शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात विषम विकासाचा प्रश्न गहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:26 IST

धक्कादायक बाब म्हणजे जवळपास ५८ टक्के आदिवासी शेतकरी गरीब आहेत, त्या पाठोपाठ १८ टक्के एससी शेतकरी आहेत.

सुखदेव थोरातधक्कादायक बाब म्हणजे जवळपास ५८ टक्के आदिवासी शेतकरी गरीब आहेत, त्या पाठोपाठ १८ टक्के एससी शेतकरी आहेत. त्या तुलनेत १४ टक्के ओबीसी/उच्चजातीय शेतकरी गरीब आहेत. एससींच्या तुलनेत शेतजमिनीची चांगली उपलब्धता असलेले एसटी अधिक गरीब आहेत, ही सर्वांत अस्वस्थकारक वस्तुस्थिती म्हणावी लागेल.मे १९६० पासून महाराष्ट्राने कल्याणकारी कार्यक्रमांच्या बाबतीत बºयापैकी प्रगती केली आहे, परंतु विषम विकासाची समस्या कायम आहे. वेतनावर गुजराण करणारे कामगार, लहान शेतकरी-लहान उद्योजक यांच्यातील गरिबीचे प्रमाण मोठे आहे. एसटी (शेड्युल्ड ट्राईब्स/अनुसूचित जमाती), एससी (शेड्युल्ड कास्ट्स/अनुसूचित जाती), बौद्ध हे अधिक गरीब आहेत; मुस्लिमांमधील गरिबीचे प्रमाणही जास्त आहे.२०१२ साली राज्यातील १७ टक्के लोक गरीब होते. वेतन कामगार सर्वांत गरीब आहेत (३७ ते ४१ टक्के), त्यांच्यानंतर लहान शेतकरी (२७ टक्के) आणि ग्रामीण भागातील लहान उद्योजक (१३ टक्के) हे गरीब असल्याचे दिसते. कुपोषणाची पातळी आश्चर्य वाटावे इतकी जास्त आहे. २०१३ सालच्या आकडेवारीनुसार सुमारे अर्ध्या संख्येने मुले कमी वजनाची आहेत आणि ८१ टक्के रक्तक्षयी आहेत. गरिबांमध्ये एसटी (५४ टक्के) व एससी (२० टक्के) हे ओबीसींच्या (अदर बॅकवर्ड क्लासेस/इतर मागास वर्गीय) व उच्च जातीयांच्या (९ टक्के) तुलनेत जास्त गरीब आहेत. कमी वजनाच्या मुलांची टक्केवारीही एसटी, एससी व ओबीसी (५४ टक्के) यांच्यात उच्चजातीयांपेक्षा (४२ टक्के) जास्त आहे. शैक्षणिक प्रगती आणि घरात नागरी सुविधांच्या उपलब्धतेच्या बाबतीत एससी/ एसटी हे ओबीसींपेक्षा व उच्च जातीयांपेक्षा बरेच मागे आहेत. २०१४ सालच्या आकडेवारीनुसार उच्चशिक्षणातील एसटी लोकांचा भरतीचा दर १५ टक्के आहे, एससींचा २० टक्के आहे, तर ओबीसींचा त्यापेक्षा जास्त म्हणजेच २८ टक्के आहे, उच्चजातीयांमधील हा दर ४३ टक्के आहे. राज्य पातळीवरील घरांचा तुटवडा २०११ साली ३३.४ टक्के इतका होता. त्यात एसटी (४१ टक्के) व एससी (३५ टक्के) यांच्यात हे प्रमाण जास्त आहे आणि एससी/एसटी सोडून इतरांमध्ये ३१.५ टक्के असे घरांच्या तुटवड्याचे प्रमाण होते. शहरी भागामध्ये सुमारे २३ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. परंतु ३२ टक्के एससी लोक झोपडपट्टीत राहातात, त्यापाठोपाठ २४ टक्के एसटी येतात आणि उर्वरितांमधील २२ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.विषम विकास का? आकडेवारीनुसार पाहता, संपत्तीच्या मालकीतील प्रचंड विषमता, पगारी रोजगारातील विषमता, मोठी बेरोजगारी व शिक्षण ही मुख्य कारणे आहेत. राज्यातील एकूण मालमत्तांपैकी ६६ टक्के मालमत्ता उच्चजातीयांच्या मालकीची आहे, १८ टक्के ओबीसींच्या मालकीची आहे, तर एसटींच्या मालकीची मालमत्ता केवळ २ टक्के आहे आणि एससींची मालमत्ता ४ टक्के आहे आणि अखेरीस मुस्लिमांचा मालमत्तेतील वाटा ५ टक्के आहे.शेतकºयांकडेही अशाच आकडेवारीतून पाहिले तर आणखी धक्कादायक माहिती समोर येते़ २०१२ सालच्या आकडेवारीनुसार सुमारे २० टक्के शेतकरी गरीब आहेत आणि त्यांना भूक व कुपोषण सहन करावे लागते. परंतु, १० एकरांपेक्षा कमी जागेत पीक घेणाºया शेतकºयांमध्ये गरिबीचे प्रमाण तुलनेने जास्त होते. १०-१५ एकर जमीन राखून असलेल्या शेतकºयांमध्ये ९.५ टक्के आणि २०-२५ एकर शेती असलेल्यांमध्ये गरिबीचे प्रमाण ४.७ टक्के आहे. किंबहुना एकूण गरीब शेतकºयांपैकी जवळपास ९५ टक्के शेतकरी १० एकरांखालचे आहेत आणि ते कमी-अधिक तीव्रतेने गरिबीत अडकलेले आहेत.शेतकºयांना गरिबीतून बाहेर काढण्याचा मार्ग आपल्याला माहीत नाही, असे नाही. पश्चिम महाराष्ट्रात आपण हे यशस्वीरीत्या करून दाखवले आहे, तिथे शेतकºयांमधील गरिबीचे प्रमाण केवळ ७ टक्के आहे. परंतु इतर प्रदेशांकडे आपण दुर्लक्ष करतो. महाराष्ट्राच्या पहिल्यावहिल्या सखोल अभ्यासातील या निष्कर्षांवर २६ नोव्हेंबर २०१७ रोजी असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इनइक्वालिटी या संस्थेने नागपूर येथे आयोजित केलेल्या परिषदेत होणार आहे. त्यातून विषम विकासाच्या या गहन प्रश्नावर फलदायी उपाय निघावेत, हीच अपेक्षा.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या