शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘1984’ची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 03:28 IST

नागरिकांच्या खासगी अधिकार क्षेत्राच्या रक्षणाबाबत ३१ जुलै २०१७ या दिवशी सरकारने नेमलेल्या आयोगाचे

न्या. बी.एन. श्रीकृष्ण (सेवानिवृत्त) हे सर्वोच्च न्यायालयावर न्यायमूर्ती म्हणून काम करीत असताना, त्यांनी देशाच्या राज्यव्यवस्थेला व समाजकारणाला वळण देणारे अनेक महत्त्वाचे निकाल दिले आहेत. शिवाय राजकीय विचारवंत म्हणूनही ते ओळखले जातात आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे साऱ्यांच्या आदराचा विषय आहेत. देशातील टेलिफोन्स, मोबाइल, संगणक व अन्य सामाजिक माध्यमांवर बारीक नजर ठेवणारी यंत्रणा खासगी हॅकर्सनी इस्रायलकडून मागविली असून, ती जनतेच्या दैनंदिन जीवनाएवढेच तिच्या संभाषणांवरही नियंत्रण आणणार आहे. तसे झाल्यास नागरिकांचे सारे खासगी (प्रायव्हसी) अधिकार संपुष्टात येतील.

 नागरिकांच्या खासगी अधिकार क्षेत्राच्या रक्षणाबाबत ३१ जुलै २०१७ या दिवशी सरकारने नेमलेल्या आयोगाचे न्या. श्रीकृष्ण हे अध्यक्ष आहेत. ‘इस्रायलची ही यंत्रणा देशात आल्यास देशातील स्त्री-पुरुषांना कोणतेही खासगी जीवन उरणार नाही व ते २४ तास हॅकर्सच्या निगराणीखाली जातील,’ अशी भीती व्यक्त करून ते म्हणतात, ‘तसे होणे हे जॉर्ज आॅर्वेलच्या ‘1984’ या कादंबरीतल्या गुलाम जिण्यासारखे होईल. ‘बिग ब्रदर’ तुमच्या हालचालींवर देखरेख करीत आहे, असे जनतेला सतत बजावणारी यंत्रणा अस्तित्वात येईल.’ त्या कादंबरीच्या वर्णनात प्रत्येक घरात व खोलीत एक डोळे असलेला कॅमेरा बसविलेला आहे. एखादीही बाब चुकली वा नियमाच्या साध्या आज्ञेचाही भंग झाला (यात व्यायामापासून सारे आले आहे) तर त्याची सूचना ते डोळे संबंधित अधिकाऱ्यांना देतील व ते अधिकारी त्यासंबंधीची निर्बंधक कारवाई तत्काळ करतील. ही स्थिती १९७५ च्या अंतर्गत आणीबाणीहून भयंकर असेल व ती व्यक्तीची हात, पाय, मेंदू व डोळे असे सारेच बांधून ठेवणारी असेल. तसेही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेच आहे. पूर्वी नेत्यांचे फोन टॅप होत. मग अधिकाºयांचे होऊ लागले. परवा प्रियंका गांधींचे फोन टॅप होत असल्याची बातमी आली. हा प्रकार ‘आॅर्वेलियन डिक्टेटरशिप’कडे नेणारा आहे, असा अभिप्राय न्या. श्रीकृष्ण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला असून, तो सगळ्या लोकशाहीवादी शक्तींना सावध करणारा आहे. सरकारने मिळालेल्या माहितीचा नागरिकांविरुद्ध किती व कसा वापर करावा किंवा करू नये, याची कायदेशीरता ठरविण्याची जबाबदारी या आयोगाकडे देण्यात आली होती. हे काम करीत असतानाच या आयोगाला आरंभी तिच्यातील जे धोके आढळले त्यांची त्याने वाच्यता केली आहे. या स्थितीला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न विचारला असता

न्या. श्रीकृष्ण म्हणाले, ‘घटनेने दिलेल्या नागरी अधिकारांच्या रक्षणासाठी साºयांनीच फार सावध व सतर्क झाले पाहिजे. त्यावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत, यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.’ ही जबाबदारी पूर्ण करताना न्यायमूर्र्तींनी देशातील न्यायमूर्र्तींच्या, प्रशासनाधिकाºयांच्या, माध्यमातील प्रतिनिधींच्या व विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अशा सखोल अभ्यासानंतर २८ जुलै २०१८ या दिवशी त्यांनी आपला अहवाल केंद्राला सादरही केला आहे. त्यांची मुलाखत पाहता या अहवालात काय असेल, याची कल्पना जाणकारांना येणारी आहे. कोणतेही सरकार, त्याला एखादी विशिष्ट विचारसरणी देशावर लादायची असल्यास नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावर बंधने आणते. आम्ही सांगू तो विचार व तोच आचार तुम्ही केला पाहिजे, असे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करते. कायदा, पोलीस व मानसशास्त्रीय प्रचार (यालाच सांस्कृतिक संहिता असे म्हणतात.) यांच्या साहाय्याने हा प्रयत्न होतो. भारत बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतिबहुल आहे. साºया विचारांना, मतप्रणालींना त्यात मोकळीक आहे. त्यांना एकाच कळपात व रंगात आणणे हा प्रकारच लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे न्या. श्रीकृष्ण यांच्या अहवालाकडे व मार्गदर्शनाकडे साºयांनी तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

आजच्या राजकीय पर्यावरणात विरोधी पक्षांवर, माध्यमांवर, स्वतंत्र विचार करणाºया पत्रकार व लेखकांवर भीतीचे सावट आले आहेच. काय लिहिले वा काय बोलले तर आपल्यावर पोलिसांची धाड पडेल; याच्या भयाने सारेच कमालीचे ग्रासले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीhistoryइतिहासPoliticsराजकारण