शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 07:03 IST

Mohan Bhagwat PM Modi: बदलत्या काळाबरोबर बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी खुल्या मनाने स्वागतशील असणे ही मोहन भागवतजी यांची फार मोठी खासियत आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधानआज ११ सप्टेंबर. हा दिवस वेगवेगळ्या घटनांशी जोडलेला आहे. एक आठवण १८९३ ची.  याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आणि याच दिवशी विश्वबंधुत्वाला धक्का देणारी घटना घडली - अमेरिकेवर झालेला ‘नाइन-इलेव्हन’चा हल्ला. आजच्या दिवसाची आणखी एक खासियत आहे. ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मंत्रावर चालत समाजाला संघटित करण्यासाठी, समता-समरसता आणि बंधुत्वाची भावना बळकट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे सरसंघचालक मोहन भागवतजी यांचा आज जन्मदिन आहे. मी भागवतजींना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना! 

माझा  भागवतजींच्या कुटुंबाशी प्रदीर्घ संबंध आहे. त्यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव भागवतजींसोबत काम करण्याचे सौभाग्य मला लाभले. मधुकररावजी आयुष्यभर राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी समर्पित राहिले. तारुण्यातला बराच काळ त्यांनी गुजरातमध्ये संघकार्याची पायाभरणी केली. आपल्या पुत्रावर तेच समर्पणाचे संस्कार त्यांनी केले.

मोहन भागवतजी १९७० च्या दशकात संघाचे प्रचारक झाले. ‘प्रचारक परंपरा’ ही संघकार्याची विशेषता. गेल्या १०० वर्षांत देशभक्तीच्या प्रेरणेने भारलेल्या हजारो युवक-युवतींनी आपले घर-परिवार त्यागून संघ परिवाराच्या माध्यमातून आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राला समर्पित केले आहे. भागवतजी त्या महान परंपरेचे पाईक. आणीबाणीच्या  काळात प्रचारक म्हणून भागवतजींनी विरोधी आंदोलनाला सतत बळकटी दिली. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि मागास भागात, विशेषतः विदर्भात काम केले. १९९० च्या दशकात ‘अखिल भारतीय शारीरिक शिक्षण कार्यक्रम प्रमुख’ म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची आजही अनेक स्वयंसेवक आठवण करतात. 

२००० साली भागवतजी सरकार्यवाह झाले आणि येथेही भागवतजींनी आपल्या अनोख्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटवला. २००९ मध्ये भागवतजी सरसंघचालक झाले आणि आजही अत्यंत ऊर्जा घेऊन कार्यरत आहेत. सरसंघचालक होणे म्हणजे केवळ एक संघटनात्मक जबाबदारी नव्हे. हे एका पवित्र विश्वासाचे बंधन आहे. पिढ्यान् पिढ्या अनेक दूरदर्शी व्यक्तिमत्त्वांनी हा विश्वास बळकट केला. 

राष्ट्राच्या नैतिक आणि सांस्कृतिक मार्गाला दिशा दिली. सरसंघचालकपदाची जबाबदारी निभावत असताना भागवतजींनी त्यात आपली वैयक्तिक शक्ती, बुद्धी आणि सहृदय नेतृत्वही जोडले आहे.  त्यांनी अधिकाधिक युवकांना संघकार्याकरिता प्रेरित केले. बदलत्या काळाबरोबर बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी खुल्या मनाने स्वागतशील असणे ही मोहनजींची फार मोठी खासियत आहे. 

संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वाधिक परिवर्तनाचा कालखंड मानला जाईल. गणवेश बदल, संघशिक्षा वर्गांमध्ये बदल असे अनेक महत्त्वपूर्ण बदल त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कोरोना काळात त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिलेली दिशा आणि प्रेरणा सदैव स्मरणात राहील.

समाजकल्याणासाठी संघशक्तीचा सातत्याने उपयोग व्हावा यावर मोहन भागवतजींचा विशेष भर राहिला आहे. यासाठी त्यांनी पंच परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त केला. यात स्वबोध, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण या सूत्रांवर राष्ट्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक भारतवासीयाला पंच परिवर्तनाच्या या सूत्रांमधून नक्कीच प्रेरणा मिळेल.

मोहनजींच्या स्वभावाची आणखी एक मोठी खासियत म्हणजे ते मृदुभाषी आहेत. दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे.  ते नेहमीच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे प्रबळ समर्थक राहिले आहेत. भारताची विविधता आणि भारतभूमीची शोभा वाढवणाऱ्या अनेक संस्कृती व परंपरांच्या उत्सवात ते संपूर्ण उत्साहाने सहभागी होतात. ते आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून संगीत आणि गायन यात रस घेतात, विविध भारतीय वाद्ये वाजविण्यातही ते प्रवीण आहेत, हे फार कमी लोकांना माहिती असेल. 

स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या प्रत्येक जन आंदोलनांमध्ये मोहन भागवतजींनी सहभाग घेतला आणि संपूर्ण संघ परिवाराला या आंदोलनांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी प्रेरित केले. पर्यावरणाशी निगडित प्रयत्न आणि शाश्वत जीवनशैलीप्रतीचे त्यांचे समर्पण मी जाणतो. आत्मनिर्भर भारतावरदेखील मोहनजींचा फार मोठा भर  आहे. येत्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षांचा  होईल. विजयादशमीचा उत्सव, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि संघाचे शताब्दी वर्ष हे सारे एकाच दिवशी येत आहेत, हाही एक सुखद योगायोगच म्हटला पाहिजे.

भारत आणि जगभरातील लाखो स्वयंसेवकांसाठी हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. आम्ही स्वयंसेवक भाग्यवान आहोत की आमच्याकडे मोहन भागवतजींसारखे दूरदर्शी आणि परिश्रमी सरसंघचालक आहेत. एका तरुण स्वयंसेवकापासून सरसंघचालकापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या निष्ठा आणि वैचारिक दृढतेचे दर्शन घडवतो. विचाराप्रती पूर्ण समर्पण आणि व्यवस्थांमध्ये समयानुकूल बदल करत त्यांच्या नेतृत्वाखाली संघकार्याचा सातत्याने विस्तार होत आहे.

(योगेंद्र यादव यांचा नियमित स्तंभ उद्याच्या अंकात प्रसिद्ध होईल.)

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान