शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंग्याचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:39 IST

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो.

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. भंडारा जिल्ह्यात नदी ओलांडण्यासाठी आजही प्राचीन डोंग्याचाच वापर केला जातो. अधिकृत नसलेल्या या डोंग्याचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतला असला तरी अद्याप डोंगा बंद झाला नाही. पुरेशा सुविधा नसल्याने मजुरांसह विद्यार्थीही नदी ओलांडण्यासाठी याचाच आधार घेत असल्याचे आजही जाणवते. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे. एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप आल्याने डोंगा हाच एकमात्र पर्याय उरतो. गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणाकरिता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागते. यासाठी त्यांचा डोंग्याने प्रवास सुरू असतो. डोंगा जीवघेणा आहे, तरी त्यातून प्रवास करणे ही ग्रामीण भागातील नागरिकांची अगतिकताच. यापूर्वी १७ जुलै २०११ रोजी भंडारा येथे डोंगा उलटून तब्बल ३५ महिलांचा जीव गेला होता. तर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे १३ जणांना प्राणाला मुकावे लागले. या दोन्ही घटना जिल्हा प्रशासनाच्या गचाळ कारभाराला मोठी चपराक असली तरी त्यातून प्रशासनाने काहीही बोध घेतलेला नाही. हा जीवघेणा प्रवास नियमितपणे सुरू आहे. या घटनांनंतर प्रशासनाने डोंगा घाटांचा नियमानुसार लिलाव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजही अनेक डोंगा घाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी कुणीही डोंगा तयार करतो आणि नागरिकांना ने-आण करण्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू करतो. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातील नागरिक अंभोरा घाटातून भंडारा जिल्ह्यात येतात. मात्र डोंग्याने प्रवास करू नका, एवढा सल्ला देण्यातच जिल्हा प्रशासन धन्यता मानते. लोकप्रतिनिधीही फारसे लक्ष देत नाही. डोंग्याचा प्रवास थांबवायचा असेल तर पुलांची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या लहान गावांतील बोटावर मोजण्याइतपत मतांकडे कानाडोळा केला जातो. काही मते मिळविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च पुलाच्या बांधकामावर करणे परवडणारे नसल्याने डोंग्याचा जीवघेणा प्रवास दरवर्षी असाच सुरू असतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या