शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बांधकाम व्यवसायाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:35 IST

‘बिल्डर’ या घटकाकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही, ही अनेक बांधकाम व्यावसायिकांची खंत आहे.

बांधकाम व्यवसाय शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. देशाच्या उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोठे आहे. विकासाच्या पाऊलखुणा ओळखून आर्थिक पातळीवरील धोके बांधकाम व्यावसायिकांनी पत्करल्याने राज्यातील अनेक भागांचा आर्थिक आणि सामाजिक चेहरा बदलून गेला. मात्र, तरीही ‘बिल्डर’ या घटकाकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही, ही अनेक बांधकाम व्यावसायिकांची खंत आहे. ‘उडदामाजी काळे गोरे’ उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रांत चांगले-वाईट लोक असतात. ‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनानिमित्त बांधकाम व्यवसायासमोरील प्रश्नांवर विचारमंथन झाले. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, नॅशनल क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या प्रश्नांवर विवेचन केले. महारेरा, चटई क्षेत्र निर्देशांक, अकृषिक नियमावलीतील बदल यांवर शासनाने केलेल्या कार्यवाहीचे कौतुक करतानाच काही अपेक्षाही व्यक्त केल्या. बांधकाम प्रकल्पावर अपघात झाल्यास संबंधित बिल्डरवर कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. वास्तविक, एखादी दुर्घटना घडल्यावर पालकत्वाच्या जबाबदारीने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला काम करावे लागते. परंतु, थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे फरार होऊन अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करण्याची वेळ त्याच्यावर येते. पोलिसांकडून मानसिक व आर्थिक पिळवणूक होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नांचाही व्यासंग असणाऱ्या अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी त्यावर सकारात्मक पाऊल उचलले. ‘रेरा’अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम प्रकल्पावर झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागल्यास बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, अपघात म्हणूनच गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा ‘लोकमत’च्या व्यासपीठावर त्यांनी केली. बिल्डरवर विनाकारण कायद्यात नसलेली कलमे लागू केली जाणार नाहीत, असेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे महाराष्टÑातील बांधकाम व्यावसायिक, स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे पोलिसांचा ससेमिरा टळेल व अकारण होणाºया जाचापासून सुटका होईल. बांधकाम कामगारांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने आणि उपाययोजना यांची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये याबाबतचे निकषही ठरवून दिले जातात. याकडे कोणत्याही पातळीवर डोळेझाक होणार नाही, हे पाहण्याचीही जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आहे. तरच, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल आणि ‘लोकमत’च्या ‘बिल्डिंग महाराष्टÑ’ मोहिमेला आणि बांधकाम व्यावसायिकांच्याही अपेक्षांना नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस