शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रगती’ चांगलीच, ‘पुस्तक’ जपायला हवे!

By किरण अग्रवाल | Updated: January 6, 2018 00:40 IST

वेगळ्या प्रयत्नांनी साधलेली उद्दिष्टपूर्ती कौतुकास्पदच असली तरी, कागदावरील आकडे व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात मेळ बसणेही गरजेचे आहे.

शासकीय चाकोरीत गुंतून काम करायचे तर त्यात मर्यादा येतातच; पण त्यापलीकडे जाऊन व आधुनिक मार्गाचा अवलंब करीत मार्गक्रमण केले गेले तर समस्यांचे निराकरण घडून येतेच, शिवाय त्यासाठीचे प्रयत्न दखलपात्र ठरून इतरांसाठीही ते अनुकरणीय ठरून जातात. नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने त्याचाच प्रत्यय आणून दिला आहे.प्रशासकीय यंत्रणा व त्यात काम करणाºयांची मानसिकता हा तसा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे, परंतु नेतृत्व ‘जाणते’ असले आणि समस्येवर मात करायची प्रामाणिक तयारी असली तर प्रयत्नांचे मार्ग प्रशस्त झाल्याखेरीज राहात नाहीत. कायाकल्प योजनेत व वृक्ष लागवड मोहिमेत राज्यात नाशिकला मिळालेले प्रथम स्थान, स्वच्छ भारत अभियान, मागेल त्याला शेततळे व आॅनलाईन दाखले वितरण या तीनही बाबतीतले दुसरे स्थान पाहता नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे प्रयत्नही याच मालिकेत मोडणारे ठरावेत. सरलेल्या २०१७ मधील योजनांचा आढावा घेता व नववर्षातील संकल्पाकडे नजर टाकता जिल्हा प्रशासनाची वाटचाल ही ‘प्रगती’ दर्शविणारीच दिसून येते.विशेषत: जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र लक्षात घेता गर्भवती मातांच्या मृत्यूचे प्रमाण आजवर चिंताजनक राहिले आहे. यावर उपाय म्हणून महिलांचे आजार, त्याबाबत वेळोवेळी घ्यावयाची काळजी आदींची माहिती देणारे ‘मातृत्व अ‍ॅप’ जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून, सर्वाधिक माता मृत्यू होणा-या त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्याची प्रायोगिक चाचणी घेतली असता सदर प्रमाण शून्यावर आल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात या अ‍ॅपची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अ‍ॅपची उपयोगिता जाणून घेण्यात नीती आयोग व आसाम सरकारनेही स्वारस्य दाखविल्याची बाब यासंदर्भातील प्रयत्नांना दाद देणारीच आहे. जिल्ह्यात सरलेल्या वर्षात १०४ शेतक-यांच्या आत्महत्या घडून आल्या. या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी दहावीनंतरचे शिक्षण घेण्याचे टाळत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी मार्गदर्शन करणारी व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारी हेल्पलाईनही नवीन वर्षात सुरू केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात ई-प्रणालीचा वापरही वाढविला जाणार असून, यांसारख्या सर्व प्रयत्नांतून प्रशासनाची धडपड नक्कीच अधोरेखित होणारी आहे. पण, ही सारी प्रगती दिसून येत असताना प्रत्यक्ष पुस्तकातील नोंदीही दुर्लक्षिता येऊ नयेत. जलयुक्त शिवार योजनेतील चांगल्या कामासाठी ज्या चांदवडला पुरस्कार दिला गेला तेथेच गेल्यावेळी पहिला टँकर सुरू करण्याची वेळ आली. स्वच्छ भारत योजनेत बांधल्या गेलेल्या अनेक शौचालयांचा वापर अडगळीची खोली म्हणून होतो आहे. शिवाय त्याचे अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. वृक्षारोपणाचेही लाखांचे आकडे आहेत, ते प्रत्यक्षात साकारले असते तर जिल्ह्यात पाय ठेवायला जागा उरली नसती. असे अन्यही अनेक मुद्दे असले तरी सारेच काही कटकटीचे नाही. प्रशासन प्रबळ इच्छाशक्तीने कामाला  

टॅग्स :Nashikनाशिकnewsबातम्या