शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

दुश्मनीच्या वाटेवर ऋणानुबंधाची आठवण !

By सचिन जवळकोटे | Updated: May 2, 2019 16:37 IST

दुश्मनीच्या वाटेवर अकस्मातपणे भेटलेल्या दोन दिग्गज नेत्यांच्या सार्वजनिक सभ्यतेचा पाहिला ऋणानुबंध.

- सचिन जवळकोटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अवघा महाराष्ट्र द्वेषाच्या लाटेवर स्वार झालेला. राजकीय सुडाच्या भाषेपायी थरारलेला. मात्र याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकलूजच्या भूमीनं काल अनुभवला जुन्या आठवणीचा नवा भावबंध. दुश्मनीच्या वाटेवर अकस्मातपणे भेटलेल्या दोन दिग्गज नेत्यांच्या सार्वजनिक सभ्यतेचा पाहिला ऋणानुबंध. शरद पवार अन् विजयसिंह मोहिते-पाटील जेव्हा एकमेकांशी मोठ्या आदरानं बोलले, तेव्हा भीमा-नीरा खो-याला लाभलं महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेचा साक्षीदार बनण्याचं भाग्य.

मंगळवारी शरद पवार सांगोला तालुक्याच्या दौ-यावर होते. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या तयारीला ते लागले होते. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र अकलूजच्या सरदारांनी गड सोडल्यानंतर झालेली पडझड त्यांना दुरुस्त करायची होती. गावोगावी ढासळलेले कैक बुरुज त्यांना पुन्हा बांधायचे होते. 'अकलूजकर गेले तरीही बारामतीकरांना काहीच फरक पडत नाही,' हे दाखविण्यासाठीच त्यांनी सोलापूरवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलेलं. दोन दिवसांचा जिल्हा दौरा त्यांनी तेवढ्यासाठीच आखलेला. मात्र त्याच दिवशी मुंबईहून एक वाईट बातमी थडकली. माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढा देता-देता निधन झालेलं. हे कळताच पवारांनी आपला दौरा जागीच रद्द केला.

   डोळस हे राष्ट्रवादीचे गेल्या दहा वर्षापासूनचे आमदार. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस विजयदादांनी केलेली तर त्यांना मान-बहुमान मिळवून देण्यासाठी पवारांनीही मुंबईत वेगवेगळी संधी उपलब्ध करून दिलेली. बुधवारी डोळस यांच्यावर त्यांच्या जन्मगाव असलेल्या दसूरमध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षाचे नेते आवर्जून उपस्थित राहिलेले. चौथ-यावर अंत्यविधी सुरू असताना सारेच नेते गंभीरपणे समोर बसलेले. एवढ्यात समोरून शरद पवार आले. त्यांना पाहताच सर्वप्रथम विजयदादा अन् रणजितदादा पटकन उठून उभारले. त्यानंतर इतर सहका-यांनी खुर्च्या सोडल्या. त्यानंतर पवार अन् दादा एकाच ठिकाणी जवळ-जवळ बसले. काही क्षण निशब्दच गेले. अखेर त्यांच्यात संवादही झाला. ते दोघे काय बोलतात, हे पाहण्यासाठी लगतचे अजितदादाही वाकून बघू लागले. त्यावेळी दोघांच्या चेह-यावरच्या भावना टिपण्याचा प्रयत्नही काही जणांच्या कॅमे-यानं केला. विजयदादा अन् अजितदादा यांच्यात मात्र संवाद झालाच नाही. अखेर विधी पार पडल्यानंतर सारे नेते परत फिरले.आपापल्या गावी निघाले.

पवार गेले.. विजयदादाही गेले. मात्र या दोघांमध्ये काही काळ झालेल्या संवादाची चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली. गेल्या महिन्यातच रणजितसिंहांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी न सोडताच विजयदादाही मोदींच्या जाहीर सभेत व्यासपीठावर उपस्थित राहिले. त्यानंतर अजितदादांनी माळशिरस तालुक्यात जोरदार सभा घेऊन 'अकलूजकरां'वर घणाघाती टीका केली. शरद पवारांनी तर ‘दादांची चड्डी’ या मुद्यावरून 'आरएसएस'लाही चिमटा काढलेला. यावेळी दादांची बाजू घेत देवेंद्रपंतानीही पवारांना ‘पुलोदच्या चड्डी’ची आठवण करून दिलेली. पाठीवरच्या खंजीरापासून ‘हाफ चड्डी'तल्या मांडीपर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर माढा लोकसभेचा प्रचार पोहोचलेला. 'गेल्या अनेक दशकांपासून सुख-दुःखात सोबत राहिलेल्या विजयदादांच्या घराण्यानं आपली साथ सोडून भाजपाच्या गोटात सामील व्हावं,' हे पवारांना अत्यंत जिव्हारी लागल्याचं या सा-या भाषणांमधून स्पष्टपणे जाणवलेलं. त्यात पुन्हा 'कुल अन् हर्षवर्धन' यांच्या भेटीगाठीतून विजयदादांकडून बारामतीतही पवार घराण्याची कोंडी केली जात असल्याची खबर धक्कादायक ठरलेली. म्हणूनच की काय, माढ्याच्या रणांगणात  भाजपापेक्षाही मोहिते-पाटील घराण्यावरच टिकेचे आसूड ओढण्यात पवारांची राष्ट्रवादी रमलेली. एकमेकांना राजकारणातून उठविण्याची भाषाही केली गेली. या सा-या द्वेषाच्या पार्श्वभूमीवर पवार अन् विजयदादा आकस्मितपणे समोरासमोर आले, तेव्हा दोघांनीही एकमेकांचा केलेला आदर उपस्थितांसाठी लक्षणीय ठरला. मराठी मुलखाची सभ्यता पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला.. कारण या दोघांचाही प्रिय साथीदार काळाआड गेल्याचं दुःख सामयिक होतं. याचीच चर्चा दिवसभर अकलूज-बारामती परिसरात रंगलेली. फक्त सर्वांना एकच प्रश्न पडला होता.. तो म्हणजे 'पवार अन् विजयदादा एकमेकांशी नेमकं काय बोलले?' विशेष म्हणजे, या दोघांच्या संवादाची उत्सुकता खुद्द रणजितदादांनाही होती. त्यांनी जेव्हा पिताश्रींना म्हणजे विजयदादांना घरी विचारलं, तेव्हा ते म्हणे एवढंच उत्तरले, 'काही नाही. नेहमीचं आपलं बोलणं.. कधी निघालात अन् कुठून आलात?' आता या संवादावरून ‘अकलूज-बारामती’चं राजकारण कुठं पोहोचणार, याची अटकळ बांधण्याचा प्रयत्न कुणी करु नये, एवढंच. 

जाता-जाता :  रणजितदादांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांची ‘लाईव्ह मुलाखत’ घेण्यासाठी मध्यतंरी आम्ही त्यांच्या अकलूजमधल्या बंगल्यावर पोहचलो, त्यावेळी आतल्या हॉलमध्ये पवारांसोबत विजयदादांचा जुना फोटो अजूनही भिंतीवर दिमाखात झळकलेला दिसला. ‘इथं आता त्यांचा फोटो?' असा प्रश्न उत्सुकतेनं विचारला, तेव्हा रणजितदादा गालातल्या गालात हसत म्हणाले होते, 'फोटो नव्हे.. केवळ आठवण.'

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलHanumant Dolasहनुमंत डोळसPoliticsराजकारण