शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेचा पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:46 IST

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच.

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच. अखिल मानवजातीच्या कल्याणाची त्यांना आस होती. जगभरात पसरलेल्या आपल्या शिष्यांच्या माध्यमातून विश्वाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. याचीच दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा ‘यू थन्स शांतता पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला होता. दादांचे आयुष्य म्हणजे एक चित्तरकथाच. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबादमधील संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दादांनी एकाच वर्षात दोन-तीन इयत्ता उत्तीर्ण केल्या. दादांनी आयएएस व्हावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र, आपले चुलते साधू वासवानी यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांनी अध्यात्माचा, जगाला शांततेचा संदेश देण्याचा रस्ता पकडला. एम.एस्सी., एलएल.बी. झालेला हा तरुण साधू वासवानी यांचा शिष्योत्तम झाला. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले; परंतु त्याची कोणतीही कटुता कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये आली नाही. त्यांनी कधीही सर्वसंगपरित्यागाचा सल्ला दिला नाही; उलट कर्मसिद्धांताला व्यापक स्वरूप दिले. कर्मसिद्धांतानुसार आपण जे पेरू, तेच उगवते. आपण जर दुसऱ्याला आनंद वाटला, तर त्याबदल्यात आपल्या वाट्याला आनंदच येईल, अशी शिकवण त्यांनी दिली. मानवसेवा, परस्परांवर स्नेहाचा वर्षाव आणि प्राणिमात्रांवरही दया करण्यातूनच जीवन सफल बनेल, ही त्यांची शिकवण होती. जातिधर्मांतील भेद त्यांनी दूर केले. दादा नेहमी म्हणत, की आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किंवा वंशाचे आहोत यापेक्षा आपण भारतमातेची लेकरे आहोत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती मी काय करू शकतो, असे म्हणत असते. मात्र, व्यक्तीतील आत्मविश्वास जागृत असेल, तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. या आत्मविश्वासाच्या बळावरच नवीन भारताची निर्मिती होणार आहे. मांसाहाराविरुद्ध त्यांनी चालविलेल्या मोहिमेने शाकाहाराच्या चळवळीला बळ मिळाले. ती चळवळ पुढे एवढी फोफावली, की साधू वासवानी यांच्या जन्मदिनी २५ नोव्हेंबरला ‘पशू अधिकार दिन’ साजरा केला जाऊ लागला. लाखो लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शाकाहाराचा अंगीकार केला. याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रुग्णसेवा या क्षेत्रांत दादांच्या प्रेरणेने प्रचंड संस्थात्मक कार्य उभे राहिले. देशात वेगवेगळ््या ठिकाणी पसरलेल्या सिंधी समाजाला आध्यात्मिक बळ देण्याचे काम साधू वासवानी यांनी केले होते. त्याला दादांनी नवा आयाम दिला. सिंधी वयाच्या नव्याण्णवव्या वर्षापर्यंत अखंड कार्यरत राहून सेवेचे महाव्रत घेतलेला मानवतेचा पुजारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. पण, विविध माध्यमांतून त्यांचे कार्य हे अमर राहील.

टॅग्स :newsबातम्या