शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नि:संकोच पुढे होऊन बहुमोल प्राण वाचवा!

By विजय दर्डा | Updated: February 11, 2019 00:46 IST

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही.

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही. हे चित्र आपल्या देशात नेहमी पाहायला मिळते. बऱ्याचदा या दिरंगाईमुळे जखमीचे प्राण गेले की लोक पुढे सरसावतात, म्हणूनच जोश मलिहाबादी यांनी लिहिले आहे.जंगलों मे सर पटकता जो मुसाफिर मर गयाअब उसे आवाज देताकारवां आया तो क्याअशा अपघाताच्या वेळी मदत करण्याच्या बाबतीत लोकांच्या उदासीनतेचा कटू अनुभव मी आणि माझ्या कुटुंबाने घेतला आहे. अलीकडेच माझी सून रचना सहा लेनच्या मथुरा-दिल्ली हायवेवरून मोटारीने जात होती. माझे दिल्लीतील ड्रायव्हर गजेंद्र सिंग मोटार चालवत होते. अचानक गजेंद्र सिंग यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला व त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. तशा अवस्थेतही १००-१२० कि.मी. वेगाने धावणारी मोटार गजेंद्र सिंग यांनी सुरक्षितपणे पहिल्या लेनमध्ये आणली. त्यांनी मोटार थांबवली व स्टिअरिंग व्हीलवर डोके टेकून ते बेशुद्ध झाले. मोटार तिसºया किंवा चौथ्या लेनमध्ये असताना गजेंद्र सिंग बेशुद्ध झाले असते तर भयंकर अपघात झाला असता; पण त्यांनी मोटार सुरक्षित जागी नेऊन उभी करण्याचे प्रसंगावधान राखले. गजेंद्र सिंग बेशुद्ध होताच रचना लगेच मोटारीतून खाली उतरली. पुढची १५ मिनिटे रचना येणाºया-जाणाºया वाहनांना हात दाखवून मदतीची याचना करत राहिली. काही वेळाने दोन जण थांबले; पण तेवढ्यात मी व चिरंजीव देवेंद्र तेथे पोहोचलो. आम्ही गजेंद्र सिंग यांना इस्पितळात नेले; पण तोपर्यंत त्यांनी अंतिम श्वास घेतला होता. त्या १५ मिनिटांत रचनाच्या हाका ऐकून एखाद्याने गाडी थांबवून गजेंद्र सिंग यांना त्वरेने इस्पितळात नेले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने अलीकडेच देशातील ११ मोठ्या शहरांमध्ये एक सर्वेक्षण केले. रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यात पुढाकार घेणाºयांना कायद्याने कसे संरक्षण दिले आहे व कोणत्या सुविधा दिल्या आहेत, याची ८४ टक्के लोकांना कल्पनाही नाही, असे या सर्वेक्षणातून दिसून आले. एवढेच नव्हे तर डॉक्टर, वकील व इस्पितळ कर्मचाºयांनाही या बाबींची माहिती नसते.या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांशी मी पूर्णपणे सहमत आहे. रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी लोक पुढे का येत नाहीत, हे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. लोकांच्या मनात पोलिसांची भीती असते. मदत करायला पुढे गेलो तर ‘आ बैल मुझे मार’सारखी आफत आपल्यावर ओढवेल, अशी प्रत्येकाला काळजी असते. लोकांना वाटत असते की, पोलीस अपघाताविषयी आपल्याला विचारतील, वारंवार पोलीस ठाण्यात खेटे घालावे लागतील, एखाद्याचे प्राण वाचविले म्हणून कौतुक करण्याऐवजी आपल्यालाच गुन्हेगार असल्यासारखी वागणूक मिळेल. एखाद्याने अपघातातील जखमीला जवळच्या इस्पितळात नेले तरी तेथील डॉक्टर व कर्मचाºयांचा दृष्टिकोनही काही करून हे झंझट टाळण्याचाच दिसतो. एखाद्याचा जीव आपण वाचवू शकलो ही अनुभूती अद्भूत असते; पण आपण संवेदनशून्य झालो आहोत. मदत करायला आपण उदासीनता दाखवतो. याला जबाबदार कोण?अशी दुर्दैवी परिस्थिती येण्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहेत. रस्ते अपघातांमधील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येणाºयांना संरक्षण देणारे कायदे व नियम केले आहेत, हे खरे. मदत करणाºयाची व्यक्तिगत माहिती पोलीस विचारू शकत नाहीत, चौकशीच्या नावाखाली वारंवार खेटे घालायला लावूू शकत नाहीत, असे हे नियम सांगतात. खासगी व सरकारी इस्पितळांनाही पोलिसी सोपस्कार होण्याची वाट न पाहता तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्याची सूट देण्यात आली आहे. या बाबतीत मी दिल्ली पोलीस व दिल्ली सरकारचे अभिनंदन करीन. रस्ते अपघात कसे टाळावेत, अपघातातील जखमींना मदत करणाºयांना कायद्याने कसे संरक्षण दिलेले आहे, याविषयी दिल्ली पोलीस व दिल्ली सरकार माध्यमांमधून सतत जनजागृती करत असते. केंद्र किंवा अन्य राज्यांच्या सरकारांमध्ये मला ही संवेदनशीलता दिसत नाही.रस्ते अपघातांमधील जखमींना मदत करण्यास लोक उत्सूक असतात; पण त्यांना त्या संबंधीच्या कायदेशीर अधिकारांची माहिती नाही. मनात असूनही लोक मदतीला पुढे येत नाहीत, यामुळे दरवर्षी अपघातांमधील हजारो जखमींचे प्राण वाचविता येत नाहीत. अपघातग्रस्तांना मदत करायला संकोच न करता पुढे या, त्याने तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, याचा प्रचार केंद्र व राज्य सरकारने युद्ध पातळीवर करायला हवा. माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, कितीही अडचणी असल्या तरी अपघातांमधील जखमींना मदत करण्यासाठी पुढे होण्यात संकोच करू नका. याने अनेकांचे प्राण वाचू शकतील आणि माणुसकी हरवलेल्या हल्लीच्या काळातही म्हणता येईल:चंद हाथो मे ही सही महफूज हैं।शुक्र है इंसानियत का भी वजूद हैं।

टॅग्स :Accidentअपघात