शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 01:14 IST

Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award : या अभिनेत्याला ‘नेता’ व्हायचे नाही. रजनीकांतने ‘आपण बरं, आपलं काम बरं’, हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा!

- सुकृत करंदीकर(सहसंपादक,  लोकमत, पुणे) संकुचितपणाचा दोष पत्करून म्हणता येईल की, मराठी माणसाच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार मराठी माणसालाच मिळण्याचा आनंद महाराष्ट्रानेही साजरा करावा. शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे सिनेसृष्टीतल्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पारितोषिकाचे मानकरी ठरले. (Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award) भाषा, प्रांताच्या सीमा ओलांडून कर्तबगारी गाजवणारी मराठी माणसं तशीही दुर्मीळ. रजनीकांत म्हणजे अचाट लोकप्रियता. ज्ञात विश्वातली कोणतीही गोष्ट लीलया करू शकणारा ‘हिरो’ म्हणजे रजनीकांत. गुंडाच्या पिस्तुलातून सुटलेली गोळी सहजपणे एका हातात झेलायची, दातांनी तिचे दोन तुकडे करायचे आणि हेच दोन तुकडे समोरच्या दोन गुंडांना मारून त्यांचा खात्मा करायचा- हा तद्दन ‘विनोदी सीन’ रजनीकांत ज्या त्वेषाने पडद्यावर साकारतो तेव्हा तर्कबुद्धी खुंटीला टांगून प्रेक्षक आ वासतो. दक्षिण भारतातल्या गेल्या दोन-तीन पिढ्यातली काही लाख पोरं-पोरी रजनीकांतच्या ‘डान्सिंग स्टेप्स’वर फिदा झाली. पिस्तूल, गॉगल, सिगारेट अशा वस्तूंसोबतची रजनीकांतची हातचलाखी कॉपी करण्याचा प्रयत्न देशातल्या काही हजार नटांनी आजवर केला. त्याच्या अनोख्या ‘डायलॉग डिलिव्हरी’वर वेब सिरीजच्या आजच्या जमान्यातही पडद्यासमोर नोटानाण्यांची उधळण होते. पडद्यावर अतर्क्य कारनामे साकारणारा रजनीकांत माणूस म्हणून अगदी साधा आहे. कित्येक हिरोंचा उतारवयातला वेळ टक्कल लपवण्यात जातो. रजनीकांत त्याच्या टकलासह रसिकांसमोर त्याच आत्मविश्वासानं जातो आणि त्यांना आरपार जिंकतो. फाळके पुरस्कार मिळवणारे रजनीकांत हे तिसरे तामिळी. गेल्या ४५ वर्षात रजनीकांत यांनी कोट्यवधी प्रेक्षकांना रिझवले. या कर्तृत्वाचा योग्यवेळी सन्मान झाला. सन २०१८ मध्ये याच पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन होते. पाठोपाठ २०१९ साठी रजनीकांत. लोकप्रियता आणि कोट्यवधी रुपयांची इंडस्ट्री उभी करण्याची एकहाती ताकद या अनुषंगाने हा क्रम अगदी सार्थ आहे. 

स्वाभाविकपणे रजनीकांतच्या पुरस्काराच्या ‘टायमिंग’ची चर्चा ऐरणीवर आली. तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. यात उतरण्याचा मानस स्वतः रजनीकांतनेच गेल्यावर्षी जाहीर केला होता.  भाजपसोबत जायचे की स्वतंत्र पक्ष काढायचा याचा निर्णय होत नव्हता. वयाच्या सत्तरीतल्या या ‘हिरो’ला त्यात आजारपणाने गाठले. शून्यातून कमावलेली पैसा-प्रसिद्धीची आयुष्यभराची कमाई राजकीय पटावर पणाला न लावण्याचे रजनीकांत यांनी अखेरीस ठरवले. यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केला नसेल असे ठामपणे सांगणे अवघड आहे. तरीही रजनीकांत यांना सन्मान देऊन भाजपची मतांची झोळी भरेल असे मानणेही भाबडेपणाचे ठरावे. दाक्षिणात्यांचे चित्रपटप्रेम फार टोकाचे. रजनीकांत यांची देवळं त्यांनी पूर्वीच उभारली. आपल्या ‘हिरो’च्या राष्ट्रीय सन्मानाचा आनंद चाहत्यांना नक्की होईल; पण त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नाही. रजनीकांत यांनीच भाजपला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले असते तर गोष्ट वेगळी होती. 
गरिबीतून वर आलेले रजनीकांत कधीकाळी बस कंडक्टर होते. त्यावेळी त्यांच्या अभिनयाला दाद देणारा ड्रायव्हर मित्र राज बहाद्दूर त्यांना आठवला. सत्यनारायण या भावाची याद आली. पहिल्या सिनेमात संधी देणाऱ्या दिग्दर्शकांप्रति ऋण व्यक्त केले. मग पंतप्रधानांपासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि कमल हसन यांच्यापासून स्टॅलिनपर्यंत सर्वांचे आभार त्यांनी मानले. रजनीकांतची ही राजकीय समानता लक्षात घेण्याजोगी आहे. या अभिनेत्याला ‘नेता’ व्हायचे नाही. ‘नेत्यां’च्या जाळ्यातही तो सापडू इच्छित नाही. दाक्षिणात्य सिनेमाचा निर्विवाद ‘थलैवा’ म्हणजेच ‘बॉस’ असणाऱ्या रजनीकांतने ‘आपण बरं, आपलं काम बरं’, हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा. रजनीचा एक खूप लोकप्रिय डायलॉग आहे - ‘एन्न वाशी, तान्नी वाशी’...म्हणजे ‘मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार’. पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही हे जगलाय हा माणूस...माइंड इट्ट !

टॅग्स :rajinikanthरजनीकांतcinemaसिनेमा