शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: दहा लाखांची बात! सरकारी कर्मचाऱ्यांची भरती हासुद्धा गाजावाजा ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 10:24 IST

एप्रिलमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशासह पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका ते दीड वर्षानी सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला प्रारंभ होणार, याचा मात्र निश्चितच संबंध आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी हवेत झेप घेत असतानाच पंतप्रधान कार्यालयाने एक ट्विट करून येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचा दौरा आणि या घोषणेच्या वेळेचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. एप्रिलमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशासह पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका ते दीड वर्षानी सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला प्रारंभ होणार, याचा मात्र निश्चितच संबंध आहे!

केंद्रीय कर्मचारी सेवा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी १ मार्च २०२० रोजी संसदेत सांगितले होते की, केंद्र सरकारच्या सर्व खात्यांसाठी मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या ४० लाख ५ हजार आहे. मात्र, प्रत्यक्षात ३१ लाख ३२ हजारच कर्मचारी आहेत. सुमारे ८ लाख ७२ हजार जागा रिक्त आहेत. याला दोन वर्षे लोटली आहेत. पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका चालू होत्या, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्याच्या सचिवांची बैठक घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा आढावा घेतला होता. अपेक्षित कर्मचारी संख्येची यादी करायला सांगितली होती. त्याची वार्ता पसरली आणि तोवर निवडणुका पार पडल्या.

आत्तापासून तयारी करून बरोबर २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर दहा लाख कर्मचारी सेवेत घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वास्तविक, पाहता गेल्या दोन वर्षांतील कोराेना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे कोट्यवधी नोकऱ्या कमी झाल्या. बेरोजगारीचा आकडा गेल्या ५० वर्षांत वाढला नाही, इतका तो या काळात वाढला आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. अशा वेळी चलनवाढ आणि महागाई वाढली तरी लोकांच्या हाती पैसा येण्यासाठी योजना आखणे आवश्यक आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशाच्या इतिहासात प्रथमच अर्थमंत्र्यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषदा घेऊन असंख्य घोषणा केल्या. सुमारे वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ते वीस लाख कोटी रुपये कोठे गेले, त्यातून रोजगार वाचवू शकलो का, ते खर्ची तरी पडले का, याचा  अर्थमंत्रालयानेच आढावा घेऊन श्वेतपत्रिका जाहीर करायला हवी.

सरकारी कर्मचाऱ्यांची भरती हासुद्धा असाच गाजावाजा ठरणार आहे. अनेक वर्षे पदे न भरता रिक्त ठेवायची. त्याचा आकडा फुगला की मोठी घोषणा केल्याचा आव आणायचा. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पावणेआठ लाख पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची ही योजना आहे. नवा रोजगार निर्मितीचा ती भाग ठरत नाही. रोजगार वाढतील कसे, याचा विचारच होताना दिसत नाही. व्यापार किंवा उलाढाल वाढून अर्थव्यवस्था वाढत नाही. उत्पादनात वाढ झाली तरच रोजगारवृद्धी हाेऊ शकते. पंतप्रधान कार्यालयाचे ट्विट लोकांपर्यंत पोहोचते ना पोहोचते तोवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसह  पत्रकार परिषद घेऊन ‘अग्निपथ’ नावाची नवी सैन्यभरतीची योजना जाहीर केली.

भारतीय लष्कराच्या आजवरच्या प्रथा-परंपरा आणि विश्वासाला छेद देणारी ही योजना आहे. या याेजनेखाली लष्करात भरती होणाऱ्या सैनिकास केवळ चार वर्षेच सेवेत ठेवून घेतले जाईल. यापूर्वी किमान पंधरा वर्षे सेवा असायची आणि त्या निवृत्त सैनिकास आजन्म निवृत्तीवेतन मिळत असे. निवृत्त सैनिकांवरील वेतनाचा खर्च बंद करण्यासाठी केवळ चार वर्षेच सेवेत ठेवून बेरोजगारांच्या गर्दीत त्यास ढकलून देण्याची योजनाच तयार केली आहे. वयाच्या साडेसतरा ते एकवीस वर्षांच्या तरुणांना सेवेत घेतले जाईल.

सहा महिने प्रशिक्षण दिले जाईल आणि साडेतीन वर्षांनंतर सेवा खंडित करून सरकार त्याच्याशी संबंध तोडून टाकेल. निवृत्त सैनिक म्हणून कोणतीही सवलत मिळणार नाही. विसाव्या वर्षी भरती झालेला हा तरुण चोविसाव्या वर्षीच नोकरीतून काढून टाकला जाईल. सैनिकांना अशा पद्धतीची वागणूक देण्याची योजना सरकार कशी काय आखू शकते? एकीकडे सरकारी नोकर भरती करीत असल्याचे जाहीर करीत असतानाच सैन्यभरतीची ही योजना संतापजनक आहे. सरकार अनेक योजनांवर अनावश्यक खर्च करते. गोव्याच्या मंत्रिमंडळाच्या अठरा मिनिटांच्या शपथविधी समारंभावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे उदाहरण लक्षात घेऊन राजभवनावरच मंत्रिमंडळांचे शपथविधी होतील, असा नियमच करावा. एकीकडे रोजगार निर्मिती नसताना मंजूर, पण रिक्त जागा भरून येणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नाचा डांगोरा पेटवायचा, हेच यामागचे सार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी