शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

उपेक्षेला वाचा; परंतु परिणाम काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:11 IST

मिलिंद कुलकर्णी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली ...

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली आहे, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उपेक्षेच्या अंधारात लोटल्या गेलेल्या क्षेत्रातील मतदार आता जागरुक आणि संघटित होऊ लागले आहे. गेल्या पंधरवड्यात भडगाव तालुक्यातील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन एक सभा घेतली. भडगाव तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भडगाव तालुका हा पूर्वी पारोळा मतदारसंघाला जोडला होता, पुनर्रचनेनंतर तो पाचोरा तालुक्याला जोडला गेला आहे. तालुका असूनही मतदारसंघात दुय्यम भूमिका बजावावी लागत असल्याने निराशेचा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. सभेच्या निमित्ताने तो अधोरेखित झाला. वेगवेगळे विचार व्यक्त झाले. भडगावकरांचा राग शांत करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जाईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. ठोस शब्द दिला जाईल. पण पुन्हा तो पाळला जाईल काय, याची शाश्वती भडगावकरांना वाटेल काय, हा महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे.अर्थात, हा विषय केवळ भडगावचा नाही. खान्देशात असे काही तालुके आहेत, ज्यांच्या वाट्याला अशीच उपेक्षा आली आहे. पारोळा तालुक्याची हीच अवस्था आहे. राजकीयदृष्टया अतीशय संवेदनशील आणि प्रभावशाली तालुक्यात एकेकाळी मंत्रिपद, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष अशी पदे होती. परंतु, आता हा तालुका अमळनेर आणि एरंडोल या दोन मतदारसंघात विभाजित झाला आहे. आमदार याच तालुक्याचा निवडून येत असला तरी अमळनेरला जोडल्या गेलेल्या भागातील जनतेला ‘आपला वाली कोण? ’ ही भावना बळावू लागली आहे. एरंडोल हे मतदारसंघाचे नाव असले तरी या भागातील नेत्याला दहा वर्षात आमदारकीची संधी न मिळाल्याने उपेक्षा पदरी आली आहे. धरणगाव आणि बोदवड तालुकेदेखील अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि मुक्ताईनगर तालुक्यांना जोडल्याने स्वतंत्र अस्तित्व राहिलेले नाही.हीच स्थिती यावल तालुक्याची झाली आहे. या तालुक्याचे विभाजन करुन रावेर आणि चोपडा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. आमदार तालुक्यातील असले तरी विभाजनाचे दु:ख तालुकावासीयांना आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुका हा शहादा मतदारसंघाला जोडला गेला आहे.धडगाव तालुका हा अक्कलकुवा मतदारसंघाला जोडला आहे. तालुके सहा असले तरी मतदारसंघ चार असल्याने ही उपेक्षेची भावना आहेच.मतदारसंघ पुनर्रचना करताना ठराविक मतदारसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी लगतच्या तालुक्यातील काही महसूल मंडळे जोडली गेली आहेत. त्यांची अवस्था तर आणखीच बिकट झालेली आहे. पाचोरा तालुक्यातील कुºहाड हे महसूल मंडळ जामनेर मतदारसंघाला जोडले गेले आहे. या मंडळाचा लोकसभा मतदारसंघ रावेर आहे. खासदारांकडे काम असले तर त्यांना मुक्ताईनगर गाठावे लागते. रावेर तालुक्यातील सावदा मंडळ हे मुक्ताईनगर मतदारसंघाला जोडले गेले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाने मंडळ हे शिरपूरला जोडले गेले आहेत. शहादा तालुक्यातील काही मंडळे नंदुरबारला जोडली गेली आहेत. नंदुरबारची दोन मंडळे नवापूरला जोडली गेली आहेत. पाच वर्षे शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजार समितीशी संबंधित कामासाठी तालुक्याला जायचे. मात्र विकास कामांसाठी दुसऱ्या तालुक्यातील संबंधित कार्यालयांशी संपर्क आणि पाठपुरावा करावा लागत आहे. हा द्राविडी प्राणायाम दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असल्याने भडगावसारखे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.उपेक्षेला वाचा फोडली असली तरी त्याचा काही परिणाम होईल, याची शाश्वती नाही. कारण हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. पुन्हा कधी मतदारसंघ पुनर्रचना होईल, तेव्हा काही मार्ग निघू शकेल. त्याला किती कालावधी लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव