शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक अन् संवेदनशील बंगालबाबत जरा जपूनच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:16 IST

बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे.

बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे. ते दीर्घकाळ डाव्यांच्या ताब्यात राहिले आहे. स्वत: ममता बॅनर्जी या शीघ्रकोपी नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. तसा सारा बंगालच कमालीचा शीघ्रकोपी व आत्मनिष्ठ आहे.गोवा, मेघालय, कर्नाटक आणि आता बंगाल. भाजपच्या ‘सर्व राज्ये स्वाहा’ या सध्याच्या धोरणाचा स्पर्श आता बंगालला झाला आहे. त्या पक्षाचे एक प्रवक्ते महेश जोशी म्हणाले, बंगालचे १०७ आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व कम्युनिस्ट या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. भाजपचा अलीकडचा इतिहास पाहता त्यांच्या वक्तव्यात तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. अडचण एवढीच की बंगाल हे पंजाब आणि काश्मीरसारखे कमालीचे संवेदनशील राज्य आहे. ते दीर्घकाळ डाव्यांच्या ताब्यात राहिले आहे. स्वत: ममता बॅनर्जी या शीघ्रकोपी नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. तसा सारा बंगालच कमालीचा शीघ्रकोपी व आत्मनिष्ठ आहे. ज्या काळात अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा होती त्या ब्रिटिशकाळात तेथील तुरुंगात महाराष्ट्राचे तीन तर एकट्या बंगालचे २५० स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा बंगालमध्ये बंगाली राष्ट्रवादाने उचल खाल्ली होती. त्याचे नेतृत्व लीगचे शहीद सु-हावर्दी आणि सुभाषचंद्रांचे भाऊ शरदचंद्र बोस हे करीत होते.

या शरदचंद्रांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन नेहरूंनी त्यांचा झेंडा उतरवायला लावला होता. त्या राज्याने थेट टाटांना चटके दिले. तेथील नक्षलवादी चळवळ त्याने जागीच संपविली आहे. अशा राज्याच्या राजकारणात तोडफोड व पक्षांतर घडवून आणण्याचे भाजपचे कृत्य त्याच्यासकट साऱ्या देशावर उलटू शकते ही बाब लक्षात घ्यावी एवढी गंभीर आहे. बंगाल हे मुळातूनच डावे, क्रांतिकारी व स्वत:च्या स्वतंत्र बाण्यावर कमालीचा भरोसा असलेले राज्य आहे. देशबंधू दास, सुभाषबाबू, अरविंद घोष, नवनिर्माण चळवळ, युगांतर व पुढे नक्षलवाद हा त्याचा इतिहास कमालीचा उग्र राहिला आहे. ममता बॅनर्जींचा उदय, उठाव आणि आक्रमकता या पार्श्वभूमीवर पाहायची आहे. त्यांना भाजप नको, काँग्रेस नको आणि तिसरी आघाडीही नको. त्या आणि फक्त त्याच स्वत:ला बंगालच्या तारणहार मानणा-या नेत्या आहेत. त्यांना डिवचून केंद्र सरकार एका नव्या व न संपणा-या संघर्षाला तोंड द्यायला सज्ज झाले आहे. ममता बॅनर्जी या सहजपणे समजूत पटणा-या नेत्या नाहीत. त्या केंद्रावर कशाही उलटू शकतात आणि त्यांचा पक्षही त्यांच्याएवढाच आक्रमक व फारशी भीडभाड नसणारा आहे. त्यामुळे गोव्यात जे झाले आणि कर्नाटकात जे होत आहे ते तसेच बंगालमध्ये होईल, अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. आपण नव्याने पंजाब व काश्मीरसारखे आणखी काही करून टाकू अशी याची भीती केंद्राने त्याचमुळे बाळगली पाहिजे. तृणमूल काँग्रेस पक्षाला कोणतीही भूमिका वा विचार नाही. ममता दाखवतील तीच त्याची दिशा आहे. पण तो पक्ष बलशाली आहे, त्याचे विधानसभेत बहुमत आहे आणि चोवीस खासदार लोकसभेत आहेत. उद्या ममताबाई तेथील जनतेला केंद्रविरोधी लढ्याचा आदेश देऊ शकतील व तेथील जनतेच्या मनात आजवर झालेल्या अन्यायाचा रोष एखादेवेळी उफाळूनही येईल.
सुभाषबाबूंच्या नंतरचा फॉरवर्ड ब्लॉक, युगांतर व नवनिर्माण या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला कम्युनिस्ट पार्टीतील प्रवेश आणि आता त्याच्या जोडीला प्रत्यक्ष तृणमूल काँग्रेस तो संघर्ष केंद्रालाही फार जड जाईल. मणिपूर, नागालॅन्ड, मिझोरम आणि आसाम ही पूर्वेकडील राज्ये तशीही अशांत आहेत. त्यातून बंगाली माणूस एकदम भडकून उठतो. त्याने टाटांचे आणि त्यांच्या नॅनो गाडीचे काय केले हा इतिहास ताजा आहे. केंद्र व विशेषत: त्यातील गृहमंत्री अमित शहा यांना नको तशा प्रतिज्ञा नको त्या वेळी करण्याचा सोस आहे. बंगालातील तृणमूल काँग्रेसची राजवट उखडून टाकण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. हे भांडण राजकारणापुरते मर्यादित आहे तर एकदाचे ठीक, पण ते जनतेचे झाले तर मात्र त्याचा स्फोट मोठा होईल आणि सा-या देशाला दीर्घकाळ मनस्ताप भोगावा लागेल. जी गोष्ट गोव्यात करता येते किंवा कर्नाटकात यशस्वी होते ती देशात सर्वत्र यशस्वी होईलच असे नाही. तसाही आपला देश बहुविध प्रवृत्तींचा आहे आणि बंगालची प्रवृत्ती कमालीची आक्रमक व संवेदनशीलही आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहा