शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

धम्म संस्कृती जपण्याचा खरा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:55 AM

-बी.व्ही. जोंधळे, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर, १९५६ साली आपल्या लक्षावधी अनुयायांसह धर्मांतर करून बुद्ध धम्माचा स्वीकार ...

-बी.व्ही. जोंधळे, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासकबाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर, १९५६ साली आपल्या लक्षावधी अनुयायांसह धर्मांतर करून बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध समाजात एक स्वाभिमान आला. समतेची जाणीव निर्माण झाली. अन्यायाविरुद्ध तो बंड करू लागला. परिणामी, हजारो वर्षे ज्या पूर्वास्पृश्य समाजाला गुलामगिरीची पशुतुल्य वागणूक देण्याचा अमानुष-अमानवी संस्कार हिंदू सवर्ण समाजव्यवस्थेवर झाला होता. ती विषमतावादी समाजव्यवस्था खवळून उठली. बौद्ध समाजाचे अस्मितादर्शक बंड मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. बौद्धांविषयी गैरसमज पसरविण्यात येऊ लागले. त्यातील एक मोठा गैरसमज म्हणजे बौद्धांची खूपच मोठी आर्थिक प्रगती झाली, हा एक होय. बौद्ध समाजाने खरे तर धर्मांतराची एक मोठी किंमत मोजल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती नाजूकच आहे, हे खरे वास्तव आहे.२०१२च्या आकडेवारीनुसार बौद्धांचा दरडोई खर्च सर्वात कमी म्हणजे ४६२ रुपये आहे, तर मुस्लिमांचा दरडोई खर्च ६२१ रुपये व हिंदूंचा दरडोई ६३६ रुपये खर्च बौद्धांपेक्षा कितीतरी जास्त आहे. २०१२ची आकडेवारी सांगते की, महाराष्ट्रात एकंदर १७ टक्के गरिबी असून, त्यात बौद्ध समाजाचे गरिबीचे प्रमाण २८ टक्के आहे, शिवाय शहरात राहणाऱ्या आदिवासी व अनुसूचित जातींतील गरिबीचे प्रमाण २३ टक्के आहे, तर बौद्धांचे सर्वात जास्त म्हणजे २५ टक्के आहे.बौद्ध समाजातील शिक्षणाचा प्रसार समाधानकारक जरी असला, तरी २०१४ च्या आकडेवारीनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेत नाव नोंदविण्याचे प्रमाण बौद्ध समाजात कमी आहे. इंग्रजी माध्यमाच्या, तसेच खासगी शाळांतून बौद्ध विद्यार्थ्यांचे ३६ टक्के, तर याच शाळेतील मुस्लीम मुलांचे प्रमाण ८४ टक्के व हिंदू मुला-मुलींचे प्रमाण ६३ टक्के आहे. याचा अर्थ, बौद्ध समाजातील मुले-मुली अजूनही सरकारी शाळांवर अवलंबून आहेत. शालान्त व बारावी परीक्षेच्या आधी शाळा सोडणाºयांमध्ये बौद्धांचे प्रमाण ४१ टक्के, ओबीसी ३५ टक्के, तर उच्च जातीची २६ टक्के मुले असतात.बौद्ध समाजाच्या गरिबीचे कारण म्हणजे या समाजाकडे उत्पादनाची कुठलीही साधने नाहीत, हे आहे. रोजंदारीवर हा समाज जगतो. व्यापार उद्योगात बौद्ध समाज अवघा २ टक्के आहे. त्याच्याकडे जमीन नाही. परिणामी, हिंदू दलितांत ३६ टक्के समाज रोजंदारीवर अवलंबून असताना बौद्धांचे प्रमाण मात्र ४६ टक्के आहे. बौद्ध समाजातील बेरोजगारीचे प्रमाण ९ टक्के, हिंदू अनुसूचित जातीत ५.६ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के ही २०१२ची आकडेवारी बोलकी आहे.बौद्ध समाजातील बेरोजगारीचे कारण म्हणजे नोकरी देताना त्यांच्याशी केला जाणारा भेदभाव होय. खासगी क्षेत्रातही बौद्धांना डावलले जाते. बौद्ध व्यापारी व उद्योजकांशी व्यवहार टाळले जातात. भेदभावामुळे जातीय अत्याचार वाढतात. २०१४मध्ये अत्याचार झालेल्यांमध्ये ५८ टक्के बौद्ध होते. सबब बौद्ध समाजाचा आर्थिक विकास करावयाचा, तर सरकारने आपले विकासविषयक धोरण बदलले पाहिजे. बौद्ध समाजातील उद्योजकांची संख्या वाढविली पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत बौद्धांना प्राधान्याने स्थान दिले पाहिजे. माणुसकीचे हक्क प्राप्त करून घेण्यासाठी केलेल्या धर्मांतराची किंमत आज बौद्ध समाज मोजतो आहे, हे थांबले पाहिजे.डॉ. आंबेडकरांची लढाऊ चळवळ बुद्ध धम्माचा स्वीकार, यामुळे बौद्ध समाजाचा स्वाभिमान जागा होऊन, जेव्हा तो विषमतावादी प्रथा परंपरेविरुद्ध लढू लागला, तेव्हा याचा राग प्रस्थापित समाजव्यवस्थेस येणे गैर जरी असले, तरी स्वाभाविक आहे. याचा अर्थ, उभा हिंदू समाज आपला शत्रू आहे, असे समजून बौद्ध समाजानेही अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढताना अद्वातद्वा वागण्या-बोलण्याचा मोह टाळला पाहिजे. बाबासाहेबांचा समतेचा लढा, त्यांचा धम्म स्वीकार हा सुडाचा प्रवास नव्हता. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना ही बाब वेळोवेळी निक्षून सांगितली होती. तेव्हा बौद्ध समाजानेसुद्धा समतेची लढाई पुढे नेताना समन्वयाचा, सुसंवादाचा मार्गच अवलंबिला पाहिजे आणि बहुसंख्याक म्हणून हिंदू समाजानेही अन्याय, अत्याचाराविरोधी बौद्ध समाजाचा सात्विक संताप समजून घेऊन मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हाच खरा संदेश आहे.अजून असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारताना आपल्या समाजबांधवांना उद्देशून असे म्हटले होते की, बौद्ध धर्माचे आचरण आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे. अन्यथा जग उद्या महारांनी बौद्ध धर्म बाटविला, असे म्हणेल. बाबासाहेबांनी याच दृष्टीने नवदीक्षित बौद्धांना २२ प्रतिज्ञासुद्धा दिल्या होत्या. या २२ प्रतिज्ञांचे सार म्हणजे मी देवदेवता मानणार नाही, कर्मकांड करणार नाही, जाती पाळणार नाही, व्यभिचार करणार नाही, दारू पिणार नाही, असे होते. तेव्हा प्रश्न असा की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्म संस्कृती आपण निर्माण करू शकलो काय याचाही आजच्या धम्मचक्र प्रवर्तनदिनी विचार झाला पाहिजे, दुसरे काय?