शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

डोंग्याचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 00:39 IST

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो.

सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा यावर्षीचा आकडा विदर्भात १० च्या घरात गेला आहे. पुलावरून पाणी वाहात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे तर ग्रामीण भागात शेतकामासाठी नदी ओलांडणाऱ्या मजुरांना जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. भंडारा जिल्ह्यात नदी ओलांडण्यासाठी आजही प्राचीन डोंग्याचाच वापर केला जातो. अधिकृत नसलेल्या या डोंग्याचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतला असला तरी अद्याप डोंगा बंद झाला नाही. पुरेशा सुविधा नसल्याने मजुरांसह विद्यार्थीही नदी ओलांडण्यासाठी याचाच आधार घेत असल्याचे आजही जाणवते. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे. एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप आल्याने डोंगा हाच एकमात्र पर्याय उरतो. गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणाकरिता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागते. यासाठी त्यांचा डोंग्याने प्रवास सुरू असतो. डोंगा जीवघेणा आहे, तरी त्यातून प्रवास करणे ही ग्रामीण भागातील नागरिकांची अगतिकताच. यापूर्वी १७ जुलै २०११ रोजी भंडारा येथे डोंगा उलटून तब्बल ३५ महिलांचा जीव गेला होता. तर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे १३ जणांना प्राणाला मुकावे लागले. या दोन्ही घटना जिल्हा प्रशासनाच्या गचाळ कारभाराला मोठी चपराक असली तरी त्यातून प्रशासनाने काहीही बोध घेतलेला नाही. हा जीवघेणा प्रवास नियमितपणे सुरू आहे. या घटनांनंतर प्रशासनाने डोंगा घाटांचा नियमानुसार लिलाव करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजही अनेक डोंगा घाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी कुणीही डोंगा तयार करतो आणि नागरिकांना ने-आण करण्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू करतो. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातील नागरिक अंभोरा घाटातून भंडारा जिल्ह्यात येतात. मात्र डोंग्याने प्रवास करू नका, एवढा सल्ला देण्यातच जिल्हा प्रशासन धन्यता मानते. लोकप्रतिनिधीही फारसे लक्ष देत नाही. डोंग्याचा प्रवास थांबवायचा असेल तर पुलांची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या लहान गावांतील बोटावर मोजण्याइतपत मतांकडे कानाडोळा केला जातो. काही मते मिळविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च पुलाच्या बांधकामावर करणे परवडणारे नसल्याने डोंग्याचा जीवघेणा प्रवास दरवर्षी असाच सुरू असतो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या