शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रोहितच्या जातीचे राजकारण करतो कोण ?

By admin | Updated: February 10, 2016 04:31 IST

रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे प्रकरण केंद्र व आंध्र सरकारांएवढेच भाजपा आणि संघ परिवारालाही दीर्घकाळ भेडसावत राहणारे आहे. रोहित हा दलित होता की नाही असे फाजील प्रश्न पु

रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे प्रकरण केंद्र व आंध्र सरकारांएवढेच भाजपा आणि संघ परिवारालाही दीर्घकाळ भेडसावत राहणारे आहे. रोहित हा दलित होता की नाही असे फाजील प्रश्न पुढे करून त्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वेधण्याचा त्या साऱ्यांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट येणारा आहे. रोहित दलित नसेल तर त्याला अशी आत्महत्त्या करू द्यायची असते काय, हा या फसव्या युक्तिवादातून पुढे येणारा प्रश्न आहे आणि तो दलितांएवढाच सवर्णांच्या संतापालाही कारणीभूत ठरणारा आहे. रोहित एक बुद्धिमान तरूण होता. त्याने लिहून ठेवलेले अखेरचे पत्र त्याची बौद्धिक उंची व महत्त्वाकांक्षा पटवून देणारे होते. अशा विद्यार्थ्यावर आत्महत्त्येची पाळी आणणे हाच मुळात एक मोठा अपराध आहे. तो दलित होता की सवर्ण हा भेदमूलक विचार या प्रश्नावर पाणी फिरवणारा आहे. मग तो विचार केन्द्रीय मंंत्रिमंडळातील स्मृती इराणी यांनी विचारलेला असो वा सुषमा स्वराज यांनी. आत्महत्त्या करणे भाग पडणाऱ्या विद्यार्थ्याची वा नागरिकाची जात महत्त्वाची असते की त्याचा जीव? आपले दुर्दैव हे की आपला सामाजिक विचार जातीपाशी सुरू होतो आणि तो जातीबाहेर जातही नाही. मारणाऱ्याची जात, मरणाऱ्याची जात, आत्महत्त्या करणाऱ्याची वा ती करायला भाग पाडणाऱ्यांची जात मरणाऱ्याच्या मृत्यूहून मोठी ठरत असेल तर आपले सामाजिक गैरवास्तव आणखी दीर्घकाळ असेच राहणार आहे हे लक्षात येते. दुर्दैवाने राजकारणातून सामाजिक आचार व अर्थविचार बाद होण्याचे व त्यांची जागा जात आणि धर्म या राजकारणबाह्य मतांनी घेण्याचे दिवस अद्याप संपले नाहीत. दिल्लीत नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून तर त्यांना जास्तीचे भरते आले आहे. खरेतर रोहित वेमुला याची जात कोणती हा प्रश्न या साऱ्या गदारोळात पुढे येण्याचेच काही कारणच नव्हते. परंतु संघ परिवार आणि त्याच्या संघटना यांना प्रत्येकच गोष्टीला जातीचा वा धर्माचा रंग देण्याचा सराव असल्यामुळे त्याने या मानवी व राष्ट्रीय प्रश्नाला जातीय बनविण्याचे राजकारण सध्या चालविले आहे. परिणामी राहुल गांधींनी रोहितच्या जन्मदिनी केलेले उपोषण हाही त्या परिवाराला ‘राजकीय फार्स’च वाटला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याला, मंत्र्याला, प्रवक्त्याला वा कार्यकर्त्याला रोहितच्या परिवाराला भेट देण्याची इच्छा वा हिंमत न होणे ही एकच बाब या प्रकरणाला जातीय राजकारणाचा रंग कोण देत आहे हे सांगायला पुरेशी आहे. दुर्दैवाने आपल्यातील दलितांमध्येही अनेक जाती आहेत आणि त्या प्रदेशवार वेगळ््या आणि विभागल्या आहेत. त्यामुळे हैदराबादच्या रोहितचे दलित असणे हे एका वेगळ््या दलित समूहाचे असू शकते एवढे साधे ज्ञानही आपल्या केंद्रीय लोकांना असू नये हीच आश्चर्याची बाब आहे. एक गोष्ट मात्र खरी, रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येने देशभरातील सर्व जातींच्या दलितांएवढेच सवर्णांमधील उदारमतवादी व पुरोगामी विचाराच्या लोकानाही एकत्र आणण्याचे व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम नक्कीच केले आहे. रोहितच्या आत्महत्त्येची सर्वाधिक जबाबदारी शिरावर असलेल्या हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला स्वच्छ नकार दिला असला तरी तेथील प्र-कुलगुरुंनी मात्र दीर्घकालीन रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्या विद्यापीठातील २० हून अधिक ज्येष्ठ प्राध्यापकांनी त्यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या या प्रकरणामुळे सोडल्या आहेत. एका तरुण विद्यार्थ्यासाठी साऱ्या देशाचे राजकारण ढवळून निघते, एका विद्यापीठासह राज्य व केंद्र सरकार अपराध्याच्या कठड्यात उभे राहते, त्यांच्या परिवाराला बचावासाठी चोरटी कारणे शोधावी लागतात आणि कोणत्याही प्रश्नावर एकत्र न येणारे देशातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष एकत्र आलेले दिसतात ही बाब देशाच्या राजकारणात व समाजकारणात प्रथमच घडत असलेली आपण पाहात आहोत. काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, जदयू, बसप व रिपब्लिकन पक्ष यासह अनेक सामाजिक व राजकीय संघटना या प्रश्नाचा निकाल लावून घेण्यासाठी आता एकत्र आल्या आहेत. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना जोवर शिक्षा होत नाही आणि त्यांना पाठीशी घालण्याचे पाप करणारे त्याचे प्रायश्चित्त जोवर घेत नाहीत तोवर हा प्रश्न असाच धगधगत राहणार आहे. झालेच तर या प्रकरणात भाजपा व संघ परिवार हा एकाकी पडला असून त्यालाच रोहित वेमुलाच्या आत्महत्त्येचे पातक स्वीकारावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी रोहितच्या जन्मदिनी उपोषण केले या गोष्टीचा आपल्या बाजारू व प्रचारी राजकारणासाठी उपयोग करणे त्याला पुरेसे नाही. तसाही देशाच्या समाजकारणात व राजकारणात सूड घेणाऱ्या खुनी वृत्तीने प्रवेश केला आहे. आतापर्यंत त्याची लागण महाराष्ट्रात, कर्नाटकात, उत्तर प्रदेशात आणि मध्य प्रदेशात होती. आता ती आंध्र प्रदेशासारख्या दाक्षिणात्य राज्यातही पोहोचली आहे आणि तिचे स्वरुप कमालीचे संतापजनक व निंदनीय आहे.