शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सत्ता, शनि आणि साडेसाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:09 AM

हल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं!

डायरी: नोंद क्रमांक १७६०स्थळ: वर्षा, वेळ: अपरात्रहल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं! आजकाल गडकरी मुंबईत आले की, अशीच दमछाक होते. सकाळी महामार्ग तर दुपारी जलवाहतूक, सायंकाळी जलसंधारण तर रात्री सेमिनार! दमायला होतं नुसतं. बरं हे सगळं फुकटात असतं तर एकवेळ समजू शकलो असतो. पण प्रत्येक कोनशिला लाखभर कोटींची. कुठून आणायचे एवढे पैसे? गडकरींचं बरं आहे. त्यांची वाणी म्हणजे साक्षात कुबेराची टांकसाळ! उचलली जीभ की पाडली नाणी. आपलं काय? तिजोरीच्या नावावर भिक्षुकाची झोळी! तीही फाटकी. एकीकडे ठिगळ लावले की दुसरीकडे फाटते. अकबराचा रांजण जसा शेवटी रिकामाच राहातो. तशी आपली गत. उघडपणे बोलायची सोय नाही, म्हणून डायरीत लिहून ठेवतो. जीएसटीमुळं अक्षरश: कंगाल झालोय. कर्मचाºयांच्या पगाराला देखील पैसे पुरेनात. आशाळभूतपणे केंद्राकडे डोळे लावून बसतो. ते देतील तो तुकडा गोड मानून घेतो. छे! सीएम होण्याऐवजी महापौर झालो असतो तर बरं झालं असतं. असो. निवडणुकीत भलतीसलती आश्वासनं देऊन बसलो. आता ती पुरी करता-करता नाकीनऊ आलेत. तरी गडकरी सांगत होते, टोल बंद करू नका. टोलचा पैसा वर खर्चाला कामी येतो. पण आपणंच त्यांचं ऐकलं नाही. आश्वासनपूर्तीचा उत्साह नडला, दुसरं काय? बरं काहीतरी नवं करून दाखवावं म्हणून ‘समृद्धी’चा घाट घातला, पण तिथेही सतराशेसाठ विघ्न! कसातरी तो मार्ग रेटून नेत असताना मध्येच शेतकºयांचा संप आडवा आला...सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात. पण माझ्यासाठी तर सतरावंही धोकादायक गेलं! किती संकटं आली? कोपर्डीची घटना, मराठा समाजाचे महामोर्चे, डॉक्टरांचा संप, मुंबई विद्यापीठातील सावळा गोंधळ, कर्जमाफीतील आॅनलाईन घोळ...एकामागून एक संकटांची डेलीसोप मालिकाच सुरू होती. दैव बलवत्तर म्हणून निभावलं. समजा, गुजरातेत दगाफटका झाला असता तर सगळं खापर मुंबईवर फोडलं गेलं असतं!गुजरातवरून आठवलं. आपल्याकडेही कमी दिवस उरलेत. उणेपुरे एकवीस महिने! परवा नाथाभाऊ म्हणाले, दिवस बदलायला वेळ लागत नाही. तर गिरीशभाऊ म्हणे, पुढचं काही खरं नाही! आपलीच माणसं अशी का घाबरवून सोडतात? तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण शनिशिंगणापूरला जाऊन आलो आणि संकल्पही केला. ‘हे शनिदेवा, मावळत्या वर्षात खूप संकटं झेलली. आता तरी इडापीडा टळू दे. नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जाऊ दे. नव्या वर्षात अरबी समुद्रातील छत्रपतीं शिवरायाचं आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकारचं काम मार्गी लागलं की सफोला कंपनीच्या तेलानं (महाग असलं तरी) तुम्हाला अभिषेक घालिन!’शनिशिंगणापूरला जाऊन आल्यापासून निर्धास्त होतो. झोपही चांगली लागली. पण नव्या वर्षाची पहाट कोरेगाव-भीमा घेऊन उजाडली. आई म्हणते तेच खरं. सत्ता हीच खरी साडेसाती असते. विरोधात बसून कुणाचाही ‘शनि’ वक्री करता येतो!इति.- नंदकिशोर पाटील