शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

Independence Day: कोरोना संकटात स्वातंत्र्य दिनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 05:20 IST

एकीकडे जगाला ग्लोबल व्हिलेज म्हटले जात असताना नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. देशाच्या सीमा समाप्त झाल्या असल्या तरी सामाजिक अंतर मात्र वाढले आहे.

- भूपेंद्र यादव राज्यसभा सदस्य, भाजप सरचिटणीससंपूर्ण जग कोरोना संकटाला तोंड देत असताना आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. आज आम्ही विकास आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जात असताना साथीचा हा रोग नव्या स्वरूपात समोर आला आहे. जगात काही गोष्टी अतिशय वेगाने बदलत आहेत. एकीकडे जगाला ग्लोबल व्हिलेज म्हटले जात असताना नवे प्रश्नही निर्माण झाले आहेत. देशाच्या सीमा समाप्त झाल्या असल्या तरी सामाजिक अंतर मात्र वाढले आहे.बदलत्या जागतिक परिस्थितीत हे निश्चित करायला हवे की, भारताने कोणत्या मार्गाने जायला हवे. कोरोना काळात भारताची लढाई अतिशय यशस्वी राहिलेली आहे. आरोग्य सुविधाही वाढविण्यात आल्या आहेत. सर्वांत मोठी बाब म्हणजे या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजची घोषणा केली आहे. जग एका संकटाशी दोन हात करीत असताना आत्मनिर्भर कसे बनता येऊ शकते, याचाच संकल्प १५ आॅगस्ट रोजी व्हायला हवा. मोदी सरकारने आपल्या ६ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळात मुख्य आव्हानांना तोंड देत देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे.सरकारने जे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, शिक्षण धोरण, डिजिटल तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी सवलती, कर प्रणाली सुटसुटीत बनविणे आणि इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने कठोर निर्णय घेत अनेक समस्या दूर केल्या आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा देशात ६१ विमानतळे होती ती आज १०१ आहेत. आरोग्य क्षेत्रातही वेगाने सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोरोना काळातही अतिशय वेगाने चाचण्यांच्या लॅबचे नेटवर्क तयार करण्यात आले. ८० देशांसाठी ‘एचसीक्यूएल’ तयार करण्यात आले. शिवाय रेल्वेची क्षमता वाढविण्यात आली. कायद्यातील सुधारणांसाठीही मोठे काम करण्यात आले. काळाच्या ओघात जुने झालेले आवश्यक वस्तू अधिनियम आणि कामगार कायदा आणि कंपनी कायद्यात दुुरुस्ती करण्यात आली. दिवाळखोरी कायदा आणण्यात आला.दूरगामी योजनेंतर्गत सरकारने अशा क्षेत्रांची निवड केली ज्याच्या आधारावर आगामी ३०-४० वर्षांत देशाला पुढे नेता येईल. त्यासाठी प्राधान्य क्षेत्रांत सुधारणांची सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत कोळसा, खनिज, संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा, विमान वाहतूक, वीज क्षेत्र विकासासाठी धोरणात्मक सुधारणा केल्या. मोदी सरकारने धोरणात्मक सुधारणांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत संस्थांची प्रतिष्ठा वाढविली. त्यांनी ६ वर्षांच्या काळातच समृद्ध, सुसंकृत, सुरक्षित, संपन्न आणि सर्वसमावेशी भारत बनवण्याचा यज्ञ सुरू केला आहे. स्वातंत्र्य दिनी या यज्ञासाठी आहुतीचा संकल्प ही सर्वोत्तम संधी आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनcorona virusकोरोना वायरस बातम्या