शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या खुणा पुसणेच बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2023 07:27 IST

तीन कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सादर केले. 

थॉमस बेविंग्टन मेकॉले हे नाव बहुतेक सगळ्या शिकल्यासवरल्या भारतीयांना परिचयाचे आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेला इंग्रजी भाषेची ओळख घडविणारे मेकॉलेचे १८३५ च्या फेब्रुवारीमधील मिनट ऑन इंडियन एज्युकेशन' टिपण व्हाइसरॉय लॉर्ड विल्यम बेंटिक याने स्वीकारले आणि भारतीय भाषांसोबत इंग्रजी आपल्या विद्यालयांमध्ये आली. इंग्रजांचे नोकर तयार करणारी भाषा आणली म्हणून मेकॉले हा अतिदेशप्रेमी भारतीयांचा खलनायक बनला. आजही शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी भाषा कायम आहे. किंबहुना अधिक खोलवर रुजली आहे. तसाही भाषेचा दुस्वास करणे चांगले नसतेच. 

परंतु, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, १८५७ च्या बंडावेळी विधि आयोगाचा महत्त्वाचा ज्येष्ठ सदस्य म्हणून याच मेकॉलेने इंग्लंडला परत जाण्यापूर्वी वसाहतकालीन इतिहासावर उमटवलेली दुसरी मुद्रा पुसण्याची प्रक्रिया मात्र सुरू झाली आहे. १८६० चा इंडियन पिनल कोड किंवा भारतीय दंड संहिता या कायद्याचे प्रारूप तयार करूनच मेकॉले मायदेशी गेला. त्याच प्रारूपातून १८७२ मध्ये इंडियन एव्हिडन्स अॅक्ट तयार झाला. हे दोन्ही कायदे तसेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९७३ मध्ये आलेला क्रिमिनल प्रोसिजर कोड या तीन कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणारे विधेयक गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी सादर केले. 

इंडियन पिनल कोड म्हणजे 'आयपीसी'ऐवजी भारतीय न्याय संहिता, क्रिमिनल प्रोसिजन कोड अर्थात सीआरपीसी ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स अॅक्टऐवजी भारतीय साक्ष बिल नावाने हे नवे कायदे अस्तित्वात येतील. ३५६ कलमांची भारतीय न्याय संहिता तयार करताना जुन्या आयपीसी मधील देशद्रोहाच्या कलमासह २२ तरतुदी वगळल्या आहेत. १७५ तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर ८ नवी कलमे वाढविण्यात आली आहेत. 'सीआरपीसी मधील ९ तरतुदी रद्द करताना १६० तरतुदींमध्ये बदल, तर ९ नव्या तरतुदी वाढविल्या आहेत. साक्ष बिलातही जुन्या ५ तरतुदी रद्द करून २३ कलमांमध्ये बदल, तर १ नवे कलम वाढविले आहे. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील बहुमत लक्षात घेता हे नवे कायदे संमत होण्यात अडचण नाही. हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याने देशभर चर्चा स्वाभाविक आहे. हे समग्र भारतीय दंड विधानाचे भारतीयीकरण आहे हे नक्की. तथापि, हिंदीबद्दल सतत आक्षेप असणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांनी कायद्यांच्या नावांबद्दल नोंदविलेले आक्षेप लक्षात घेता हे भारतीयीकरण आहे की हिंदीकरण आहे, यावर आणखी चर्चा होत राहील. हा वाद बाजूला ठेवला तरी ब्रिटिश आमदानीच्या वसाहतीच्या पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकणाऱ्या या सरकारच्या प्रयत्नाचे सर्वदूर स्वागत व्हायला हवे होते. 

हा केवळ त्या खुणा पुसण्याचाच प्रयत्न नाही, तर काळानुरूप बदल म्हणून, एकविसाव्या शतकातील बदलता समाज, बदलते लोकजीवन, बदलते लोकमानस राहण्या-वागण्याच्या बदलत्या पद्धती या दृष्टीने करावयाचे कायद्यांमधील बदल म्हणूनही याकडे पाहायला हवे. उदाहरणार्थ, अलीकडे मोठ्या संख्येने स्त्रिया नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत. त्यांना नोकरी किंवा उपजीविकेच्या साधनांचे आमिष दाखवून स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. अशा अपराधासाठी नव्या कायद्यात स्वतंत्र कलम आणले गेले आहे. दुसरे उदाहरण- गेल्या काही वर्षांमध्ये गोवंश किंवा गोमांस तस्करी अथवा कुठल्या तरी अफवांना बळी पडून मॉब लिंचिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशा झुंडींकडून होणाऱ्या हत्यांसाठी आता अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

अल्पवयीन मुले किंवा मुलींवर होणारे अत्याचार हा आपल्या समाजासाठी एकूणच चिंतेचा विषय असल्याने नव्या कायद्यात त्या अपराधांसाठी अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, गुन्ह्यांचा तपास वेळेत व्हावा, दोषारोपपत्र ठरावीक मुदतीत दाखल व्हावे, न्यायालयानेही आरोपींवर दोषारोपण वेळेत करावे आणि सुनावणी झाल्यानंतर ठरावीक मुदतीत निकाल द्यावा, अशा महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतर साधारण परिस्थितीत ९० दिवस, असाधारण परिस्थितीत आणखी नव्वद दिवस ही चार्जशीट दाखल करण्याची आणखी ६० दिवसांत दोषारोपण व सुनावणी संपल्यानंतर तीस दिवसांत निकाल, समरी ट्रायल प्रकारच्या म्हणजे कमाल दोन वर्षांची शिक्षा असलेल्या किरकोळ गुन्ह्यांचा निकाल तीन वर्षांच्या आत लावण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे तुंबलेले खटले निकाली निघण्यास मदत होईल.

 

टॅग्स :ParliamentसंसदAmit Shahअमित शाह