शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
3
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
4
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
5
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
6
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
7
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
8
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
9
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
10
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
11
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
12
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
13
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
14
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
15
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
16
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
17
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
18
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
19
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
20
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर

एकसंघ प्रयत्नांनी येईल समृध्दता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 22:15 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुका या वर्षी झाल्या. सर्व राजकीय पक्षांनी विकासाचे जाहीरनामे मांडले. आता पुढील पाच वर्षांत त्याविषयी अंमलबजावणीची अपेक्षा आहे. समृध्द वारसा आहे, तो पुढे नेण्यासाठी एकसंघ प्रयत्न हवे.

मिलिंद कुलकर्णी२०१९ या वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी जिल्ह्याच्या विकासाचे चित्र मतदारांपुढे मांडले आहे. मतदारांनी त्यांचा कौल दिला. त्या कौलातून सर्वच राजकीय पक्षांना सत्ता बहाल झालेली आहे.केंद्र सरकारमध्ये भाजपा, राज्य सरकारमध्ये शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्तेत वाटा मिळाला असल्याने लोकप्रतिनिधींना जाहीरनामा अंमलात आणण्याची संधी प्राप्त झाली आहे. या निकालातून जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा लाभ जळगाव जिल्ह्याला मिळायला हवा. लोकप्रतिनिधींमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हायला हवी. खासदार, आमदार यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगराध्यक्ष, सरपंच या पदाधिकाऱ्यांना विकास कामे करण्याची संधी मिळालेली आहे.विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज नेहमीच मांडली जात असते. त्यासाठी पश्चिम महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींचे उदाहरण दिले जाते. तेथील लोकप्रतिनिधी एकत्र येऊन केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणतात, नंतर तो कोठे खर्च करायचा याविषयी वाद घालतात. असे आपल्याकडे व्हायला हवे.गिरणा नदीवर ७ बलून बंधारे, शेळगाव बॅरेज, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनांना केंद्रीय जलआयोगाची मान्यता दोन्ही खासदारांच्या प्रयत्नांनी मिळाली. हे सकारात्मक पाऊल आहे. आता राज्य सरकारने या कामांसाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेसच्या आमदारांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.विमानसेवा, रेल्वे आणि राष्टÑीय महामार्ग या दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सेवांमध्ये पुढील काळात मोठे बदल संभवत आहे. कामे मंजूर झाली आहेत, मात्र निधी, भूसंपादन, राजकीय हस्तक्षेप या अडचणींवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.योगायोगाने लोकप्रतिनिधींमध्ये अनुभवी आणि तरुण असे संमिश्र समीकरण जुळून आले आहे. अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन आणि नवागतांचा उत्साह आणि धडपडीचा मिलाफ झाला, तर विकासाची गाडी वेगाने धावेल.सहकार क्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. साखर कारखान्यांची अवस्था बिकट आहे. चोपडा कारखान्यापाठोपाठ मधुकर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची वेळ आली आहे. सहकारी सूतगिरण्या तर कधीच बंद पडल्या आहेत. खाजगीकरणाकडे ही वाटचाल असली तरी त्यात शेतकºयाचे हित साधते काय, हेदेखील बघायला हवे.क्रीडा क्षेत्राच्यादृष्टीने जिल्ह्याचे योगदान खूप मोठे आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये संघटना, प्रशिक्षक आणि खेळाडू चांगली कामगिरी करीत आहे. ही कामगिरी आणखी उंचावण्यासाठी शासकीय पाठबळाची आवश्यकता आहे. तालुका क्रीडा संकुलाचे प्रश्न गांभीर्याने मार्गी लावायला हवे. विद्यापीठ ते शालेय अशा क्रीडा स्पर्धामध्ये व्यवहार्यता यायला हवी. केवळ शासकीय उपचारांप्रमाणे त्या उरकायला नको.‘जळगाव हे सांस्कृतिक गाव व्हावे’ असे प्रत्येकाला वाटते आणि प्रत्येक सांस्कृतिक संस्था त्यासाठी मनापासून कार्य करीत आहे. जळगावच्या कलावंतांना राज्यस्तरीय सन्मान आणि दखल घेतली जात आहे, हे भूषणावह आहे. त्यांनाही शासकीय आणि समाजाच्या पाठबळाची नितांत आवश्यकता आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका या वर्षी झाल्या. सर्व राजकीय पक्षांनी विकासाचे जाहीरनामे मांडले. आता पुढील पाच वर्षांत त्याविषयी अंमलबजावणीची अपेक्षा आहे. समृध्द वारसा आहे, तो पुढे नेण्यासाठी एकसंघ प्रयत्न हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव