शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

मानवतेचा पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:46 IST

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच.

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच. अखिल मानवजातीच्या कल्याणाची त्यांना आस होती. जगभरात पसरलेल्या आपल्या शिष्यांच्या माध्यमातून विश्वाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. याचीच दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा ‘यू थन्स शांतता पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला होता. दादांचे आयुष्य म्हणजे एक चित्तरकथाच. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबादमधील संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दादांनी एकाच वर्षात दोन-तीन इयत्ता उत्तीर्ण केल्या. दादांनी आयएएस व्हावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र, आपले चुलते साधू वासवानी यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांनी अध्यात्माचा, जगाला शांततेचा संदेश देण्याचा रस्ता पकडला. एम.एस्सी., एलएल.बी. झालेला हा तरुण साधू वासवानी यांचा शिष्योत्तम झाला. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले; परंतु त्याची कोणतीही कटुता कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये आली नाही. त्यांनी कधीही सर्वसंगपरित्यागाचा सल्ला दिला नाही; उलट कर्मसिद्धांताला व्यापक स्वरूप दिले. कर्मसिद्धांतानुसार आपण जे पेरू, तेच उगवते. आपण जर दुसऱ्याला आनंद वाटला, तर त्याबदल्यात आपल्या वाट्याला आनंदच येईल, अशी शिकवण त्यांनी दिली. मानवसेवा, परस्परांवर स्नेहाचा वर्षाव आणि प्राणिमात्रांवरही दया करण्यातूनच जीवन सफल बनेल, ही त्यांची शिकवण होती. जातिधर्मांतील भेद त्यांनी दूर केले. दादा नेहमी म्हणत, की आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किंवा वंशाचे आहोत यापेक्षा आपण भारतमातेची लेकरे आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती मी काय करू शकतो, असे म्हणत असते. मात्र, व्यक्तीतील आत्मविश्वास जागृत असेल, तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. या आत्मविश्वासाच्या बळावरच नवीन भारताची निर्मिती होणार आहे. मांसाहाराविरुद्ध त्यांनी चालविलेल्या मोहिमेने शाकाहाराच्या चळवळीला बळ मिळाले. ती चळवळ पुढे एवढी फोफावली, की साधू वासवानी यांच्या जन्मदिनी २५ नोव्हेंबरला ‘पशू अधिकार दिन’ साजरा केला जाऊ लागला. लाखो लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शाकाहाराचा अंगीकार केला. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रुग्णसेवा या क्षेत्रांत दादांच्या प्रेरणेने प्रचंड संस्थात्मक कार्य उभे राहिले. देशात वेगवेगळ््या ठिकाणी पसरलेल्या सिंधी समाजाला आध्यात्मिक बळ देण्याचे काम साधू वासवानी यांनी केले होते. त्याला दादांनी नवा आयाम दिला. सिंधी वयाच्या नव्याण्णवव्या वर्षापर्यंत अखंड कार्यरत राहून सेवेचे महाव्रत घेतलेला मानवतेचा पुजारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण, विविध माध्यमांतून त्यांचे कार्य हे अमर राहील.

टॅग्स :newsबातम्या