शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

कराचीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 23:40 IST

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं नुकताच मांडला आहे, त्यानुसार कराचीतल्या ९० टक्के तरुणांच्या मते कराचीत रोजगाराच्या वा विकासवाढीच्या काहीही संधी नाहीत, तर किमान ४८ टक्के तरुण, संधी मिळाल्यास ‘पाक सरजमीं’ सोडून तातडीनं परदेशी जायला तयार आहेत! विद्यापीठानं अमेरिकन वकिलातीच्या अधिकाऱ्यांसमोरच एका जाहीर कार्यक्रमात जो शोधनिबंध प्रसिद्ध केला, त्यात या वास्तवाची मांडणी केली आहे. ‘डिटर्मिनेशन आॅफ यूथ इमिग्रेशन’ अर्थात ‘तरुणांची स्थलांतरामागची प्रबळ इच्छा’ हा या शोधनिबंधाचा विषय होता. हा शोधनिबंध म्हणतो की, ४१ टक्के तरुणांना राजकीय अस्थैर्य असल्यामुळे शहरातल्या कुठल्याही विकासकामात सहभागी व्हावं असं वाटत नाही. आजच्या घडीला कराचीतली ३० टक्के, म्हणजे सुमारे २.२ कोटी लोकसंख्या १५ ते २९ वर्षे या वयोगटातील आहे व त्यातील ९० टक्क्यांना असे वाटते की, या शहरात आपल्याला काही भवितव्यच नाही. रोजगाराचा अभाव, असुरक्षितता, आर्थिक चणचण आणि भवितव्यात काहीही भलं न घडण्याची ठाम खात्री या मुलांना देशत्याग करण्यास भाग पाडत असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेले ‘गॉलअप’ हे दुसरे सर्वेक्षण सांगते की, शक्य झाल्यास पाकिस्तानातल्या दोन तृतियांश लोकसंख्येला हा देश सोडून जगात कुठं तरी सुरक्षित आणि विकसित, शांत देशात जायचं आहे. अमेरिकेतल्या एमआयटी, स्टॅनफर्ड आणि वॉल्टन स्कूल आॅफ बिझनेस इथं शिकलेल्या पाकिस्तानी बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ऐंशीच्या दशकात ‘गॉलअप पाकिस्तान’ ही संशोधन संस्था स्थापन केली होती. आजही ही संस्था आणि इतर समाज विचारवंत पाकिस्तानातल्या ‘ब्र्रेनड्रेन’ची चिंता व्यक्त करत हतबल आहेत. देशात शिक्षण, आरोग्य या विषयात काम करायला माणसं तयार नाहीत, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कराची विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गेल्या सहा वर्षात ३७ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून अन्य देशात, विशेषत: आखाती देशात आसरा घेतला आणि २०१५ या एकाच वर्षात १० लाख लोक देश सोडून निघून गेले. शिकणाऱ्या तरुण मुलांना कराचीत कुणी राहायला जागा देत नाही कारण ‘एकेकट्यां’वर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही इतकी दहशत आहे आणि हिंदू तसेच शिया मुस्लीम मुलांना घरच काय नोकरी मिळण्याचीही मारामार आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत कराची शहरात हे घडत असेल तर अन्य भागात काय खस्ता हालात असतील, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान, ‘सिंध’ प्रांतात आता अशाच कारणास्तव अशांतता पसरू लागली असून, बलुचींच्या क्षोभापाठोेपाठ आता सिंधमधील असंतोष ही पाकी सरकारसमोरील अजून एक धोक्याची घंटा आहे.