शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

स्वत:विषयी प्रश्नचिन्ह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:02 IST

जीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही.

- गौतम गवळीजीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही. (suicide is not a permanent solution to temporory problems) कुठलाही देश जसा संकटमुक्त नसतो तसेच व्यक्तीचे आयुष्यही संघर्षविरहित नसते. संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाचे व्यवस्थापन करणे हाच त्याच्यावर उपाय असू शकतो.एखाद्या व्यक्तीचे समाजावर प्रभावीपण असेल, इतरांच्या आयुष्यातील काही समस्या सोडविण्याचे ते काम करत असतील, पण स्वत:मध्ये निराशा, सहिष्णुतेचा अभाव (Low frustration, tolerance) आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे येणारी दोषीभावना, नकारात्मक विचार, वर्तनविषयक उथळपणा (impulsive) पलायनवादी विचार, वैयक्तिक संघर्ष आणि कौटुंबिक कलहाबरोबरच काही प्रमाणात मानसिक आणि शारीरिक आजारपण ही आत्महत्येची कारणे त्यांच्यामुळे प्रामुख्याने असतात. आपल्या वैयक्तिक समस्या सोडवण्यात त्या अपयशी होताना स्वत: पाहतात. तेव्हा त्यांची भव्यता/मोठेपण धोक्यात आल्याचे त्यांना जाणवते. काही अंशी आपल्यामधील आत्मप्रौढी त्यांना इतरांचा किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापासून वंचित करते. आपण एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण झालेली आत्मप्रतिमा धोक्यात येईल, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. इतरांचे आयुष्य नियंत्रित करत असताना आपल्या आयुष्यातील स्वनियंत्रण कमी होताना त्यांना दिसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हतबलता, निराशावाद तसेच स्वत:च्या योग्यतेवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतात. आपल्यामधील भव्यता त्यांना डगमगताना जाणवते. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये तर आत्मप्रीतीवाद असतो आणि जेव्हा त्यांचा समाजावरील किंवा इतरांवरील प्रभाव (web of influence) आणि शक्ती जेव्हा धोक्यात येते तेव्हा त्यांचे मानसिक समतोलत्व बिघडते. आणि या समस्यांपासून सुटका म्हणजे आत्महत्या असे त्यांना वाटण्याची शक्यता असते.(लेखक मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)