शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

सावरकरांमुळे कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 07:28 IST

ठाकरेंना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने मैदानात उतरले आहेत.

काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्षे उलटल्यावरही वादांच्या केंद्रस्थानी राहण्याचे दुर्भाग्य काही महापुरुषांना लाभले आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नाव त्या यादीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सावरकर नेहमीच एका वर्गासाठी दैवत अन् दुसऱ्या वर्गासाठी टीकेस पात्र व्यक्तिमत्त्व ठरत आले आहेत; परंतु अलीकडे त्यांच्यावरील टीकेला जरा जास्तच धार चढताना दिसत आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी बरेचदा गरज नसतानाही सावरकरांवर टीकेची झोड उठवताना दिसतात. मग तेवढ्याच हिरिरीने सावरकर प्रशंसक त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरतात आणि नव्या वादाला तोंड फुटते.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांना एका मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाली. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, सावरकरांचा उल्लेख करून माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अडचणीच्या ठरणाऱ्या या विषयाला ठाकरे आजवर पद्धतशीरपणे बगल देत आले आहेत. रविवारी नाशिक येथे जाहीर सभेस संबोधित करताना मात्र, त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा थेट राहुल गांधी यांनाच देऊन टाकला. त्यामुळे आता ते स्वत:च खिंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी संधीच्या शोधातच असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे.

ठाकरेंना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने मैदानात उतरले आहेत. मनसेकडून राहुल देशपांडे आणि भाजपकडून राम कदम यांनीही सोमवारी ठाकरेंवर टीकास्त्रे डागली. ठाकरेंनी राहुल गांधींना दिलेला इशारा केवळ दाखविण्यापुरता आहे, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे ते नेमके काय करणार, प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा राहुल गांधींच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलण्याची त्यांची हिंमत होणार नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत प्रत्यक्ष कृती होणार नाही, असा भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांचा सूर आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन, सावरकरांच्या अपमानासंदर्भात आपण अतिशय गंभीर असल्याचे दाखवून दिले आहे. ठाकरे यांचा इशारा राहुल गांधी गांभीर्याने घेतात की नाही आणि त्यांनी ठाकरेंच्या इशाऱ्याला भीक न घालता सावरकरांवरील टीका यापुढेही सुरूच ठेवली, तर ठाकरे कोणती भूमिका घेणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेमुळे ठाकरेंसोबतच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचीही मोठी गोची झाली आहे, हे मात्र निश्चित! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसेचे नेते भरभरून व्यक्त होत असताना, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मात्र अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले आहे. महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही प्रमुख नेत्याने या विषयावर तोंड उघडले नव्हते. सावरकर या विषयाने राज्य काँग्रेसची नेहमीच गोची केली आहे. सावरकरांचे समर्थन करून गांधी कुटुंबाची नाराजी ओढवून घेता येत नाही अन् टीका केली तर राज्यातील निवडणुकांमध्ये फटका बसण्याची भीती वाटते! त्यामुळे काँग्रेस नेते या मुद्यावर बहिरेपणाचे सोंग घेणेच पसंत करतात.

उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याची घाई झालेल्या भाजपच्या हे चांगलेच पथ्यावर पडले आहे. या मुद्याच्या निमित्ताने ठाकरे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दरी निर्माण करण्याची आयतीच संधी भाजपपुढे चालून आली आहे. तिचा लाभ उपटण्याचे पुरेपूर प्रयत्न तो पक्ष करणारच! दुसरीकडे राहुल गांधी यांचा एकंदर स्वभाव आणि आजवरची राजकीय वाटचाल बघता, ते सावरकरांविषयी यापुढे भाष्य करणार नाहीत, याची शक्यता फार धूसर आहे. ते यापुढे जेव्हा सावरकरांच्या विरोधात बोलतील, त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना त्यांच्या इशाऱ्याची आठवण करवून देण्याचे काम भाजप नेते निश्चितपणे करतील. त्यावेळी ठाकरे यांची भूमिका काय असेल, हे बघणे रंजक ठरणार आहे. तूर्तास सावरकरांमुळे ठाकरे कोंडीत सापडले आहेत, हे मात्र निश्चित!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस