शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

स्वत:विषयी प्रश्नचिन्ह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:02 IST

जीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही.

- गौतम गवळीजीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही. (suicide is not a permanent solution to temporory problems) कुठलाही देश जसा संकटमुक्त नसतो तसेच व्यक्तीचे आयुष्यही संघर्षविरहित नसते. संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाचे व्यवस्थापन करणे हाच त्याच्यावर उपाय असू शकतो.एखाद्या व्यक्तीचे समाजावर प्रभावीपण असेल, इतरांच्या आयुष्यातील काही समस्या सोडविण्याचे ते काम करत असतील, पण स्वत:मध्ये निराशा, सहिष्णुतेचा अभाव (Low frustration, tolerance) आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे येणारी दोषीभावना, नकारात्मक विचार, वर्तनविषयक उथळपणा (impulsive) पलायनवादी विचार, वैयक्तिक संघर्ष आणि कौटुंबिक कलहाबरोबरच काही प्रमाणात मानसिक आणि शारीरिक आजारपण ही आत्महत्येची कारणे त्यांच्यामुळे प्रामुख्याने असतात. आपल्या वैयक्तिक समस्या सोडवण्यात त्या अपयशी होताना स्वत: पाहतात. तेव्हा त्यांची भव्यता/मोठेपण धोक्यात आल्याचे त्यांना जाणवते. काही अंशी आपल्यामधील आत्मप्रौढी त्यांना इतरांचा किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापासून वंचित करते. आपण एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण झालेली आत्मप्रतिमा धोक्यात येईल, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. इतरांचे आयुष्य नियंत्रित करत असताना आपल्या आयुष्यातील स्वनियंत्रण कमी होताना त्यांना दिसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हतबलता, निराशावाद तसेच स्वत:च्या योग्यतेवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतात. आपल्यामधील भव्यता त्यांना डगमगताना जाणवते. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये तर आत्मप्रीतीवाद असतो आणि जेव्हा त्यांचा समाजावरील किंवा इतरांवरील प्रभाव (web of influence) आणि शक्ती जेव्हा धोक्यात येते तेव्हा त्यांचे मानसिक समतोलत्व बिघडते. आणि या समस्यांपासून सुटका म्हणजे आत्महत्या असे त्यांना वाटण्याची शक्यता असते.(लेखक मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)