शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:27 IST

अकोल्यात २९ जानेवारी रोजी आयोजित ओबीसी मेळाव्यात, सामाजिक अभियांत्रिकीच्या मार्गावर कायम असल्याचे संकेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले. परंपरागत समर्थकांना आणखी भक्कमपणे आपल्या बाजूने उभे करतानाच, ओबीसी दुरावणार नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत.

- राजेश शेगोकारकोरेगाव-भीमा प्रकरणात आक्रमक भूमिका घेत, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी उभ्या महाराष्टÑाचे लक्ष वेधले. त्यांच्या आवाहनानुसार राज्यभरात कडकडीत बंद पाळल्या गेला. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले. त्या आंदोलनामुळे दलित चळवळीचे नेते म्हणून अ‍ॅड. आंबेडकरांच्या नावावर , पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले; परंतु आंदोलनाची तीव्रता पाहता, बहुजन समाज अ‍ॅड. आंबेडकरांपासून दूर जाईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. या पाशर््वभूमीवर, गत सोमवारी अकोल्यात ओबीसी मेळावा घेऊन, सामाजिक अभियांत्रिकीचा ‘अकोला पॅटर्न’ भक्कम करण्याचा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकरांनी केला.हक्काच्या दलित मतपेढीला ओबीसी मतांची जोड देत, सत्ता सोपान गाठण्याचा यशस्वी प्रयोग, अकोला जिल्ह्यात अ‍ॅड. आंबेडकरांनी केला. ‘अकोला पॅटर्न’ नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे अपत्य म्हणजे भारिप-बहुजन महासंघ! या प्रयोगाने १९९० ते २००४ या कालावधीत सुवर्णकाळ अनुभवला. आंबेडकर या नावामुळे दलित समाजावर असलेली पकड आणि सोबतीला अठरापगड जातींची बांधलेली मोट, यामुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा, अशा प्रत्येक राजकीय पटलावर यश लाभले. गेल्या काही वर्षात मात्र अ‍ॅड. आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला थोडी घरघर लागली. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभेच्या अकोला मतदारसंघात पराभूत झाले. अकोला जिल्हा परिषद अजूनही त्यांच्या ताब्यात असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात यश लाभले. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पाशर््वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.कोरेगाव-भीमा प्रकरण ही अ‍ॅड. आंबेडकरांच्या नव्या डावाची नांदी होती. परंपरागत मतपेढी मजबूत करतानाच, ओबीसी समाज दुरावणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. विकासाच्या मुद्यावर भाजपाला आलेले अपयश, दलितांवरील वाढते हल्ले व अत्याचार, ओबीसींना मिळालेल्या २७ टक्के आरक्षणाचे खरे स्वरूप, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ५४० कोटींवरून केवळ ५८ कोटींवर आणण्याचा प्रकार, वाढता धार्मिक उन्माद, रा. स्व. संघाचा छुपा ‘अजेंडा’ अशा मुद्यांचा दारूगोळा घेऊन, अ‍ॅड. आंबेडकरांनी रणशिंग फुंकले आहे.दुसरीकडे भाजपाच्या विरोधात असलेल्या गैर राजकीय मंचांवरही त्यांचा वावर वाढला आहे. हे सारे प्रयोग करताना, गत काही निवडणुकांमध्ये ओबीसी समाज आपल्यापासून का दूर गेला, यासंदर्भात आत्ममंथन करणेही गरजेचे आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी मोठे केलेले नेते स्वप्रतिमा आणि स्वहितात अतिव्यस्त झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमधला संवाद तुटला आहे. परिणामी अ‍ॅड. आंबेडकर आले की गोळा होणारा गोतावळा त्यांनी अकोला सोडताच पुन्हा विखरतो.एकीकडे काँग्रेस अ‍ॅड. आंबेडकरांना जवळ करण्यासाठी उत्सुक आहे, तर दुसरीकडे ते स्वत: तिसरा पर्याय उभा करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी ओबीसींचा जागर करताना ते दुरावणार नाहीत याची काळजी घेतल्यास, ‘अकोला पॅटर्न’चा सुर्वणकाळ परतू शकतो. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र