शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राहुलचा उज्ज्वल मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:17 IST

राखेतून उंच झेपावणाऱ्या दंतकथेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे काँग्रेस पक्ष त्याची सारी मरगळ झटकून सज्ज झाला असल्याचे दिल्लीत झालेल्या त्याच्या अ.भा. समितीच्या अधिवेशनात साºयांना जाणवले आहे.

राखेतून उंच झेपावणाऱ्या दंतकथेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे काँग्रेस पक्ष त्याची सारी मरगळ झटकून सज्ज झाला असल्याचे दिल्लीत झालेल्या त्याच्या अ.भा. समितीच्या अधिवेशनात साºयांना जाणवले आहे. राहुल गांधींचे नवे नेतृत्व लगेचच प्रस्थापित झाले असल्याचे, सोनिया गांधींचा प्रभाव तसाच शाबूत असल्याचे आणि डॉ. मनमोहनसिंगापासून मल्लिकार्जुन खरगेंपर्यंतचे सगळे वरिष्ठ नेते कमालीच्या संघटितपणे पुन: उभे राहिले असल्याचे त्यात दिसले. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारखे तरुण वयाचे नेतेही तेवढ्याच बळानिशी २०१९ च्या निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत हेही अनुभवास आले. अधिवेशनातील सोनिया गांधींचे भाषण जेवढे हृदयस्पर्शी आणि राहुल गांधींचे जेवढे घणाघाती होते तेवढेच डॉ. मनमोहनसिंग व पी. चिदंबरम् यांची भाषणे कमालीची अभ्यासपूर्ण व मोदी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणारी होती. देशाचे राजकीय वातावरण बदलत असल्याचा परिणामही या अधिवेशनात साºयांना जाणवण्याजोगा होता. गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांची झालेली लक्षणीय वाढ, हिमाचलमधील त्याचे वाढलेले मतदान, मेघालयातील त्याचे प्रथम क्रमांकावर असणे आणि राजस्थान व मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांनी त्याला मिळवून दिलेला विजय या गोष्टी त्यासाठी जशा कारणीभूत झाल्या तसेच गोरखपूर, फुलपूर व अररियामधील मोदींचे पराभवही त्यास कारण ठरले. मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जाताहेत आणि तेलगू देसम हा पक्ष तिच्यातून बाहेर पडला आहे, चंद्रशेखर रावांनीही त्यांचा विरोध जाहीर केला आहे आणि शिवसेनेने तिची तटस्थता जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी आघाडी संघटित राहिली आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी व शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. आता अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीचे आव्हान मोदींसमोर आहे. त्यांचा पक्ष केंद्रासह देशातील २१ राज्यात सत्तेवर आहे. मात्र त्यांची आर्थिक आघाडीतील पिछेहाट, बँकांची दिवाळखोरी, उत्तर व पश्चिम सीमेवर त्यास अनुभवावी लागणारी माघार आणि सरकारच्या पोतडीत असलेल्या दिखावू योजनांची संपुष्टी या गोष्टीही यास कारणीभूत आहेत. पुन: एकवार राममंदिर, गाय व गोमूत्र या घोषणा त्यास द्याव्या लागणे हे याच माघारीचे लक्षण आहे. बेरोजगार तरुणांचे ठिकठिकाणी निघणारे मोर्चे, शेतकºयांच्या न थांबलेल्या आत्महत्या, औद्योगिक क्षेत्रातील मंदी आणि त्यात वाढलेले अंबानी व अदानींचे वर्चस्व या गोष्टीही साºयांच्या डोळ्यांवर येणाºया आहेत. जनतेला दिलेली खोटी आश्वासनेही (त्यात प्रत्येकाला १५ लक्ष रुपये देण्याचे आश्वासनही) आता तिला आठवू लागली आहेत. अल्पसंख्य भयभीत आणि दलित संतप्त आहेत. मध्यम वर्गही काहीसा संभ्रमीत व सरकारच्या निर्णयाबाबत साशंक बनला आहे. आर्थिक क्षेत्रातील बजबजपुरी, प्रशासनातील भ्रष्टाचार आणि सामान्य माणसांची ससेहोलपट या गोष्टी वाढल्या आहेत. ही स्थिती लागलीच काँग्रेस वा विरोधकांना विजय मिळवून देईल असे आज कुणी म्हणणार नाही. मात्र ही स्थिती भाजपला पराभवाच्या रेषेपर्यंत आणू शकेल हे उघड आहे. गोरखपूर व फुलपूरच्या निकालांनी त्या पक्षाने लोकसभेत मिळविलेले स्वबळावरील बहुमत गमाविले आहे आणि मित्रपक्षांच्या कुंबड्यांचा त्याला आधार गरजेचा झाला आहे. ही स्थिती मित्रपक्षांचे महात्म्य व ते मागणार असलेली किंमत वाढविणारीही आहे. मात्र यात एक गोष्ट आणखीही सांगण्याजोगी. गेली चार वर्षे भाजपच्या सोशल मीडियावरील ट्रोल्सनी राहुल गांधी व एकूणच गांधी परिवाराविषयी अपप्रचाराचा जो किळसवाणा प्रकार दिसण्याचीही चीड लोकमानसात एकत्र होत आहे व स्थिती राहुल गांधींचा उद्याचा मार्ग उज्ज्वल असल्याचे सांगणारी आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी