शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

अभिनंदनीय वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:54 IST

पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले.

भारताची लष्करी तयारी आणि आत्मविश्वास पाहता युद्धात आपलेच अतोनात नुकसान होईल ही खुणगाठ पाकिस्तानच्या लष्करी व नागरी राज्यकर्त्यांनी स्वत:शी बांधली असेल. वर्धमानची लगेच सुटका होण्यामागे हे एक कारण आहे.पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले. दुपारी दोन वाजता होणारी सुटका तब्बल सात तास उशीरा झाली. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण पुढे करण्यात आले. अर्थात अभिनंदन जिवंत परत आले यातच देशवासियांना आनंद झाला यात शंका नाही. भारताच्या वायुदलाची क्षमता तसेच परराष्ट्रीय डावपेच या दोन्हींचा समन्वय होऊन वर्धमान यांची सुटका झाली. यातील परराष्ट्रीय डावपेचांचा मुद्दा समजण्यासारखा असला तरी वायुदलाची क्षमता या पैलूचा थोडा तपशील देणे आवश्यक आहे. भारताच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने २७ अत्याधुनिक विमाने घेऊन हल्ला केला. भारताचा हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा इरादा त्यामागे होता. परंतु, भारतीय वायुदलाने ज्या तत्परतेने व सफाईने घुसखोर विमानांवर प्रतिहल्ला केला तो पाहून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नक्कीच चकित झाले असतील. मिग-२१ सारखी कालबाह्य होणारी भारताची विमाने अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या एफ -१६ सारख्या अत्याधुनिक विमानांना पाडू शकतात हे पाकिस्तानसाठी धक्कादायक होते. पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणाऱ्या भारतीय विमानांचा पाकिस्तानला सुगावा लागेपर्यंत भारतीय विमाने परतलीही होती. पाकिस्तान वायुदलाची नाचक्की करणारी ही घटना होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्या मिग विमानांनी झटका दिला. या हवाई झटापटीत दुर्दैवाने वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले असले तरी पकडल्यानंतर वर्धमान यांनी दाखविलेले धैर्य, युद्धकैदी झाल्यानंतरही त्यांच्या देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास याचा जगावर प्रभाव पडला.

वर्धमान यांची सुटका करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला होता. अमेरिका, चीन आणि प्रसंगी मुस्लीम राष्ट्रे यांच्या आधारावर पाकिस्तानने भारताविरुद्धचे घातपाती उद्योग गेली कित्येक वर्षे सुरू ठेवले होते. या मित्रराष्ट्रांपैकी एकानेही या वेळी पाकिस्तानला थारा दिलेला नाही. अमेरिकेने तंबी दिली आणि चीननेही सबुरीचा सल्ला दिला. पण सर्वात अधिक धक्का मुस्लीम राष्ट्रांच्या आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने भारताला दिलेल्या आमंत्रणावरून बसला. या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला प्रथमच भारताला निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले. आयओसी ही फार वजनदार परिषद नसली तरी मुस्लीम राष्ट्रांमध्ये त्याचे महत्त्व आहे. मुस्लीम नसूनही सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला भारत हा देश असल्याने भारतालाही सहभागी होण्यास द्यावे ही मागणी पाकिस्तानने कायम फेटाळून लावली. भारतातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व पाकिस्तानच करतो असा पाकिस्तानचा दावा होता. तो आता संपल्यामुळे पाकिस्तानचा चरफडाट झाला आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा हा मोठा विजय आहे हे त्यांच्या अन्य अनेक बाबींवर टीका करतानाही मान्य केले पाहिजे. आयओसीने भारताला दिलेले आमंत्रण पाकिस्तानला इतके झोंबले की पाकिस्तानने परिषदेवर बहिष्कार टाकला. आयओसीने तो झुगारला हे विशेष.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे परिषदेतील भाषण हे भारताच्या आजपर्यंतच्या धोरणाला अनुसरून होते. भारताचा लढा दहशतवादाविरु द्ध आहे, कोणत्या धर्माविरु द्ध नाही हे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात या भारताच्या चिरंतन तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्यांनी ऋग्वेदातील ‘एकं सद् विप्रा बहुदा वदन्ति’ या वचनातून केला. एक अब्जाहून अधिक भारतीयांची व त्यातील साडेअठरा कोटी मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणून मी इथे आले आहे, असे सांगून भारतातील मुस्लीमही भारताच्या बहुविध संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, असे सांगितले. आखाती देश व यूएई यांच्याशी भारताचे संबंध दृढ होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. अर्थात ओआयसीच्या या आमंत्रणामागे व्यापारी हेतूही आहेत. सौदी अरेबिया किंवा यूएई अशा राष्ट्रांना भारताचे व्यापारी महत्त्व लक्षात आले आहे. जिहादला मदत करून राष्ट्रे चालविता येत नाहीत हे त्या देशांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानच्या हे अद्याप लक्षात आलेले नाही हे त्या देशाच्या नागरिकांचे दुर्दैव. जगातील वारे बदलत आहे व चालू वर्तमान हे भारतासाठी अभिनंदनीय आहे.