शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:27 IST

अकोल्यात २९ जानेवारी रोजी आयोजित ओबीसी मेळाव्यात, सामाजिक अभियांत्रिकीच्या मार्गावर कायम असल्याचे संकेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले. परंपरागत समर्थकांना आणखी भक्कमपणे आपल्या बाजूने उभे करतानाच, ओबीसी दुरावणार नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत.

- राजेश शेगोकारकोरेगाव-भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभ्या महाराष्टÑाचे लक्ष वेधले. त्यांच्या आवाहनानुसार राज्यभरात कडकडीत बंद पाळल्या गेला. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले. त्या आंदोलनामुळे दलित चळवळीचे नेते म्हणून अ‍ॅड. आंबेडकरांच्या नावावर , पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले; परंतु आंदोलनाची तीव्रता पाहता, बहुजन समाज अ‍ॅड. आंबेडकरांपासून दूर जाईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. या पाशर््वभूमीवर, गत सोमवारी अकोल्यात ओबीसी मेळावा घेऊन, सामाजिक अभियांत्रिकीचा ‘अकोला पॅटर्न’ भक्कम करण्याचा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकरांनी केला.हक्काच्या दलित मतपेढीला ओबीसी मतांची जोड देत, सत्ता सोपान गाठण्याचा यशस्वी प्रयोग, अकोला जिल्ह्यात अ‍ॅड. आंबेडकरांनी केला. ‘अकोला पॅटर्न’ नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे अपत्य म्हणजे भारिप-बहुजन महासंघ! या प्रयोगाने १९९० ते २००४ या कालावधीत सुवर्णकाळ अनुभवला. आंबेडकर या नावामुळे दलित समाजावर असलेली पकड आणि सोबतीला अठरापगड जातींची बांधलेली मोट, यामुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, अशा प्रत्येक राजकीय पटलावर यश लाभले. गेल्या काही वर्षात मात्र अ‍ॅड. आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला थोडी घरघर लागली. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभेच्या अकोला मतदारसंघात पराभूत झाले. अकोला जिल्हा परिषद अजूनही त्यांच्या ताब्यात असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात यश लाभले. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पाशर््वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.कोरेगाव-भीमा प्रकरण ही अ‍ॅड. आंबेडकरांच्या नव्या डावाची नांदी होती. परंपरागत मतपेढी मजबूत करतानाच, ओबीसी समाज दुरावणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. विकासाच्या मुद्यावर भाजपाला आलेले अपयश, दलितांवरील वाढते हल्ले व अत्याचार, ओबीसींना मिळालेल्या २७ टक्के आरक्षणाचे खरे स्वरूप, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ५४० कोटींवरून केवळ ५८ कोटींवर आणण्याचा प्रकार, वाढता धार्मिक उन्माद, रा. स्व. संघाचा छुपा ‘अजेंडा’ अशा मुद्यांचा दारूगोळा घेऊन, अ‍ॅड. आंबेडकरांनी रणशिंग फुंकले आहे.दुसरीकडे भाजपाच्या विरोधात असलेल्या गैर राजकीय मंचांवरही त्यांचा वावर वाढला आहे. हे सारे प्रयोग करताना, गत काही निवडणुकांमध्ये ओबीसी समाज आपल्यापासून का दूर गेला, यासंदर्भात आत्ममंथन करणेही गरजेचे आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी मोठे केलेले नेते स्वप्रतिमा आणि स्वहितात अतिव्यस्त झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमधला संवाद तुटला आहे. परिणामी अ‍ॅड. आंबेडकर आले की गोळा होणारा गोतावळा त्यांनी अकोला सोडताच पुन्हा विखरतो.एकीकडे काँग्रेस अ‍ॅड. आंबेडकरांना जवळ करण्यासाठी उत्सुक आहे, तर दुसरीकडे ते स्वत: तिसरा पर्याय उभा करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी ओबीसींचा जागर करताना ते दुरावणार नाहीत याची काळजी घेतल्यास, ‘अकोला पॅटर्न’चा सुर्वणकाळ परतू शकतो. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र