शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

‘मूडी’चे अर्थकारण व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:03 IST

राज्यात दरदिवशी आठ शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात ही बातमी सरकारचा मूड घालविणारी आणि जनतेला सत्याच्या जवळ नेणारी आहे.

मूडी या अर्थकारणाचे सर्वेक्षण करणा-या जागतिक यंत्रणेने भारताचा आर्थिक विकासदर चांगला असल्याचे प्रशस्तीपत्र दिल्याच्या दुस-याच दिवशी महाराष्ट्र या देशातील एकाच राज्यात दरदिवशी आठ शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात ही बातमी सरकारचा मूड घालविणारी आणि जनतेला सत्याच्या जवळ नेणारी आहे. सरकार किंवा त्यातले जेटली नावाचे मंत्री जागतिक संघटनांना बनवू शकतील. त्यांना आपल्या सोयीची आकडेवारी पाठवून आपली पाठ थोपटून घेऊ शकतील आणि भाजपाचे ढोलताशेवाले त्यावर एकदोन दिवस मिरवणुका काढू शकतील. पण दरदिवशी एकेका गावात निघणा-या शेतक-यांच्या अंत्ययात्रांचे वास्तव त्यामुळे कसे झाकले जाऊ शकेल? सरकारी सत्य आणि जनतेचे सत्य असे सत्याचे दोन अनुभव देश सध्या घेत आहे. त्यातला सरकारचा अनुभव संशयास्पद तर जनतेचा खरा आहे. शेतक-यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे सरकारांनी सांगितले. प्रत्यक्षात ते किती थोड्या शेतक-यांचे माफ झाले हे दुस-याच दिवशी प्रकाशित झाले. आपण जे सांगतो त्याचे खरेपण निदान दोन दिवस तरी टिकून राहील याची काळजी अशावेळी सरकारनेच घ्यायला पाहिजे. लोक बोलत नाहीत, सारे काही पचवून शांत राहतात याचा अर्थ आपले असत्य खपले असा सरकारांनी घेता कामा नये आणि मूडीसारख्या ज्या दूरवरच्या यंत्रणांनीही सरकारचे सत्य जरा पडताळूनच पाहिले पाहिजे. जागतिक स्तरावर काम करताना या यंत्रणा त्यांना सरकारने पुरविलेल्या कागदोपत्री माहितीवर विसंबून राहूनच त्यांचे निष्कर्ष जाहीर करतात. समाजातल्या कोणत्या स्तरापर्यंत त्यातले काय व किती पोहचले याची भ्रांत त्याही ठेवीत नाहीत. त्यामुळे सरकारी उत्पादन वाढले असे त्या सांगत असल्या तरी त्या उत्पादनाचा किती भाग जनतेच्या वाट्याला आला याची सत्यता त्या कशी सांगणार? एकेकाळी लोकशाही सरकारे निवडणुका जिंकायला युद्ध तंत्राचा वापर करीत. निवडणूक जवळ आली की शेजारच्या दुबळ््या देशाशी कुरापत काढून त्याला कसला तरी धडा शिकवीत आणि त्या बळावर आपल्या पराक्रमाची जाहिरात करून निवडणुका जिंकीत. आताचे तंत्र प्रशस्तीपत्रे मिळविण्याचे आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक आली की, स्वत:च्या देशात बदनाम असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींची तारीफ करतात आणि भारत हा आपला विश्वसनीय देश असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात पाकिस्तानला लष्करी मदत करून भारताशी मैत्री असल्याचे जगाला सांगणारा हा प्रकार आहे. याच काळात चीनचे शी जिनपिंग अरुणाचलवरचा हक्क मागे न घेता मनिलामध्ये मोदींवर स्तुतिसुमने उधळतात आणि त्यातली थोडी सुमने मोदी अहमदाबादेत आणतात. आंतरराष्ट्रीय राजकारण हे सरकारांचे राजकारण असते. तसे त्याचे अर्थकारणही सरकारीच असते. त्याचा जनतेच्या प्रत्यक्ष जीवनाशी फार थोडा संबंध असतो. त्यामुळे देशात दरदिवशी डझनांनी लोक आत्महत्या करीत असले तरी त्याचे अर्थकारण सबळ असल्याचेच तिकडे सांगितले जाणार. जेथे धार्मिक व जातीय अंधश्रद्धा मोठ्या असतात त्यात ही आर्थिक बुवाबाजीही खपणारी असते. जागतिक संस्थांना त्याचमुळे सरकारी पातळीवर न थांबता जनतेपर्यंत यावे लागेल किंवा जनतेत काम करणाºया संस्था-संघटनांना याविषयीचे वास्तव तिथवर पोहचवावे लागेल. यातले काहीही उद्या झाले नाही तरी जनतेला तिच्या खºया अडचणींची जाणीव होतच असते. ही दुखरी जाणीवच तिला निवडणुकीत सक्रिय करीत असते. त्यासाठी मूडीची फसवणूक कामी येत नाही आणि ट्रम्पचे सर्टिफिकेटही मोलाचे ठरत नाही. जनतेची ही जाणीवच लोकशाहीची खरी ताकद असते.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या