शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

धर्म लोकशाहीशी सुसंगत हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:27 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर बोलताना अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला बुद्धांचे स्मरण करून दिले.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर बोलताना अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला बुद्धांचे स्मरण करून दिले. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, असे उद्गार मोठ्या अभिमानाने काढले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एक व्हावे, असे आवाहनही त्यांनी सर्व जगाला केले. त्यांचे हे आवाहन अत्यंत योग्य आहे. मात्र, केवळ परस्परांच्या संरक्षणासाठीच नव्हे, तर देशातील आणि जगातील लोकांच्या कल्याणासाठीही आपण सर्वांनी एकत्रित येणे आज गरजेचे बनलेले आहे. लोककल्याणासाठी जर आपण एक झालो, तर संरक्षणासाठी पुन्हा एक होण्याची गरज आपल्याला भासणार नाही! मुळात संरक्षणाची समस्याच अशा परिस्थितीत आपल्याला फारशी भेडसावणार नाही.

मागील सुमारे सत्तर वर्षांपासून भारतातील लोककल्याणासाठी आपण मोठ्या प्रमाणात झटत आहोत. ते साधण्यासाठी भारतीय संविधानात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी आपण केल्या आहेत. त्यांच्या आधारे मोठमोठ्या कायदेशीर यंत्रणा देशात निर्माण केल्या आहेत. त्या योग्यप्रकारे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ, शक्ती आणि पैसाही आपण खर्च केला आहे. असे असूनही अपेक्षित यश आपल्याला अजून प्राप्त झालेले नाही. हे असे का झाले, याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. लोककल्याणासाठी कायदे करताना समाजमन लोककल्याणासाठी कितपत अनुकूल झाले आहे, याचा अंदाज घेतला पाहिजे.

लोककल्याणाचे संस्कार समाजमनावर करण्यासाठी धर्म हे एक मोठे व महत्त्वाचे साधन आहे. बहुसंख्य माणसांचे आपापल्या धर्मावर जीवापाड प्रेम असते. त्याचा त्यांना मोठा अभिमानही असतो. जीवनातील फार मोठा काळ ते त्याचा अनुनय करण्यात व्यतीत करत असतात. परंतु मोठ्या प्रमाणात अनुनय केल्या जाणाऱ्या एखाद्या धर्मातील लोकप्रिय धर्मतत्त्वे जर लोकशाहीशी सुसंगत नसतील, तर काय होईल? अशा समाजात किंवा त्यांच्या देशात लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरू शकेल काय? तेथे प्रभावी लोककल्याण साधणे कोणाला शक्य होईल काय? तर नाही! कोणत्याही लोकशाही व्यवस्थेतील लोकांचा धर्म हा त्यामुळेच लोकशाही तत्त्वांशी सुसंगत असा असला पाहिजे! तसा तो नसेल, तर लोकशाहीच्या मार्गातील तो सर्वात मोठा अडथळा ठरेल!

भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या गेलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाणले होते. त्यामुळेच १४ आॅक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे धर्मांतर करताना धर्मांतरामागील कारणे त्यांनी सुस्पष्टपणे नमूद करून ठेवली. प्रचलित धर्म हा लोकशाहीशी सुसंगत असा धर्म नाही, हे एक मोठे कारण धर्मांतरामागे असल्याचे त्यांनी सांगितले. बुद्धांचा धम्म हा लोकशाहीशी सुसंगत असल्यामुळे आपण तो स्वीकारत आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारतातील लोकशाहीच्या सर्व समर्थकांनी या घटनेकडे व त्यातील वैचारिक भूमिकेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी तत्त्वे जर लोकशाहीची प्रमुख तत्त्वे म्हणून आपण स्वीकारत असू, तर दैनंदिन जीवनात आपण जो धर्म अनुसरतो त्याची तत्त्वेही या तत्त्वांशी सुसंगत अशीच असली पाहिजेत. राजकारणात समता आणि समाजकारण किंवा धर्मकारणात विषमता घेऊन आपल्याला आपली लोकशाही यशस्वी करता येणार नाही. आजपासून आपण विसंगत जीवनात प्रवेश केलेला असून जितक्या लवकर आपण या विसंगतीचा त्याग करू, तितके ते आपल्या हिताचे ठरेल, या घटनाकारांच्या सूचक इशाºयाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतून भारतात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केलेली आहे. आपले स्वातंत्र्य टिकवतानाच आपल्या देशातील शोषण समूळ नष्ट व्हावे, हा यामागील प्रमुख हेतू आहे. पण हा हेतू आपल्याला अजूनही पुरेशा प्रमाणात साध्य करता आलेला नाही. भारतातील जातीयता, जातीय विद्वेष, जातीय अत्याचार, स्त्री-पुरुष विषमतेची मानसिकता, अंधश्रद्धा, दैवशरणता इ. गोष्टी आपल्याला अजूनही नष्ट करता आलेल्या नाहीत. आपली धर्मतत्त्वे लोकशाही तत्त्वांशी सुसंगत करून घेण्याबाबत आपण दाखवलेली अक्षम्य अनास्था, हे यामागील एक मोठे व महत्त्वाचे कारण आहे.

एकंदरीत आपल्याला असे म्हणता येईल की, लोकशाहीतील कायदा जर न्यायवादी असेल, तर तो पाळणाºया समाजाची धर्मतत्त्वेही न्यायवादी असली पाहिजेत. कायदा जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुतावादी असेल, तर तो पाळणाºया समाजाची धर्मतत्त्वेही स्वातंत्र्य, समता आणि बंधुतावादी असली पाहिजेत! तशी ती नसतील, तर समाजाकडून कायद्यांचे पालन योग्यप्रकारे केले जाणार नाही. कायद्यांचे पालन केले न गेल्यास अशा समाजात लोकशाही योग्य प्रमाणात रूजणार नाही. ती रूजली नाही, तर मोठ्या प्रमाणात यशस्वीही होणार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी हे सर्व जाणले होते. त्यामुळेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या तत्त्वांना मोठे महत्त्व देणारा बुद्धांचा धम्म त्यांनी एक पर्याय म्हणून आपल्यासमोर ठेवला. ज्यांना तो मान्य असेल, त्यांनी तो स्वीकारावा! ज्यांना मान्य नसेल, त्यांनी आपली धर्मतत्त्वे लोकशाहीशी कितपत सुसंगत आहेत, याचा आढावा घ्यावा!

- डॉ. रविनंद होवाळप्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान