शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अभिनंदनीय वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:54 IST

पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले.

भारताची लष्करी तयारी आणि आत्मविश्वास पाहता युद्धात आपलेच अतोनात नुकसान होईल ही खुणगाठ पाकिस्तानच्या लष्करी व नागरी राज्यकर्त्यांनी स्वत:शी बांधली असेल. वर्धमानची लगेच सुटका होण्यामागे हे एक कारण आहे.पाकिस्तानच्या ताब्यात दुर्दैवाने सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सरकारने शुक्रवारी रात्री रडीचा डाव खेळत भारतात परत पाठविले. दुपारी दोन वाजता होणारी सुटका तब्बल सात तास उशीरा झाली. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण पुढे करण्यात आले. अर्थात अभिनंदन जिवंत परत आले यातच देशवासियांना आनंद झाला यात शंका नाही. भारताच्या वायुदलाची क्षमता तसेच परराष्ट्रीय डावपेच या दोन्हींचा समन्वय होऊन वर्धमान यांची सुटका झाली. यातील परराष्ट्रीय डावपेचांचा मुद्दा समजण्यासारखा असला तरी वायुदलाची क्षमता या पैलूचा थोडा तपशील देणे आवश्यक आहे. भारताच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने २७ अत्याधुनिक विमाने घेऊन हल्ला केला. भारताचा हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा इरादा त्यामागे होता. परंतु, भारतीय वायुदलाने ज्या तत्परतेने व सफाईने घुसखोर विमानांवर प्रतिहल्ला केला तो पाहून पाकिस्तानचे लष्करी अधिकारी नक्कीच चकित झाले असतील. मिग-२१ सारखी कालबाह्य होणारी भारताची विमाने अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या एफ -१६ सारख्या अत्याधुनिक विमानांना पाडू शकतात हे पाकिस्तानसाठी धक्कादायक होते. पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणाऱ्या भारतीय विमानांचा पाकिस्तानला सुगावा लागेपर्यंत भारतीय विमाने परतलीही होती. पाकिस्तान वायुदलाची नाचक्की करणारी ही घटना होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्या मिग विमानांनी झटका दिला. या हवाई झटापटीत दुर्दैवाने वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले असले तरी पकडल्यानंतर वर्धमान यांनी दाखविलेले धैर्य, युद्धकैदी झाल्यानंतरही त्यांच्या देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास याचा जगावर प्रभाव पडला.

वर्धमान यांची सुटका करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणला होता. अमेरिका, चीन आणि प्रसंगी मुस्लीम राष्ट्रे यांच्या आधारावर पाकिस्तानने भारताविरुद्धचे घातपाती उद्योग गेली कित्येक वर्षे सुरू ठेवले होते. या मित्रराष्ट्रांपैकी एकानेही या वेळी पाकिस्तानला थारा दिलेला नाही. अमेरिकेने तंबी दिली आणि चीननेही सबुरीचा सल्ला दिला. पण सर्वात अधिक धक्का मुस्लीम राष्ट्रांच्या आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने भारताला दिलेल्या आमंत्रणावरून बसला. या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला प्रथमच भारताला निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले. आयओसी ही फार वजनदार परिषद नसली तरी मुस्लीम राष्ट्रांमध्ये त्याचे महत्त्व आहे. मुस्लीम नसूनही सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला भारत हा देश असल्याने भारतालाही सहभागी होण्यास द्यावे ही मागणी पाकिस्तानने कायम फेटाळून लावली. भारतातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व पाकिस्तानच करतो असा पाकिस्तानचा दावा होता. तो आता संपल्यामुळे पाकिस्तानचा चरफडाट झाला आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा हा मोठा विजय आहे हे त्यांच्या अन्य अनेक बाबींवर टीका करतानाही मान्य केले पाहिजे. आयओसीने भारताला दिलेले आमंत्रण पाकिस्तानला इतके झोंबले की पाकिस्तानने परिषदेवर बहिष्कार टाकला. आयओसीने तो झुगारला हे विशेष.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे परिषदेतील भाषण हे भारताच्या आजपर्यंतच्या धोरणाला अनुसरून होते. भारताचा लढा दहशतवादाविरु द्ध आहे, कोणत्या धर्माविरु द्ध नाही हे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्म एकाच ठिकाणी घेऊन जातात या भारताच्या चिरंतन तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्यांनी ऋग्वेदातील ‘एकं सद् विप्रा बहुदा वदन्ति’ या वचनातून केला. एक अब्जाहून अधिक भारतीयांची व त्यातील साडेअठरा कोटी मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणून मी इथे आले आहे, असे सांगून भारतातील मुस्लीमही भारताच्या बहुविध संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, असे सांगितले. आखाती देश व यूएई यांच्याशी भारताचे संबंध दृढ होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. अर्थात ओआयसीच्या या आमंत्रणामागे व्यापारी हेतूही आहेत. सौदी अरेबिया किंवा यूएई अशा राष्ट्रांना भारताचे व्यापारी महत्त्व लक्षात आले आहे. जिहादला मदत करून राष्ट्रे चालविता येत नाहीत हे त्या देशांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानच्या हे अद्याप लक्षात आलेले नाही हे त्या देशाच्या नागरिकांचे दुर्दैव. जगातील वारे बदलत आहे व चालू वर्तमान हे भारतासाठी अभिनंदनीय आहे.