शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची!

By रवी टाले | Updated: December 1, 2018 16:22 IST

सरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य?

ठळक मुद्देसरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य?कर्जांच्या परतफेडीसाठी अतिरिक्त राखीव निधीचा वापर करणे हे एक चांगले पाऊल सिद्ध होऊ शकते. शेवटी हा पैसा अंतत: देशाचा आहे. तो निव्वळ पडून राहणे देशहिताचे म्हणता येणार नाही.

रिझर्व्ह  बँकेने किती अतिरिक्त राखीव निधी बाळगावा आणि त्या निधीचा कशा रितीने विनियोग व्हावा, यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी केले आणि रिझर्व्ह  बँकेकडील अतिरिक्त राखीव निधीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये केंद्र सरकारची रिझर्व्ह  बँकेकडील अतिरिक्त राखीव निधीवर नजर असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या आणि त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. शेवटी आमची त्या निधीवर नजर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारला करावे लागले होते आणि त्या वादावर पडदा पडला होता; मात्र आता पुन्हा एकदा जेटली यांच्या वक्तव्यामुळे सरकारची त्या निधीवर नजर असल्याचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे. जेटली यांनी धोरण निश्चितीची गरज प्रतिपादित केली, याचा अर्थ त्या निधीचा विनियोग करण्याची सरकारची मनिषा निश्चितपणे आहे! इथे प्रश्न हा निर्माण होतो, की सरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य?गत काही वर्षांपासून सरकारच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर विरोधी पक्षांनी टीकाच करायची, अशी प्रथा निर्माण झाली आहे. कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही. त्या प्रथेला अनुसरून विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवल्याबद्दल सरकारला धारेवर धरले होते; पण रिझवर््ह बँकेने खरोखर किती अतिरिक्त राखीव निधी बाळगण्याची गरज आहे, यावर तटस्थपणे विचार करायला काय हरकत आहे.रिझर्व्ह  बँक आॅफ इंडिया ही जगातील सर्वात जास्त भांडवल असलेली मध्यवर्ती बँक आहे. रिझर्व्ह  बँकेकडील अतिरिक्त राखीव निधीचा साठाही प्रचंड मोठा आहे. बँकेने एवढा मोठा साठा बाळगण्याची खरेच गरज आहे का, यावर मंथन होण्यास हरकत काय? अनेक अर्थ तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह  बँकेने एवढा मोठा अतिरिक्त राखीव निधी बाळगण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयावर टीकास्त्र डागल्याबद्दल सध्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजत असलेले भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही तसेच मत व्यक्त केले आहे. बँकेकडील प्रचंड अतिरिक्त राखीव निधी इतर उत्पादक कामांकडे वळविण्यास काहीही हरकत नसावी, असे सुब्रमण्यम यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या वक्तव्यातील उत्पादक हा शब्द मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही सरकारच्या हाती अतिरिक्त निधी लागल्यास त्याचा वापर लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीसाठी, समाजातील विविध घटकांना अनुदाने देण्यासाठी होण्याची दाट शक्यता असते. तसे झाल्यास ती उधळपट्टी ठरेल. त्यामुळे उत्पादक कामांसाठी वापर ही शब्दयोजना अत्यंत महत्त्वाची ठरते.रिझर्व्ह  बँकेने भारत सरकारला जी कर्जे दिली आहेत, त्या कर्जांच्या परतफेडीसाठी अतिरिक्त राखीव निधीचा वापर करणे हे एक चांगले पाऊल सिद्ध होऊ शकते. तसे झाल्यास रिझर्व्ह  बँक आणि भारत सरकार या दोघांचाही ताळेबंद स्वच्छ होण्यास मदत होईल आणि देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने ते एक सकारात्मक चिन्ह असेल. अर्थात या संदर्भात अर्थ तज्ज्ञांमध्येही मतांतरे आहेत. काही अर्थतज्ज्ञांच्या मते जगात कुठेही सरकारची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडील अतिरिक्त राखीव निधीचा विनियोग करणे चांगले मानल्या जात नाही. पुन्हा राखीव निधी आणि अतिरिक्त राखीव निधी यांच्या व्याख्या कोण निश्चित करणार, हा प्रश्नदेखील शिल्लक उरतोच. या व्याख्या सरकारने करायच्या की रिझर्व्ह बँकेने? रिझर्व्ह बँकेकडे किती राखीव निधी असायला हवा आणि त्यापेक्षा जास्त निधीचा विनियोग कसा करायचा, हे एकदाचे निश्चित होणे गरजेचे आहे. शेवटी हा पैसा अंतत: देशाचा आहे. तो निव्वळ पडून राहणे देशहिताचे म्हणता येणार नाही; पण त्यासोबतच त्याचा वापर सत्ताधारी राजकीय पक्षाची लोकप्रियतावाढविण्यासाठीही होता कामा नये!या पार्श्वभूमीवर  रिझर्व्ह  बँकेने किती अतिरिक्त राखीव निधी बाळगावा आणि त्या निधीचा कशा रितीने विनियोग व्हावा, यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची गरज असल्याच्या अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा. फक्त हे धोरण निश्चित करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाने स्वत:च्या खंद्यावर घेऊ नये, तर त्यामध्ये रिझर्व्ह  बँक, अर्थ तज्ज्ञ आणि विरोधकांनाही सामील करायला हवे. या विषयावर सखोल चर्वितचर्वण झाल्यानंतर सर्वानुमते धोरण निश्चित झाल्यास त्याचा देशाला निश्चितपणे लाभ होईल.

- रवी टालेravi.tale@lokmat.com

 

टॅग्स :AkolaअकोलाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकArun Jaitleyअरूण जेटलीEconomyअर्थव्यवस्था