शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अभिनंदनीय वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:54 IST

पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले.

भारताची लष्करी तयारी आणि आत्मविश्वास पाहता युद्धात आपलेच अतोनात नुकसान होईल ही खुणगाठ पाकिस्तानच्या लष्करी व नागरी राज्यकर्त्यांनी स्वत:शी बांधली असेल. वर्धमानची लगेच सुटका होण्यामागे हे एक कारण आहे.पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले. दुपारी दोन वाजता होणारी सुटका तब्बल सात तास उशीरा झाली. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण पुढे करण्यात आले. अर्थात अभिनंदन जिवंत परत आले यातच देशवासियांना आनंद झाला यात शंका नाही. भारताच्या वायुदलाची क्षमता तसेच परराष्ट्रीय डावपेच या दोन्हींचा समन्वय होऊन वर्धमान यांची सुटका झाली. यातील परराष्ट्रीय डावपेचांचा मुद्दा समजण्यासारखा असला तरी वायुदलाची क्षमता या पैलूचा थोडा तपशील देणे आवश्यक आहे. भारताच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने २७ अत्याधुनिक विमाने घेऊन हल्ला केला. भारताचा हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा इरादा त्यामागे होता. परंतु, भारतीय वायुदलाने ज्या तत्परतेने व सफाईने घुसखोर विमानांवर प्रतिहल्ला केला तो पाहून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नक्कीच चकित झाले असतील. मिग-२१ सारखी कालबाह्य होणारी भारताची विमाने अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या एफ -१६ सारख्या अत्याधुनिक विमानांना पाडू शकतात हे पाकिस्तानसाठी धक्कादायक होते. पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणाऱ्या भारतीय विमानांचा पाकिस्तानला सुगावा लागेपर्यंत भारतीय विमाने परतलीही होती. पाकिस्तान वायुदलाची नाचक्की करणारी ही घटना होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्या मिग विमानांनी झटका दिला. या हवाई झटापटीत दुर्दैवाने वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले असले तरी पकडल्यानंतर वर्धमान यांनी दाखविलेले धैर्य, युद्धकैदी झाल्यानंतरही त्यांच्या देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास याचा जगावर प्रभाव पडला.

वर्धमान यांची सुटका करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला होता. अमेरिका, चीन आणि प्रसंगी मुस्लीम राष्ट्रे यांच्या आधारावर पाकिस्तानने भारताविरुद्धचे घातपाती उद्योग गेली कित्येक वर्षे सुरू ठेवले होते. या मित्रराष्ट्रांपैकी एकानेही या वेळी पाकिस्तानला थारा दिलेला नाही. अमेरिकेने तंबी दिली आणि चीननेही सबुरीचा सल्ला दिला. पण सर्वात अधिक धक्का मुस्लीम राष्ट्रांच्या आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने भारताला दिलेल्या आमंत्रणावरून बसला. या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला प्रथमच भारताला निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले. आयओसी ही फार वजनदार परिषद नसली तरी मुस्लीम राष्ट्रांमध्ये त्याचे महत्त्व आहे. मुस्लीम नसूनही सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला भारत हा देश असल्याने भारतालाही सहभागी होण्यास द्यावे ही मागणी पाकिस्तानने कायम फेटाळून लावली. भारतातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व पाकिस्तानच करतो असा पाकिस्तानचा दावा होता. तो आता संपल्यामुळे पाकिस्तानचा चरफडाट झाला आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा हा मोठा विजय आहे हे त्यांच्या अन्य अनेक बाबींवर टीका करतानाही मान्य केले पाहिजे. आयओसीने भारताला दिलेले आमंत्रण पाकिस्तानला इतके झोंबले की पाकिस्तानने परिषदेवर बहिष्कार टाकला. आयओसीने तो झुगारला हे विशेष.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे परिषदेतील भाषण हे भारताच्या आजपर्यंतच्या धोरणाला अनुसरून होते. भारताचा लढा दहशतवादाविरु द्ध आहे, कोणत्या धर्माविरु द्ध नाही हे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात या भारताच्या चिरंतन तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्यांनी ऋग्वेदातील ‘एकं सद् विप्रा बहुदा वदन्ति’ या वचनातून केला. एक अब्जाहून अधिक भारतीयांची व त्यातील साडेअठरा कोटी मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणून मी इथे आले आहे, असे सांगून भारतातील मुस्लीमही भारताच्या बहुविध संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, असे सांगितले. आखाती देश व यूएई यांच्याशी भारताचे संबंध दृढ होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. अर्थात ओआयसीच्या या आमंत्रणामागे व्यापारी हेतूही आहेत. सौदी अरेबिया किंवा यूएई अशा राष्ट्रांना भारताचे व्यापारी महत्त्व लक्षात आले आहे. जिहादला मदत करून राष्ट्रे चालविता येत नाहीत हे त्या देशांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानच्या हे अद्याप लक्षात आलेले नाही हे त्या देशाच्या नागरिकांचे दुर्दैव. जगातील वारे बदलत आहे व चालू वर्तमान हे भारतासाठी अभिनंदनीय आहे.