे कमवत राहिले असते; पण, पैशाची हाव अनावर असलेल्यांना हे सांगणार कोण?, एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला द्यायचे असतात... जेव्हा पुढचा देणारा बंद होतो तेव्हा मागच्यांचे मिळत नाहीत असा हा साधा सरळ व्यवहार आहे आणि आताही तसेच होणार आहे परंतु या घडीला त्याचे कुणाला सोयरसुतक नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची राजरोस फसवणूक सुरु असताना संबंधित सरकारी यंत्रणांनीही डोळ्यावर झापड बांधले आहे. कुणाची तक्रार नाही म्हणून सारेच हातावर घडी घालून  बसले आहेत.  या फसवणुकीचा फुगा फुटल्यावर त्यातून सामाजिक स्वास्थ हरवून जाईल याचे भान त्यांना नाही.  राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी