शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

स्वत:विषयी प्रश्नचिन्ह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:02 IST

जीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही.

- गौतम गवळीजीवनातील समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, त्यावर आत्महत्या हा कायमस्वरूपी इलाज नाही. (suicide is not a permanent solution to temporory problems) कुठलाही देश जसा संकटमुक्त नसतो तसेच व्यक्तीचे आयुष्यही संघर्षविरहित नसते. संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाचे व्यवस्थापन करणे हाच त्याच्यावर उपाय असू शकतो.एखाद्या व्यक्तीचे समाजावर प्रभावीपण असेल, इतरांच्या आयुष्यातील काही समस्या सोडविण्याचे ते काम करत असतील, पण स्वत:मध्ये निराशा, सहिष्णुतेचा अभाव (Low frustration, tolerance) आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे येणारी दोषीभावना, नकारात्मक विचार, वर्तनविषयक उथळपणा (impulsive) पलायनवादी विचार, वैयक्तिक संघर्ष आणि कौटुंबिक कलहाबरोबरच काही प्रमाणात मानसिक आणि शारीरिक आजारपण ही आत्महत्येची कारणे त्यांच्यामुळे प्रामुख्याने असतात. आपल्या वैयक्तिक समस्या सोडवण्यात त्या अपयशी होताना स्वत: पाहतात. तेव्हा त्यांची भव्यता/मोठेपण धोक्यात आल्याचे त्यांना जाणवते. काही अंशी आपल्यामधील आत्मप्रौढी त्यांना इतरांचा किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापासून वंचित करते. आपण एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण झालेली आत्मप्रतिमा धोक्यात येईल, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. इतरांचे आयुष्य नियंत्रित करत असताना आपल्या आयुष्यातील स्वनियंत्रण कमी होताना त्यांना दिसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये हतबलता, निराशावाद तसेच स्वत:च्या योग्यतेवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतात. आपल्यामधील भव्यता त्यांना डगमगताना जाणवते. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये तर आत्मप्रीतीवाद असतो आणि जेव्हा त्यांचा समाजावरील किंवा इतरांवरील प्रभाव (web of influence) आणि शक्ती जेव्हा धोक्यात येते तेव्हा त्यांचे मानसिक समतोलत्व बिघडते. आणि या समस्यांपासून सुटका म्हणजे आत्महत्या असे त्यांना वाटण्याची शक्यता असते.(लेखक मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)