शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेवडी संस्कृती’ची थट्टा झाली, पुढे काय? भाजपने फुकट सवलती उधळल्या, तेव्हा ते कसे चालले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 06:31 IST

BJP News: रविंद केजरीवाल यांच्या फुकट वीज, फुकट पाणी या आश्वासनांमुळे केंद्र सरकारला डोकेदुखी झाली असणार, हे उघडच आहे. दिल्लीत नागरिकांना वीज, पाणी फुकट दिल्याने केजरीवाल यांना घसघशीत राजकीय फायदाही झाला. याउप्पर ‘अशा आश्वासनांना भुलू नका आणि देशाच्या राजकारणातून या फुकट्या संस्कृतीला हद्दपार करा,’ असे आवाहन  पंतप्रधानांनी तरुणांना केले आहे.

- कपिल सिब्बल(राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ)

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष मतदारांना काही ना काही मोफत देण्याची आश्वासने देतात; त्यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच व्यक्त केली. न्यायालयात या विषयावर जोरदार चर्चाही झाली. पंतप्रधानांनी ‘रेवडी संस्कृती’ची जाहीरपणे थट्टा केल्यानंतर सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती न्यायालयात केली. अरविंद केजरीवाल यांच्या फुकट वीज, फुकट पाणी या आश्वासनांमुळे केंद्र सरकारला डोकेदुखी झाली असणार, हे उघडच आहे. दिल्लीत नागरिकांना वीज, पाणी फुकट दिल्याने केजरीवाल यांना घसघशीत राजकीय फायदाही झाला. याउप्पर ‘अशा आश्वासनांना भुलू नका आणि देशाच्या राजकारणातून या फुकट्या संस्कृतीला हद्दपार करा,’ असे आवाहन  पंतप्रधानांनी तरुणांना केले आहे. त्यांना वाटत असलेली चिंता स्वाभाविक असली तरी त्यांचा पवित्रा दांभिकच आहे.

ज्या रेवडी संस्कृतीचा ते विरोध करत आहेत ती भाजपच्याही संस्कृतीचा भाग आहे, हे पंतप्रधान विसरलेले दिसतात. काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कृषी वापरासाठी असलेल्या विजेवर ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली. ग्रामीण आणि निमग्रामीण भागातील १३ लाख वीज  जोडणीदारांना त्याचा फायदा होणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ‘स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण’ योजनेंतर्गत दोन कोटी टॅबलेट्स किंवा स्मार्टफोन वाटण्याची घोषणा केली. राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी गुणवत्ता यादीत येणाऱ्या महाविद्यालयीन मुलींना दुचाक्या देण्याची घोषणा भाजप अध्यक्षांनी केली. गरीब घरातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची मदत देण्याचेही आश्वासन पक्षाने दिले. प्रत्येक होळी आणि दिवाळीला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दोन एलपीजी गॅस सिलिंडरचेही आश्वासन देण्यात आले. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम १५ हजारांवरून २० हजार करण्यात आली. ६० वर्षांवरील महिलांना सार्वजनिक वाहतुकीच्या बसमधून मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ असेही सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०२१ मध्ये मध्य प्रदेश सरकारने १५ हजार ७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी अनुदान म्हणून मंजूर केले. या व्यतिरिक्त २०२१-२२ या काळात घरगुती वीज ग्राहकांसाठी ४९०० कोटी रुपयांचे अनुदान चालू ठेवण्यात आले. १२५ युनिटपर्यंत ग्राहकांना वीज मोफत दिल्याने राज्य सरकारच्या खजिन्यावर २५० कोटी रुपयांचा बोजा पडत होता. हिमाचल प्रदेश सरकारने एप्रिल २०२२ मध्ये ग्रामीण भागात पाणीपट्टी माफ केली. राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून प्रवासावर ५० टक्के सूट तसेच १८ ते ६० वयोगटातील महिलांसाठी पंधराशे रुपये महिन्याची मदत या सरकारने जाहीर केली.

मणीपूरमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असताना ‘राणी गैदिनली नुपी माहेरीयोइ सिंगी’ योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना २५ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले गेले. ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणारे मासिक निवृत्ती वेतन दोनशे रुपयांवरून हजार रुपये करण्यात आले. अर्थातच पुन्हा सत्ता मिळाली तर हे केले जाणार होते. पंतप्रधान आज ज्या रेवडी संस्कृतीबद्दल बोलत आहेत त्याच्याशी भाजपाने केलेल्या या जाहीर घोषणा मेळ खातात काय? उत्तराखंड, मणिपूर किंवा गुजरातसारख्या राज्यात भाजपा सत्तेत आहे. 

म्हणजे तेथे रेवडी संस्कृती असायला त्यांची हरकत नाही, असे तर नव्हे? दिल्लीत झालेल्या निवडणुकीच्या वेळीही भाजपाने अशी आश्वासने दिली होती. २०१९ साली सरकारने नव्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना करात २५ वरून १५ टक्केपर्यंत कपातीची घोषणा केली होती. ही कपात किंवा कर सवलत न घेणाऱ्या देशी कंपन्यांना कंपनी करात ३० टक्क्यांवरून २२ टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. यातून सरकारी खजिन्याचे १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. पंतप्रधान या घोषणेचे कसे समर्थन करणार? 

निवडणुकांच्या वेळी कोणती आश्वासने द्यावी, ते नियंत्रित करणारा कोणताही कायदा नाही. अंतिमतः कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, हे मतदाराने ठरवायचे असते, अशी आश्वासने देणारा कोणता राजकीय पक्ष लोकांचा विश्वास संपादन करतो, हे निवडणुकीच्या निकालावरून ठरत असते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोफत काही देण्याची आश्वासने नियंत्रित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळावा, यासाठी न्यायालय आदेश देईल, या अपेक्षेने जनहित याचिकेद्वारे या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले होते; परंतु न्यायालयाने हा विषय तीन न्यायाधीशांच्या पिठाकडे सोपविला. अशा विषयांचा निवाडा करण्याचे  न्यायालय हे व्यासपीठ नव्हे, नाही असे मला वाटते. या मुद्द्याला आर्थिक आणि राजकीय बाजू आहेत. जो प्रश्न राजकीय मार्गाने सोडवता येईल, त्यात न्यायालयाने पडू नये. या विषयावर पंतप्रधानांना विश्वासार्हता पाहिजे असेल तर त्यांनी आधी हे सांगावे की  मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप जेव्हा अशी आश्वासने देत होता त्यावेळी त्यांनी ही जाहीर भूमिका का घेतली नाही? त्यांनी तसे केले नाही तर हा केवळ ‘एक नवा राजकीय जुमला’ आहे, असे म्हणायचे, एवढेच!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणkapil sibalकपिल सिब्बल