शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

कराचीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 23:40 IST

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं नुकताच मांडला आहे, त्यानुसार कराचीतल्या ९० टक्के तरुणांच्या मते कराचीत रोजगाराच्या वा विकासवाढीच्या काहीही संधी नाहीत, तर किमान ४८ टक्के तरुण, संधी मिळाल्यास ‘पाक सरजमीं’ सोडून तातडीनं परदेशी जायला तयार आहेत! विद्यापीठानं अमेरिकन वकिलातीच्या अधिकाऱ्यांसमोरच एका जाहीर कार्यक्रमात जो शोधनिबंध प्रसिद्ध केला, त्यात या वास्तवाची मांडणी केली आहे. ‘डिटर्मिनेशन आॅफ यूथ इमिग्रेशन’ अर्थात ‘तरुणांची स्थलांतरामागची प्रबळ इच्छा’ हा या शोधनिबंधाचा विषय होता. हा शोधनिबंध म्हणतो की, ४१ टक्के तरुणांना राजकीय अस्थैर्य असल्यामुळे शहरातल्या कुठल्याही विकासकामात सहभागी व्हावं असं वाटत नाही. आजच्या घडीला कराचीतली ३० टक्के, म्हणजे सुमारे २.२ कोटी लोकसंख्या १५ ते २९ वर्षे या वयोगटातील आहे व त्यातील ९० टक्क्यांना असे वाटते की, या शहरात आपल्याला काही भवितव्यच नाही. रोजगाराचा अभाव, असुरक्षितता, आर्थिक चणचण आणि भवितव्यात काहीही भलं न घडण्याची ठाम खात्री या मुलांना देशत्याग करण्यास भाग पाडत असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेले ‘गॉलअप’ हे दुसरे सर्वेक्षण सांगते की, शक्य झाल्यास पाकिस्तानातल्या दोन तृतियांश लोकसंख्येला हा देश सोडून जगात कुठं तरी सुरक्षित आणि विकसित, शांत देशात जायचं आहे. अमेरिकेतल्या एमआयटी, स्टॅनफर्ड आणि वॉल्टन स्कूल आॅफ बिझनेस इथं शिकलेल्या पाकिस्तानी बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ऐंशीच्या दशकात ‘गॉलअप पाकिस्तान’ ही संशोधन संस्था स्थापन केली होती. आजही ही संस्था आणि इतर समाज विचारवंत पाकिस्तानातल्या ‘ब्र्रेनड्रेन’ची चिंता व्यक्त करत हतबल आहेत. देशात शिक्षण, आरोग्य या विषयात काम करायला माणसं तयार नाहीत, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कराची विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गेल्या सहा वर्षात ३७ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून अन्य देशात, विशेषत: आखाती देशात आसरा घेतला आणि २०१५ या एकाच वर्षात १० लाख लोक देश सोडून निघून गेले. शिकणाऱ्या तरुण मुलांना कराचीत कुणी राहायला जागा देत नाही कारण ‘एकेकट्यां’वर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही इतकी दहशत आहे आणि हिंदू तसेच शिया मुस्लीम मुलांना घरच काय नोकरी मिळण्याचीही मारामार आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत कराची शहरात हे घडत असेल तर अन्य भागात काय खस्ता हालात असतील, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान, ‘सिंध’ प्रांतात आता अशाच कारणास्तव अशांतता पसरू लागली असून, बलुचींच्या क्षोभापाठोेपाठ आता सिंधमधील असंतोष ही पाकी सरकारसमोरील अजून एक धोक्याची घंटा आहे.