शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई जागांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील मुलांसाठी राखीव ठेवलेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत, तर त्या इतर मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी, खासगी शाळांच्या संघटनेने केली आहे.

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील मुलांसाठी राखीव ठेवलेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत, तर त्या इतर मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी, खासगी शाळांच्या संघटनेने केली आहे. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून, महाराष्ट्र इंग्रजी शाळा विश्वस्त संघटना म्हणजेच ‘मेस्टा’ने हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. १५ वर्षांपूर्वी राज्यघटनेत दुरुस्ती करून, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार बनविण्यात आला. पुढे २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या शिक्षण हक्क कायद्यामुळे प्रत्येक मुलाला मोफत आणि अनिवार्यरीत्या शिक्षण मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. या कायद्यान्वये गोरगरिबांच्या मुलांसाठीही महागड्या खासगी शाळांची प्रवेशद्वारे उघडली; मात्र नावाजलेल्या खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या जागांवरील प्रवेशासाठी प्रचंड मारामारी होत असताना, दुसरीकडे अनेक शाळांमधील राखीव जागा रिक्तच राहतात. त्या जागा भरू देण्याची मागणी करताना, जागा रिक्त राहण्यामागची कारणे काय, याचे आत्मपरीक्षणही ‘मेस्टा’च्या सदस्यांनी करायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे मोफत शिक्षण असूनही अशा शाळांकडे विद्यार्थी फिरकत नसतील, तर शुल्क अदा करून कोण प्रवेश घेणार? यातली ग्यानबाची मेख ही आहे, की मंजूर पटसंख्येपैकी जागा रिक्त राहिल्यास, मंजूर तुकड्यांची संख्या घटते आणि मग त्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्याही कमी होऊन, शाळा संचालकांचे सारे ‘अर्थकारण’च बिघडते. राखीव जागा रिक्त राहात असल्यास, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची ‘मेस्टा’ची मागणी प्रथमदर्शनी योग्य आहे. अशारीतीने जागा रिक्त ठेवणे म्हणजे उपलब्ध पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अपव्ययच! भारतासारख्या विकसनशील देशाला असा अपव्यय परवडू शकत नाही. त्यामुळे ‘मेस्टा’च्या मागणीचा विचार व्हायलाच हवा. फक्त रिक्त राहिलेल्या जागा खरोखर भरल्या की केवळ कागदावर, याची खातरजमा व्हायला हवी. खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या जागांसाठीचे शुल्क सरकारने शाळांना अदा केलेले नसल्याच्या ‘मेस्टा’च्या आरोपात तथ्य आहे. तो सरकारचा गंभीर प्रमाद आहे. शिक्षणमंत्र्यांनी त्यामध्ये तातडीने लक्ष घालायला हवे. त्याचवेळी शाळा हा इतर व्यवसायांसारखा केवळ नफा कमाविण्यासाठी थाटलेला व्यवसाय नाही, तर ते एक ‘नोबेल प्रोफेशन’ आहे, याची जाणीव शाळा संचालकांनीही ठेवायला हवी.

टॅग्स :Studentविद्यार्थी