शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कराचीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 23:40 IST

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं नुकताच मांडला आहे, त्यानुसार कराचीतल्या ९० टक्के तरुणांच्या मते कराचीत रोजगाराच्या वा विकासवाढीच्या काहीही संधी नाहीत, तर किमान ४८ टक्के तरुण, संधी मिळाल्यास ‘पाक सरजमीं’ सोडून तातडीनं परदेशी जायला तयार आहेत! विद्यापीठानं अमेरिकन वकिलातीच्या अधिकाऱ्यांसमोरच एका जाहीर कार्यक्रमात जो शोधनिबंध प्रसिद्ध केला, त्यात या वास्तवाची मांडणी केली आहे. ‘डिटर्मिनेशन आॅफ यूथ इमिग्रेशन’ अर्थात ‘तरुणांची स्थलांतरामागची प्रबळ इच्छा’ हा या शोधनिबंधाचा विषय होता. हा शोधनिबंध म्हणतो की, ४१ टक्के तरुणांना राजकीय अस्थैर्य असल्यामुळे शहरातल्या कुठल्याही विकासकामात सहभागी व्हावं असं वाटत नाही. आजच्या घडीला कराचीतली ३० टक्के, म्हणजे सुमारे २.२ कोटी लोकसंख्या १५ ते २९ वर्षे या वयोगटातील आहे व त्यातील ९० टक्क्यांना असे वाटते की, या शहरात आपल्याला काही भवितव्यच नाही. रोजगाराचा अभाव, असुरक्षितता, आर्थिक चणचण आणि भवितव्यात काहीही भलं न घडण्याची ठाम खात्री या मुलांना देशत्याग करण्यास भाग पाडत असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेले ‘गॉलअप’ हे दुसरे सर्वेक्षण सांगते की, शक्य झाल्यास पाकिस्तानातल्या दोन तृतियांश लोकसंख्येला हा देश सोडून जगात कुठं तरी सुरक्षित आणि विकसित, शांत देशात जायचं आहे. अमेरिकेतल्या एमआयटी, स्टॅनफर्ड आणि वॉल्टन स्कूल आॅफ बिझनेस इथं शिकलेल्या पाकिस्तानी बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ऐंशीच्या दशकात ‘गॉलअप पाकिस्तान’ ही संशोधन संस्था स्थापन केली होती. आजही ही संस्था आणि इतर समाज विचारवंत पाकिस्तानातल्या ‘ब्र्रेनड्रेन’ची चिंता व्यक्त करत हतबल आहेत. देशात शिक्षण, आरोग्य या विषयात काम करायला माणसं तयार नाहीत, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कराची विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गेल्या सहा वर्षात ३७ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून अन्य देशात, विशेषत: आखाती देशात आसरा घेतला आणि २०१५ या एकाच वर्षात १० लाख लोक देश सोडून निघून गेले. शिकणाऱ्या तरुण मुलांना कराचीत कुणी राहायला जागा देत नाही कारण ‘एकेकट्यां’वर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही इतकी दहशत आहे आणि हिंदू तसेच शिया मुस्लीम मुलांना घरच काय नोकरी मिळण्याचीही मारामार आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत कराची शहरात हे घडत असेल तर अन्य भागात काय खस्ता हालात असतील, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान, ‘सिंध’ प्रांतात आता अशाच कारणास्तव अशांतता पसरू लागली असून, बलुचींच्या क्षोभापाठोेपाठ आता सिंधमधील असंतोष ही पाकी सरकारसमोरील अजून एक धोक्याची घंटा आहे.