शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यवसायाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:35 IST

‘बिल्डर’ या घटकाकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही, ही अनेक बांधकाम व्यावसायिकांची खंत आहे.

बांधकाम व्यवसाय शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. देशाच्या उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोठे आहे. विकासाच्या पाऊलखुणा ओळखून आर्थिक पातळीवरील धोके बांधकाम व्यावसायिकांनी पत्करल्याने राज्यातील अनेक भागांचा आर्थिक आणि सामाजिक चेहरा बदलून गेला. मात्र, तरीही ‘बिल्डर’ या घटकाकडे समाज चांगल्या नजरेने पाहत नाही, ही अनेक बांधकाम व्यावसायिकांची खंत आहे. ‘उडदामाजी काळे गोरे’ उक्तीप्रमाणे सर्वच क्षेत्रांत चांगले-वाईट लोक असतात. ‘लोकमत’च्या ‘विश्वकर्मा’ कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनानिमित्त बांधकाम व्यवसायासमोरील प्रश्नांवर विचारमंथन झाले. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, नॅशनल क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या प्रश्नांवर विवेचन केले. महारेरा, चटई क्षेत्र निर्देशांक, अकृषिक नियमावलीतील बदल यांवर शासनाने केलेल्या कार्यवाहीचे कौतुक करतानाच काही अपेक्षाही व्यक्त केल्या. बांधकाम प्रकल्पावर अपघात झाल्यास संबंधित बिल्डरवर कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. वास्तविक, एखादी दुर्घटना घडल्यावर पालकत्वाच्या जबाबदारीने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला काम करावे लागते. परंतु, थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे फरार होऊन अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करण्याची वेळ त्याच्यावर येते. पोलिसांकडून मानसिक व आर्थिक पिळवणूक होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नांचाही व्यासंग असणाऱ्या अभ्यासू मुख्यमंत्र्यांनी त्यावर सकारात्मक पाऊल उचलले. ‘रेरा’अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम प्रकल्पावर झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागल्यास बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, अपघात म्हणूनच गुन्हा दाखल केला जाईल, अशी घोषणा ‘लोकमत’च्या व्यासपीठावर त्यांनी केली. बिल्डरवर विनाकारण कायद्यात नसलेली कलमे लागू केली जाणार नाहीत, असेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे महाराष्टÑातील बांधकाम व्यावसायिक, स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे पोलिसांचा ससेमिरा टळेल व अकारण होणाºया जाचापासून सुटका होईल. बांधकाम कामगारांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने आणि उपाययोजना यांची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये याबाबतचे निकषही ठरवून दिले जातात. याकडे कोणत्याही पातळीवर डोळेझाक होणार नाही, हे पाहण्याचीही जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आहे. तरच, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल आणि ‘लोकमत’च्या ‘बिल्डिंग महाराष्टÑ’ मोहिमेला आणि बांधकाम व्यावसायिकांच्याही अपेक्षांना नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस