शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सिन्हांना पायउतार करा

By admin | Updated: September 10, 2014 03:52 IST

देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे (सीबीआय) संचालक रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा देणे व बाजूला होणे हेच त्यांच्या, गुप्तचर यंत्रणेच्या व देशाच्या हिताचे

देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे (सीबीआय) संचालक रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा देणे व बाजूला होणे हेच त्यांच्या, गुप्तचर यंत्रणेच्या व देशाच्या हिताचे आहे. टू-जी घोटाळ्याचा तपास या यंत्रणेकडे असताना त्याच घोटाळ्यात अडकलेले अनेक संशयित व आरोपी या सिन्हांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन खुलेआम भेटत होते. ज्या काळात या चौकशीला वेग आला, त्या काळात, म्हणजे मे २०१३ ते आॅगस्ट २०१४ या काळात या भेटींची संख्या अनपेक्षितपणे वाढलेली व त्यांचा काळही नको तेवढा लांबलेला दिसला. रणजित सिन्हांच्या निवासस्थानी पहारा देण्यासाठी त्यांच्या यंत्रणेचे १३ शिपाई व ४ अधिकारी यांची मोठी फौज तैनात आहे. घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नावांची व भेटीच्या वेळेची तपशीलवार माहिती ठेवणारे एक रजिस्टरही या फौजेजवळ आहे. आता ते रजिस्टर या प्रकरणातील एक नामवंत कायदेपंडित अ‍ॅड. प्रशांतभूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले असून, त्यातून टू-जी प्रकरणाचा तपास करणाऱ्या या यंत्रणेतच बरेच काही संशयास्पद असल्याचे न्यायालयाच्या व देशाच्या लक्षात आणून दिले आहे. आजच्या काळात कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही, हे चांगले ठाऊक असलेल्या रणजित सिन्हा यांना आपल्या घराच्या दारात ठेवलेले पाहुण्यांची हजेरी सांगणारे रजिस्टर न्यायालयात दाखल होऊ शकते हे कळले नसेल तर त्यांची कीवच करावी लागेल. अशी नादान माणसे देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या सर्वोच्च पदावर असणे हे देशाचेही दुर्दैवच होय. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या पीठासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे, त्याचे प्रमुख न्या. दत्तू यांनी हा सारा प्रकार गंभीर असल्याचे सांगून त्याविषयीचे आपले म्हणणे सिन्हांनी न्यायालयाला लेखी स्वरूपात सादर करावे, असा आदेश दिला आहे. त्यावर आपण आपले निवेदन लेखी न देता तोंडी देऊ, अशी खळखळ सिन्हांनी केली आहे. मात्र, न्यायालयाने कठोर कारवाईची तंबी देताच ते निवळले व लेखी निवेदन एक आठवड्याच्या आत देण्याचे त्यांनी मान्य केले. पण पुढे जाऊन ते हजेरी रजिस्टर विरोधी पक्षाच्या वकिलांच्या हाती गेलेच कसे, याचा खुलासा त्यांच्याकडून मागवा अशी अफलातून विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती अर्थातच ऐकली नाही... टू-जी घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडून होत असली तरी ती सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेखाली सुरू आहे. आपल्यावर न्यायालयाची करडी नजर आहे, हे ठाऊक असतानाही सिन्हा यांनी त्या गुन्ह्यातील आरोपींना आपल्या घरी भेटणे व बोलणे हे त्यांच्या निर्ढावलपणाचे लक्षण मानावे लागेल. अशी माणसे देशाच्या तपास यंत्रणा चालवीत असतील, तर येथे भ्रष्टाचाराशिवाय काही होणारच नाही. आपले गुपित उघड झाल्यानंतर व न्यायालयात पुरती फटफजिती झाल्यानंतर सिन्हा स्वत:च्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आपल्या घरी पहारा करणाऱ्या अधिकाऱ्यांमधलेच काही लोक विरोधकांना सामील असावेत, अशीही शंका त्यांनी जाहीररीत्या बोलून दाखविली आहे. आपल्या खात्यात आपले विरोधक आहेत आणि तेही अशा कामी गुंतले असावेत, असेही त्यांनी म्हणणे म्हणजे आपला अपराध उघड झाल्यानंतर चाचपडत राहण्यासारखे आहे. सर्वोच्च न्यायालय त्याचा योग्य तो निकाल लावील व या सिन्हा यांना त्यांची योग्य ती जागाही दाखवील. मात्र, ते होईपर्यंत टू-जी घोटाळ्याचा तपास सिन्हांकडून व त्याच्या यंत्रणेकडून तत्काळ काढून घेतला जाणे आवश्यक आहे. तसे एकाएकी करता येत नसेल तर निदान सिन्हा यांना त्यांच्या पदावरून तत्काळ पायउतार केले पाहिजे. अन्यथा, टू-जी घोटाळ्याची योग्य ती चौकशी होऊन तीत अडकलेले मोठे गुन्हेगार सरकारच्या जाळ्यात कधीही सापडणार नाहीत. हा प्रश्न एवढ्यावरच थांबणाराही नाही. सीबीआय ही यंत्रणा केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येणारी आहे. त्यामुळे तिच्यावर गृहमंत्रालयाचे नियंत्रणही आहे. हे नियंत्रण हटविण्याची व सीबीआयला स्वातंत्र्य व स्वायत्तता देण्याची भाषा अलीकडे मोठ्या प्रमाणावर अनेकांनी बोलून दाखविली आहे. सीबीआयला स्वायत्त करणे हे गैर नाही. मात्र, अशा स्वायत्त झालेल्या यंत्रणेवर रणजित सिन्हांसारखे संशयास्पद चारित्र्याचे लोक येऊन बसणार असतील व त्यांना सीबीआयकडून चौकशी होत असलेले आरोपी खुलेआम येऊन भेटत असतील, तर मग ही स्वायत्तता अनिष्ट रीतीने वापरली जाण्याची भीतीच मोठी आहे. त्यामुळे सिन्हांच्या प्रकरणाने सीबीआयची ही स्वायत्तताही अडचणीची बनली आहे.