शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

सत्ता डोक्यात जाणे

By admin | Published: March 02, 2016 2:48 AM

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन त्यांच्यावर हल्ले करणे हे जर सत्ता डोक्यात जाण्याचे लक्षण असेल तर मग आज केन्द्रात जे काही सुरु आहे ते पाहाता केन्द्र सरकारच्या तर सत्ता डोक्याच्याही वरतून वाहू लागली आहे असेच म्हणावे लागेल. पण पवार तसे म्हणत नाहीत. पण म्हणून ते जे काही बोलले त्याचे गांभीर्य कमी होत नाही. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे बोल हे अनेकांगांनी अनुभवाचे बोल आहेत! सत्ता येते आणि जाते पण जेव्हा ती येते तेव्हा सत्ताधीशांनी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे असतात असा योग्य सल्ला त्यांनी युतीला दिला आहे. हाच सल्ला त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, लक्ष्मणराव ढोबळे आदि प्रभ्रृतीना दिला होता वा नाही हे कळायला मार्ग नाही. बहुधा दिलाच असणार पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ सारखा काही प्रकार झाला असावा. त्यामुळे असेही म्हणता येईल की आज पवारांनी युतीच्या लोकांचे नाव घेतले असले तरी त्यामागील अंतस्थ हेतू ‘लेकी बोले’ असाही असू शकेल. युतीच्या याआधीच्या सत्तेला राज्यातील जनता वैतागली होती आणि म्हणूनच तिने आघाडीला अनिच्छेने का होईना वरले होते. पवार आज युतीच्या लोकाना जो सल्ला देत आहेत तो त्यांनी आघाडीला दिला असता आणि चुकून दिला असल्यास आघाडीकरांनी तो मनावर घेतला असता तर कदाचित आज त्यांच्यावर युतीला असे उपदेशामृत पाजण्याची वेळच आली नसती. आपण दोषींना पाठीशी घालणार नाही असा वज्रनिर्धारही पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखविला आहे. आघाडी सरकारमधील त्यांचे एक मंत्री भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरातील मंगल कार्यात कोकणामध्ये केलेली उधळपट्टी पाहून पवारांच्या डोळ्यात म्हणे अश्रू उभे राहिले होते व त्यावर जाधवांनी म्हणे क्षमापना केली होती. त्याला फार दिवस झाले नाहीत. पण पवारांच्या डोळ्यातील अश्रू आणि आपणच मागितलेली क्षमा गुंडाळून ठेऊन याच भास्कररावांनी तोच प्रयोग नाशकात अगदी अलीकडे केला. राज्यातील दुष्काळ पाहून बहुधा त्यांनी अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तर हा प्रयोग लावला नव्हता? असेल तसेही असेल. कारण कशालाही तात्विक मुलामा देण्यात राष्ट्रवादींचा हात कोण धरु शकतो?