शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आरटीई जागांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील मुलांसाठी राखीव ठेवलेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत, तर त्या इतर मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी, खासगी शाळांच्या संघटनेने केली आहे.

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यान्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील मुलांसाठी राखीव ठेवलेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत, तर त्या इतर मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी, खासगी शाळांच्या संघटनेने केली आहे. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून, महाराष्ट्र इंग्रजी शाळा विश्वस्त संघटना म्हणजेच ‘मेस्टा’ने हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. १५ वर्षांपूर्वी राज्यघटनेत दुरुस्ती करून, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार बनविण्यात आला. पुढे २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या शिक्षण हक्क कायद्यामुळे प्रत्येक मुलाला मोफत आणि अनिवार्यरीत्या शिक्षण मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. या कायद्यान्वये गोरगरिबांच्या मुलांसाठीही महागड्या खासगी शाळांची प्रवेशद्वारे उघडली; मात्र नावाजलेल्या खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या जागांवरील प्रवेशासाठी प्रचंड मारामारी होत असताना, दुसरीकडे अनेक शाळांमधील राखीव जागा रिक्तच राहतात. त्या जागा भरू देण्याची मागणी करताना, जागा रिक्त राहण्यामागची कारणे काय, याचे आत्मपरीक्षणही ‘मेस्टा’च्या सदस्यांनी करायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे मोफत शिक्षण असूनही अशा शाळांकडे विद्यार्थी फिरकत नसतील, तर शुल्क अदा करून कोण प्रवेश घेणार? यातली ग्यानबाची मेख ही आहे, की मंजूर पटसंख्येपैकी जागा रिक्त राहिल्यास, मंजूर तुकड्यांची संख्या घटते आणि मग त्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्याही कमी होऊन, शाळा संचालकांचे सारे ‘अर्थकारण’च बिघडते. राखीव जागा रिक्त राहात असल्यास, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची ‘मेस्टा’ची मागणी प्रथमदर्शनी योग्य आहे. अशारीतीने जागा रिक्त ठेवणे म्हणजे उपलब्ध पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अपव्ययच! भारतासारख्या विकसनशील देशाला असा अपव्यय परवडू शकत नाही. त्यामुळे ‘मेस्टा’च्या मागणीचा विचार व्हायलाच हवा. फक्त रिक्त राहिलेल्या जागा खरोखर भरल्या की केवळ कागदावर, याची खातरजमा व्हायला हवी. खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या जागांसाठीचे शुल्क सरकारने शाळांना अदा केलेले नसल्याच्या ‘मेस्टा’च्या आरोपात तथ्य आहे. तो सरकारचा गंभीर प्रमाद आहे. शिक्षणमंत्र्यांनी त्यामध्ये तातडीने लक्ष घालायला हवे. त्याचवेळी शाळा हा इतर व्यवसायांसारखा केवळ नफा कमाविण्यासाठी थाटलेला व्यवसाय नाही, तर ते एक ‘नोबेल प्रोफेशन’ आहे, याची जाणीव शाळा संचालकांनीही ठेवायला हवी.

टॅग्स :Studentविद्यार्थी