शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मूडी’चे अर्थकारण व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:03 IST

राज्यात दरदिवशी आठ शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात ही बातमी सरकारचा मूड घालविणारी आणि जनतेला सत्याच्या जवळ नेणारी आहे.

मूडी या अर्थकारणाचे सर्वेक्षण करणा-या जागतिक यंत्रणेने भारताचा आर्थिक विकासदर चांगला असल्याचे प्रशस्तीपत्र दिल्याच्या दुस-याच दिवशी महाराष्ट्र या देशातील एकाच राज्यात दरदिवशी आठ शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात ही बातमी सरकारचा मूड घालविणारी आणि जनतेला सत्याच्या जवळ नेणारी आहे. सरकार किंवा त्यातले जेटली नावाचे मंत्री जागतिक संघटनांना बनवू शकतील. त्यांना आपल्या सोयीची आकडेवारी पाठवून आपली पाठ थोपटून घेऊ शकतील आणि भाजपाचे ढोलताशेवाले त्यावर एकदोन दिवस मिरवणुका काढू शकतील. पण दरदिवशी एकेका गावात निघणा-या शेतक-यांच्या अंत्ययात्रांचे वास्तव त्यामुळे कसे झाकले जाऊ शकेल? सरकारी सत्य आणि जनतेचे सत्य असे सत्याचे दोन अनुभव देश सध्या घेत आहे. त्यातला सरकारचा अनुभव संशयास्पद तर जनतेचा खरा आहे. शेतक-यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे सरकारांनी सांगितले. प्रत्यक्षात ते किती थोड्या शेतक-यांचे माफ झाले हे दुस-याच दिवशी प्रकाशित झाले. आपण जे सांगतो त्याचे खरेपण निदान दोन दिवस तरी टिकून राहील याची काळजी अशावेळी सरकारनेच घ्यायला पाहिजे. लोक बोलत नाहीत, सारे काही पचवून शांत राहतात याचा अर्थ आपले असत्य खपले असा सरकारांनी घेता कामा नये आणि मूडीसारख्या ज्या दूरवरच्या यंत्रणांनीही सरकारचे सत्य जरा पडताळूनच पाहिले पाहिजे. जागतिक स्तरावर काम करताना या यंत्रणा त्यांना सरकारने पुरविलेल्या कागदोपत्री माहितीवर विसंबून राहूनच त्यांचे निष्कर्ष जाहीर करतात. समाजातल्या कोणत्या स्तरापर्यंत त्यातले काय व किती पोहचले याची भ्रांत त्याही ठेवीत नाहीत. त्यामुळे सरकारी उत्पादन वाढले असे त्या सांगत असल्या तरी त्या उत्पादनाचा किती भाग जनतेच्या वाट्याला आला याची सत्यता त्या कशी सांगणार? एकेकाळी लोकशाही सरकारे निवडणुका जिंकायला युद्ध तंत्राचा वापर करीत. निवडणूक जवळ आली की शेजारच्या दुबळ््या देशाशी कुरापत काढून त्याला कसला तरी धडा शिकवीत आणि त्या बळावर आपल्या पराक्रमाची जाहिरात करून निवडणुका जिंकीत. आताचे तंत्र प्रशस्तीपत्रे मिळविण्याचे आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक आली की, स्वत:च्या देशात बदनाम असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींची तारीफ करतात आणि भारत हा आपला विश्वसनीय देश असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात पाकिस्तानला लष्करी मदत करून भारताशी मैत्री असल्याचे जगाला सांगणारा हा प्रकार आहे. याच काळात चीनचे शी जिनपिंग अरुणाचलवरचा हक्क मागे न घेता मनिलामध्ये मोदींवर स्तुतिसुमने उधळतात आणि त्यातली थोडी सुमने मोदी अहमदाबादेत आणतात. आंतरराष्ट्रीय राजकारण हे सरकारांचे राजकारण असते. तसे त्याचे अर्थकारणही सरकारीच असते. त्याचा जनतेच्या प्रत्यक्ष जीवनाशी फार थोडा संबंध असतो. त्यामुळे देशात दरदिवशी डझनांनी लोक आत्महत्या करीत असले तरी त्याचे अर्थकारण सबळ असल्याचेच तिकडे सांगितले जाणार. जेथे धार्मिक व जातीय अंधश्रद्धा मोठ्या असतात त्यात ही आर्थिक बुवाबाजीही खपणारी असते. जागतिक संस्थांना त्याचमुळे सरकारी पातळीवर न थांबता जनतेपर्यंत यावे लागेल किंवा जनतेत काम करणाºया संस्था-संघटनांना याविषयीचे वास्तव तिथवर पोहचवावे लागेल. यातले काहीही उद्या झाले नाही तरी जनतेला तिच्या खºया अडचणींची जाणीव होतच असते. ही दुखरी जाणीवच तिला निवडणुकीत सक्रिय करीत असते. त्यासाठी मूडीची फसवणूक कामी येत नाही आणि ट्रम्पचे सर्टिफिकेटही मोलाचे ठरत नाही. जनतेची ही जाणीवच लोकशाहीची खरी ताकद असते.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या