शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

डोंग्याचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:39 IST

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो.

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. भंडारा जिल्ह्यात नदी ओलांडण्यासाठी आजही प्राचीन डोंग्याचाच वापर केला जातो. अधिकृत नसलेल्या या डोंग्याचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतला असला तरी अद्याप डोंगा बंद झाला नाही. पुरेशा सुविधा नसल्याने मजुरांसह विद्यार्थीही नदी ओलांडण्यासाठी याचाच आधार घेत असल्याचे आजही जाणवते. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे. एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप आल्याने डोंगा हाच एकमात्र पर्याय उरतो. गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणाकरिता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागते. यासाठी त्यांचा डोंग्याने प्रवास सुरू असतो. डोंगा जीवघेणा आहे, तरी त्यातून प्रवास करणे ही ग्रामीण भागातील नागरिकांची अगतिकताच. यापूर्वी १७ जुलै २०११ रोजी भंडारा येथे डोंगा उलटून तब्बल ३५ महिलांचा जीव गेला होता. तर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे १३ जणांना प्राणाला मुकावे लागले. या दोन्ही घटना जिल्हा प्रशासनाच्या गचाळ कारभाराला मोठी चपराक असली तरी त्यातून प्रशासनाने काहीही बोध घेतलेला नाही. हा जीवघेणा प्रवास नियमितपणे सुरू आहे. या घटनांनंतर प्रशासनाने डोंगा घाटांचा नियमानुसार लिलाव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजही अनेक डोंगा घाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी कुणीही डोंगा तयार करतो आणि नागरिकांना ने-आण करण्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू करतो. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातील नागरिक अंभोरा घाटातून भंडारा जिल्ह्यात येतात. मात्र डोंग्याने प्रवास करू नका, एवढा सल्ला देण्यातच जिल्हा प्रशासन धन्यता मानते. लोकप्रतिनिधीही फारसे लक्ष देत नाही. डोंग्याचा प्रवास थांबवायचा असेल तर पुलांची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या लहान गावांतील बोटावर मोजण्याइतपत मतांकडे कानाडोळा केला जातो. काही मते मिळविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च पुलाच्या बांधकामावर करणे परवडणारे नसल्याने डोंग्याचा जीवघेणा प्रवास दरवर्षी असाच सुरू असतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या