शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

पुनर्वसितांच्या समस्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:57 IST

शासन मूलभूत सुविधांकरिता तातडीने निधी मंजूर करते पण, असुविधा कायम आहेत. जमीनच नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिलेल्या आश्वासनाबाबत जर शासनच गंभीर नसेल तर आम्ही जायचे कुठे?

समस्या आणि विदर्भ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकरी आत्महत्यांची मालिका, बोंडअळी, कीटकनाशक फवारणीमुळे झालेले शेतक-यांचे मृत्यू आदी प्रश्न सोमवारपासून सुरू होणा-या विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार हे स्पष्ट आहे. यातच आता मेळघाटातील आदिवासींचा प्रश्नही ऐरणीवर येणार, असे संकेत शनिवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील ग्रामस्थांच्या निर्धारामुळे मिळत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रातील अमोना, बारुखेडा, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., गुल्लरघाट, नागरतास, केलपाणी या गावांतील ग्रामस्थांचे पुनर्वसन जवळपास तीन वर्षांपूर्वी अकोट, तेल्हारा तालुक्यात करण्यात आले.पुनर्वसित गावांत जमीन, रोजगार, सोई-सुविधा व आरोग्य यंत्रणा आदी सुविधा पुरविण्याचे आश्वासन शासन, प्रशासनातर्फे देण्यात आले होते. या ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे शेती. अद्यापही त्यांना शेतजमीन मिळालेली नसल्याने, त्यांना पोेटाची खळगी कशी भरावी, याची भ्रांत आहे. यातूनच त्यांना शेवटी शासन, प्रशासनाशी तीन महिन्यातच पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी हे ग्रामस्थ ९ सप्टेंबर रोजी मुला-बाळांसह प्रशासनाचा बंदी आदेश झुगारत खटकालीचे गेट तोडून मेळघाटात पोहोचले होते. त्यावेळी आयुक्त पीयूष सिंंह, मुख्य उप वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मेळघाटात ग्रामस्थांची मनधरणी करून, मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ परतले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी यांच्यासोबत बैठकही पार पडली होती. शासनाने मूलभूत सुविधांकरिता तातडीने १० कोटींचा निधी मंजूर केला होता; परंतु तीन महिने उलटूनही असुविधा ‘जैसे थे’ असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जमीनच नसल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, हा सवाल शासनाला विचारत हे ग्रामस्थ शनिवारी केलपाणीत एकत्र आले आहेत. तसं पाहिलं तर अकोट, तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावांतील समस्या, या आदिवासी बांधवांच्या समस्यांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे.शिक्षणाचा अभाव आणि परंपरागत वळचणीवर विश्वास ठेवणाºया या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खरं तर शासन प्रयत्न करते; परंतु हे प्रयत्न कुठेतरी कमी पडतात आणि या ग्रामस्थांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरत नाही. आताही तेच झाले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही तीन महिन्यांनंतर जर प्रशासन आश्वासनपूर्तीबाबत गंभीर नसेल तर मग पुन्हा मेळघाटात परतण्याचा निर्धार करणाºया ग्रामस्थांचं चुकलं की त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाºया शासन- प्रशासनाचं चुकलं, याचं उत्तर खुद्द आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांना शोधावे लागणार, एवढं मात्र खरं!

टॅग्स :HomeघरMaharashtraमहाराष्ट्र