शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करा पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:19 IST

खरं तर महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार नाही, त्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार?

- - गजानन चोपडे आरोग्य आणि शिक्षणावर बजेटमध्ये सर्वाधिक तजवीज करण्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या शासनाने आता राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये अपुरी साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याची प्राजंळ (?) कबुली दिली आहे. यावर उपाय म्हणून गुजरातच्या धर्तीवर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ३०० खाटांची (बेड) शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आता खासगी संस्थांना चालविण्यास दिली जाणार आहेत. अर्थात पैशांअभावी महागड्या औषधी घेण्याची कुवत नसणाºयांना सध्या मोफत मिळत असलेल्या या सेवेपासूनही वंचित ठेवण्याचा घाट असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनेही या निर्णयाचा विरोध करीत यावर शिक्कामोर्तब केले आहे. गुजरातेत वैद्यकीय सुविधा महाग आहेत. सामान्य माणसाला त्या परवडणाºया नाही. अर्थात गुजरात सरकारचा हा प्रयोग अपयशी ठरला असताना महाराष्टÑात गुजरात पॅर्टन लागू करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शासनाचे आत्मघाती पाऊल होय.खरं तर महाराष्टÑात शासकीय वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करण्याची अजिबात गरज नाही. ते अप्रत्यक्षपणे केव्हाच झाले आहे. अनेक जिल्हा रूग्णालयांमध्ये आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रे नादुरुस्त असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याचाच आसरा घ्यावा लागतो. औषधांचा तुटवडा तर नेहमीचीच बोंब. गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात तर चक्क बंदी असलेल्या औषधीचे खरेदी प्रकरण नुकतेच गाजले. बनावट बिलाच्या आधारे खरेदी करण्यात आलेल्या या औषधीने रुग्णालय व्यवस्थापनाच्या भ्रष्ट कारभाराचे बिंग फोडले. ओरड झाली तेव्हा कुठे फार्मासिस्टसह औषध निर्मात्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शासनाच्या देखरेखित सुरू असताना जर रुग्णालयांचीही अवस्था असेल तर खासगीकरणानंतर रुग्णांचे कसे हाल होतील, याचा विचार न केलेलाच बरा. आदिवासी भागात तर वैद्यकीय सेवेची पार वाट लागली आहे.आजही गडचिरोली जिल्ह्यात होरडी गावातील आजारी महिलेला रुग्णवाहिकेअभावी खाटेवर झोपवून नाल्यातील पाच फुट पाण्यातून आरोग्य केंद्रात न्यावे लागत असेल तर ही बाब परोगामी महाराष्टÑाला नक्कीच शोभणारी नाही. यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना थेट मल्टीस्पेशालिटीमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. अत्यावश्यक असणाºया चाचण्या गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी रुग्णांकडून अंडरटेकिंग घेऊन शहरातील खासगी लॅबला रसद पुरविली जात असल्याचा संतापजनक प्रकार घडत असताना कुणी ब्र काढायला तयार नाही. एलएफटी (लिव्हर फंक्शन टेस्ट) केलएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) सारख्या महत्त्वाच्या चाचण्या बाहेरून कराव्या लागतात. वैद्यकीय महाविद्यालयातील सोईस्करपणे मशीनरी बंद पाडली जाते. तातडीने पत्रव्यवहार केल्याच्या नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे यांचे पाप सिद्ध होत नाहीत. शासनाच्या अख्त्यारित असलेल्या या सेवा आत्ताच रुग्णांना इमानेइतबारे पुरविल्या जात नाहीत तर खासगी तत्त्वावर दिल्यास गरीब रुग्णांचा छळ होणार नाही, त्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार?

टॅग्स :doctorडॉक्टरnewsबातम्या