शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

यथार्थ गौरव !

By admin | Updated: December 25, 2014 05:46 IST

भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे

भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. भाजपाचे केंद्रात सरकार आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे अपेक्षितच होते व तसे संकेतही काही दिवसांपासून मिळत होते. पण त्याही पलीकडे जाऊ न विचार करायचा झाला, तर काँग्रेसेतर पंतप्रधानांच्या यादीत वाजपेयी यांचे नाव त्यांच्या कर्तबगारीमुळे अधिक ठळकपणे उठून दिसणारे होते; त्यामुळे ते या सन्मानाचे स्वाभाविक मानकरी होते. आणीबाणीनंतर केंद्रात आलेले जनता पक्षाचे सरकार अंतर्गत वादाने कोसळल्यानंतर जनता पक्ष विसर्जित झाला आणि त्यातून बाहेर पडलेल्या जनसंघातून सर्वस्वी नव्या रचनेची भारतीय जनता पार्टी स्थापन करण्याची जबाबदारी वाजपेयींवर आली. हा पक्ष स्थापन करतानाच वाजपेयींनी त्याला जनसंघाच्या रुळलेल्या वाटेने न नेता वेगळ्या वाटेने नेण्याचा चंग बांधला होता. त्यांनी संघपरिवाराच्या विरोधाला डावलून हा नवा पक्ष गांधीवादी समाजवादाचा पुरस्कार करील, असे जाहीर केले होते. तेथपासूनच वाजपेयी हे केवळ आपल्या वैयक्तिक करिष्म्यावर हा पक्ष पुढे नेणार, हे स्पष्ट झाले होते. पुढे लालकृष्ण अडवाणींच्या राममंदिर आंदोलनामुळे भाजपात हिंदुत्वाची लाट आली, तरी केंद्रात भाजपाचे सरकार वाजपेयींच्या नेतृत्वाखाली आले, तेव्हा त्यांनी त्या सरकारला या लाटेचा उपद्रव होऊ दिला नाही. हिंदुत्वाऐवजी आर्थिक प्रगती आणि शेजारी राष्ट्रांशी शत्रुत्वाऐवजी सलोखा, अशी नीती त्यांनी अवलंबिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाजपेयींनी आखून दिलेल्या मार्गानेच जाणे पसंत करीत आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेचा विरोध डावलून पोखरणचा दुसरा अणुस्फोट तर घडवून आणलाच; पण त्यानंतर आलेल्या जागतिक आर्थिक निर्बंधांना नाकाम ठरविणारे आर्थिक धोरण इतक्या परिणामकारकरीत्या अवलंबले, की हे आर्थिक निर्बंध लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांना आपले निर्बंधाचे धोरण गुंडाळून ठेवून भारतात येऊ न वाजपेयींशी संवाद साधावा लागला. तीच गत पाकिस्तानचे लष्करशहा मुशर्रफ यांची झाली. त्यांनी कारगिलचे युद्ध भारतावर लादले खरे; पण त्यात पुरती नाचक्की झाल्यावर त्यांना दिल्लीत येऊ न काश्मीरवर काही तरी तोडगा काढावा, यासाठी वाजपेयींची मनधरणी करावी लागली. आर्थिक उदारीकरणाचे धोरण नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत सुरू झाले असले, तरी त्याची नंतरच्या काळात अंमलबजावणी शिथिल झाली होती. वाजपेयी सरकारने ही अंमलबजावणी जोमाने केली; त्यामुळे त्या काळात भारताचा विकासदर विक्रमी झाला होता. त्याहीपेक्षा वाजपेयींचे मोठे कर्तृत्व म्हणजे त्यांनी पक्षातल्या हिंदुत्ववाद्यांना न जुमानता धर्मनिरपेक्ष तत्वांची कट्टरतेने आणि कठोरपणे केलेली अंमलबजावणी. त्यामुळे भाजपाचे सरकार असूनही त्या वेळी अल्पसंख्य समुदायांमध्ये भीतीचे वातावरण नव्हते. मोदींंच्या गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्यावर मोदींची कानउघाडणी करण्यास त्यांनी कमी केले नव्हते. ती कानउघाडणी मोदी अद्याप विसरले नसावेत, असे दिसते. वाजपेयींच्याबरोबरीने पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटेल. कारण एक तर ते रा. स्व. संघाचे नव्हे तर हिंदुमहासभेचे नेते होते, शिवाय ते दिवंगत आहेत. दिवंगत नेत्यांना भारतरत्नसारखा सन्मान द्यावा का, याबाबत बरेच मतभेद आहेत. पण, यापूर्वी दिवंगत नेत्यांचा असा सन्मान करण्यात आल्यामुळे आता त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पंडित मालवीय यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजाला संघटित करण्याचे काम अपूर्व असेच आहे. तत्कालीन उत्तर प्रांतातील राजकारणाचा विचार केला, तर त्यांच्या या कार्यामागील तार्किकता तसेच बनारसच्या हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेमागील त्यांची प्रेरणा लक्षात येईल. भारतीय राजकारणावरील गांधी-नेहरू घराण्यांचा ठसा दूर करण्याचा इरादा मोदी यांनी याआधीच जाहीर केला आहे. तो लक्षात घेतला, तरी या सर्वोच्च सन्मानामागील या दोन निवडींचे कारण लक्षात येईल. या पुरस्कारांमागे राजकीय हेतू असतात, हा आरोप आता नवा नाही व तो नाकारण्यातही अर्थ नाही. सर्वच सरकारांनी यात थोडेबहुत राजकारण आणले आहे. असे असूनही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी वाजपेयी यांना अशा प्रकारे गौरवित करण्याचे स्वागत केले आहे. वाजपेयी आणि मालवीय यांचा जन्मदिन २५ डिसेंबर हा आहे. त्यामुळे आता त्यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला हा सन्मान घोषित करून सरकारने औचित्य साधले आहे.