शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

काँग्रेसला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:32 IST

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी अक्षरश: धूळधाण उडवली. हे यश त्यांनी एक हाती मिळविले. भाजपची अवस्था तर तोंड वर करण्यासारखी ठेवली नाही. हा विजय काँग्रेस पक्षामध्ये संजीवनी निर्माण करणारा आणि भाजपचा सुसाट सुटलेला वारू रोखता येतो, असा आत्मविश्वास देणारा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अस्तित्वच महापालिकेतून संपणे, दुसºया शब्दात मुस्लिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदार जो गेल्या काही वर्षांपासून दुरावला होता तो पुन्हा परतला, ही काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीच्या माध्यमातून एमआयएमने महाराष्टÑाच्या राजकारणात खाते उघडले होते आणि तेथून त्यांनी विधानसभेतही मर्यादित का होईना यश मिळवले होते. त्यांचा समाजावरील प्रभाव संपणे हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी चांगले चिन्ह समजता येईल. ज्या पद्धतीने काँग्रेसने सर्वांचा सफाया केला त्यावरून मराठा मतेही काँग्रेसकडेच वळली, हे स्पष्ट होते. सर्वात दारुण पराभव भाजपचा झाला. पूर्वी त्यांचे केवळ दोन सदस्य होते तरी त्यांनी निवडणूक प्रचारात जी राळ उठवून आभास निर्माण केला आणि सत्ता काबीज करण्याच्या वल्गना ज्या आत्मविश्वासाने केल्या हे पाहता त्यांच्यासाठी हा दारुण पराभवच म्हणता येईल. संभाजीराव पाटील निलंगेकरांचा ‘लातूर पॅटर्न’ येथे लागू पडला नाही. आयात केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर निष्प्रभ ठरले. मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचे झंझावाती प्रचार दौरे परिणाम घडवू शकले नाहीत. चिखलीकरांचे आखाड्याबाहेरचे डावपेच आणि आयाराम-गयाराम उमेदवारांवर असलेली भिस्त, शिवाय भाजपच्या पदरात पडले की सगळेच पावन होतात हा गोड गैरसमज फोल ठरला. या पक्ष दलबदलूंना मतदारांनी स्पष्ट नाकारले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत अशोक चव्हाणांवर केलेली वैयक्तिक टीका मतदारांना आवडली नाही. पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी अर्धा तास चव्हाणांवर वाग्बाण चालवले होते; पण या मोहिनी अस्त्राने मतदारांवर मोहिनी घालता आली नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील नळावरच्या भांडणाने येथेही दोघांचे नुकसान झाले. भाजपची सर्व सूत्रे चिखलीकरांच्या हाती होती आणि ते निष्ठावंतांना काय, पण मतदारांनाही रुचले नाही. कोणतीही रणनीती न आखता हवेत गोळ्या झाडत वरकरणी प्रचार करून हवा निर्माण केल्यामुळे भाजपचा हा फुगा फुटला. भाजपकडे नेतृत्वाचा चेहराच नव्हता. वास्तवात येथे भाजपचे अस्तित्व नव्हते. त्यांनी इतर पक्षांतील लोकांना फोडून आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय चिखलीकरांनी आपली फौज भाजपच्या तंबूत डेरेदाखल केली; पण ही फौज नसून बाजारबुणगे होते, हे मतदारांनी दाखवून दिले. एवढा आटापिटा करूनही भाजप दोन आकडी संख्या गाठू शकला नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची पालिकेतील संख्या एकदम रोडावली. चिखलीकरांसाठी सेनेचे दरवाजे बंद झाले. राष्टÑवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले. पूर्वी त्यांचे काही का होईना दोन सदस्य होते. चव्हाणांनी भेटीगाठी, वैयक्तिक संबंधावर जोर देत वैयक्तिक प्रचारावर भर दिला. दलित, मुस्लिम मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात त्यांना यश आले. हा काँग्रेसचा परंपरागत मतदार पुढे विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी शक्ती ठरणार आहे. अशोकरावांनी दिलेला हा धक्का भाजपच्या लक्षात राहील.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस