शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

खान्देशला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:10 PM

खान्देशला दिलासा देणारे दोन महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत

- मिलिंद कुलकर्णीखान्देशला दिलासा देणारे दोन महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. या निर्णयाचा दूरगामी फायदा होणार असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे. पहिला निर्णय म्हणजे मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाविषयी केंद्रीय मंत्रालये आणि महाराष्टÑ व मध्य प्रदेश सरकारांमध्ये झालेला सामंजस्य करार आणि दुसरा म्हणजे अमळनेरसह सहा तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये करण्याचा निर्णय..खूप महत्त्वाचे असे हे निर्णय आहेत. रेल्वे सेवेविषयी धुळे तसे दुर्लक्षित राहिले आहे. राष्टÑीय महामार्गांमुळे दळणवळणाची मोठी सुविधा, पश्चिम रेल्वेचे मोठे जाळे असले तरी जिल्हा मुख्यालय असलेले धुळे मात्र रेल्वेच्या नकाशावर केवळ धुळे-चाळीसगाव मार्गापुरती मर्यादीत होते. ९४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा या मार्गाची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर अनेक व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय नेते, राजकीय पक्ष, मंत्री यांनी प्रयत्न केल्यानंतर या स्वप्नाला आता मूर्त रुप येण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे. पहिलेच पाऊल ठोस आहे. सामंजस्य करार होणे आणि त्यात आर्थिक भागीदारी निश्चित होण्याचा टप्पा निश्चित झाला आहे. त्यानुसार भारतीय बंदर रेल्वे महामंडळ हा ३६२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग उभारेल. त्यासाठी विशेष उद्देश कंपनी गठित करण्यात येणार आहे. केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाचे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट हे ५५ टक्के खर्चाचा हिस्सा उचलणार आहे. तर प्रत्येक १५ टक्के हिस्सा केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्टÑ व मध्य प्रदेश सरकार उचलणार आहे. महाराष्टÑातील ३९ रेल्वे स्थानकांचा या मार्गात समावेश असेल. मुख्य म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत असलेल्या नरडाणा, धुळे, नाशिक, सिन्नर या भागांना या मार्गाचा मोठा लाभ होणार आहे. दुसºया निर्णयामुळे गेल्या चार वर्षांपासून ठप्प असलेल्या पाडळसरे धरण उभारणीच्या कामाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आघाडी सरकारच्या काळात झालेले सिंचन विभागातील घोटाळे, राज्यपालांनी प्रादेशिक अनुशेषासंबंधी दिलेले दिशानिर्देश आणि पूर्णत्वाकडे असलेल्या प्रकल्पांनाच निधी उपलब्ध करुन देण्याच्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे ‘पाडळसरे’ निधीसाठी तहानलेला होता. त्याची तहान आता भागेल, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव