शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

आप ‘कतार’ में हैं! भारताच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2023 07:57 IST

विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि कुशल मुत्सद्दी आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा कदाचित सर्वांत कसोटी पाहणारा काळ असेल.

गेल्या वर्षभरापासून अटकेत असलेल्या भारतातील आठ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि वर्षभरापासून भारत-कतारमध्ये या विषयावरून सुरू असलेल्या राजनैतिक पातळीवरील मुत्सद्देगिरीला नवे वळण मिळाले. कतार या शिक्षेची अंमलबजावणी करणार की भारत विविध कायदेशीर मार्ग हाताळून या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात अथवा कतारमधील वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार, हे पाहावे लागेल. 

या प्रकरणाने नौदलातीलच माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाची आठवण होते. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचे प्रकरण भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून धरले आणि कुलभूषण जाधवला झालेल्या मृत्युदंडाला स्थगिती मिळाली; पण कुलभूषण जाधवला भारतात अद्याप परत आणता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुलभूषण प्रकरणाचा ज्या प्रमाणात मोठा गाजावाजा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला होता, तितका या ठिकाणी दिसत नाही. कतारने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताच्या आठ निवृत्त नौसैनिकांना मध्यरात्री अटक केली. भारताला अटकेची माहिती मिळायलाच दोन आठवडे गेले. जेव्हा माहिती मिळाली, त्यानंतर राजनैतिक हालचालींना वेग आला. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ‘काउन्सिलर ॲक्सेस’ देण्यात आला. 

कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची नंतर अनुमती मिळाली; पण त्यांना कतारने सोडले नाही. ज्या भारतीय अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली आहे, ते साधेसुधे अधिकारी नाहीत. कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ट, कमांडर पुरुनेंदू तिवारी, कॅप्टन वीरेंद्रकुमार वर्मा, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश अशी त्यांची नावे आहेत. कॅप्टन नवतेजसिंग यांनी वेलिंग्टन येथील प्रख्यात अशा डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज येथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले आहे, तर कमांडर तिवारी नेविगेशन ऑफिसर आहेत. अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याची ही वेळ पाहता, मध्य पूर्वेतील घडामोडी आणि भारताने नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील घेतलेली भूमिका पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

नवी दिल्लीत भारताने जी-२० परिषदेचे यशस्वी आयोजन केले. याच वेळी भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉरची घोषणा झाली. परिषदेच्या या यशस्वी आयोजनानंतर काही दिवसांतच कॅनडाशी भारताचे संबंध ताणले गेले. कॅनडाच्या आरोपानंतर आणि तणाव वाढल्यानंतर कॅनडाच्या भारतातील दूतावासातील ४१ अधिकाऱ्यांना माघारी पाठविण्याचे आदेश भारताने दिले. या गोष्टी घडत असताना अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी कॅनडाच्या बाजूने भूमिका घेतली, तसेच हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारत-मध्य पूर्व-युरोप या कॉरिडॉरची केलेली घोषणा हेदेखील एक कारण असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी केले. 

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे भारत इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे आहे, असे सांगितले. भारताच्या पॅलेस्टीनबाबत दीर्घ काळापासून असलेल्या भूमिकेला त्यामुळे तडा गेल्याची भावना निर्माण झाली. भारताने नंतर आपली बाजू सावरली आणि गाझा पट्टीमध्ये मानवी मदत पाठवली. अमेरिका कतारच्या संपर्कात आहे. इस्रायल आणि अरब देश आणि विशेषतः सौदी अरेबिया यांच्यातील शांततेचा करार लांबणीवर पडावा यासाठी सध्याचा संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. या संघर्षामुळे आता भारत-मध्य पूर्व-युरोप हाही कॉरिडॉर लांबणीवर पडला आहे. आखाती देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. कतारमध्ये आठ अधिकाऱ्यांना झालेल्या शिक्षेनंतर भारताच्या मुत्सद्देगिरीसमोर खूप मोठे आव्हान तयार झाले आहे. 

‘वसुधैव कुटुंबकम’चा आदर्श नारा ज्या जी-२० परिषदेमध्ये भारताने दिला, त्याला काही महिन्यांतच तडे गेले आहेत. परराष्ट्र संबंधांमध्ये आदर्शवाद आणि वास्तववाद यांच्यातील भेद समजून पावले उचलली, तर मुत्सद्देगिरीला यश येते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि सामरिक तज्ज्ञ के. सुब्रह्मण्यम यांचे चिरंजीव आणि विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि कुशल मुत्सद्दी आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा कदाचित सर्वांत कसोटी पाहणारा काळ असेल. कतारमधील शिक्षा झालेल्या आठ निवृत्त अधिकाऱ्यांना भारतात सुखरूप आणणे हेच आता प्राधान्याचे आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचे यशही त्यावर ठरणार आहे. ही मुत्सद्देगिरी आता ‘कतार में’ असून, त्यावरच सारे काही अवलंबून आहे! 

टॅग्स :QatarकतारS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत