शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

काँग्रेसला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:32 IST

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी अक्षरश: धूळधाण उडवली. हे यश त्यांनी एक हाती मिळविले. भाजपची अवस्था तर तोंड वर करण्यासारखी ठेवली नाही. हा विजय काँग्रेस पक्षामध्ये संजीवनी निर्माण करणारा आणि भाजपचा सुसाट सुटलेला वारू रोखता येतो, असा आत्मविश्वास देणारा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अस्तित्वच महापालिकेतून संपणे, दुसºया शब्दात मुस्लिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदार जो गेल्या काही वर्षांपासून दुरावला होता तो पुन्हा परतला, ही काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीच्या माध्यमातून एमआयएमने महाराष्टÑाच्या राजकारणात खाते उघडले होते आणि तेथून त्यांनी विधानसभेतही मर्यादित का होईना यश मिळवले होते. त्यांचा समाजावरील प्रभाव संपणे हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी चांगले चिन्ह समजता येईल. ज्या पद्धतीने काँग्रेसने सर्वांचा सफाया केला त्यावरून मराठा मतेही काँग्रेसकडेच वळली, हे स्पष्ट होते. सर्वात दारुण पराभव भाजपचा झाला. पूर्वी त्यांचे केवळ दोन सदस्य होते तरी त्यांनी निवडणूक प्रचारात जी राळ उठवून आभास निर्माण केला आणि सत्ता काबीज करण्याच्या वल्गना ज्या आत्मविश्वासाने केल्या हे पाहता त्यांच्यासाठी हा दारुण पराभवच म्हणता येईल. संभाजीराव पाटील निलंगेकरांचा ‘लातूर पॅटर्न’ येथे लागू पडला नाही. आयात केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर निष्प्रभ ठरले. मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचे झंझावाती प्रचार दौरे परिणाम घडवू शकले नाहीत. चिखलीकरांचे आखाड्याबाहेरचे डावपेच आणि आयाराम-गयाराम उमेदवारांवर असलेली भिस्त, शिवाय भाजपच्या पदरात पडले की सगळेच पावन होतात हा गोड गैरसमज फोल ठरला. या पक्ष दलबदलूंना मतदारांनी स्पष्ट नाकारले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत अशोक चव्हाणांवर केलेली वैयक्तिक टीका मतदारांना आवडली नाही. पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी अर्धा तास चव्हाणांवर वाग्बाण चालवले होते; पण या मोहिनी अस्त्राने मतदारांवर मोहिनी घालता आली नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील नळावरच्या भांडणाने येथेही दोघांचे नुकसान झाले. भाजपची सर्व सूत्रे चिखलीकरांच्या हाती होती आणि ते निष्ठावंतांना काय, पण मतदारांनाही रुचले नाही. कोणतीही रणनीती न आखता हवेत गोळ्या झाडत वरकरणी प्रचार करून हवा निर्माण केल्यामुळे भाजपचा हा फुगा फुटला. भाजपकडे नेतृत्वाचा चेहराच नव्हता. वास्तवात येथे भाजपचे अस्तित्व नव्हते. त्यांनी इतर पक्षांतील लोकांना फोडून आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय चिखलीकरांनी आपली फौज भाजपच्या तंबूत डेरेदाखल केली; पण ही फौज नसून बाजारबुणगे होते, हे मतदारांनी दाखवून दिले. एवढा आटापिटा करूनही भाजप दोन आकडी संख्या गाठू शकला नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची पालिकेतील संख्या एकदम रोडावली. चिखलीकरांसाठी सेनेचे दरवाजे बंद झाले. राष्टÑवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले. पूर्वी त्यांचे काही का होईना दोन सदस्य होते. चव्हाणांनी भेटीगाठी, वैयक्तिक संबंधावर जोर देत वैयक्तिक प्रचारावर भर दिला. दलित, मुस्लिम मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात त्यांना यश आले. हा काँग्रेसचा परंपरागत मतदार पुढे विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी शक्ती ठरणार आहे. अशोकरावांनी दिलेला हा धक्का भाजपच्या लक्षात राहील.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस