शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

...लातूरप्रमाणेच सोलापूरलाही द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

२०१६ साली तंत्र व शिक्षण विभागाने सोलापूरचे शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात खलिता जारी केला होता.

लातूरला तंत्रनिकेतनसोबतच अभियांत्रिकी महाविद्यालय देताय. मग आम्हालाही त्याच न्यायाने द्या ! सोलापूरकरांच्या या भावनेने चांगलीच उचल खाल्ली असून, ‘विनोदभाऊ, सोलापूरवरचा रुसवा सोडा...’ असा सूर उमटत आहे.तंत्रनिकेतनसह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या चळवळीतील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काहीबाही लिहिलेले मेसेज धाडले. त्यावरूनच विनोदभाऊ सोलापूरवर रुसले! २०१६ साली तंत्र व शिक्षण विभागाने सोलापूरचे शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात खलिता जारी केला होता. त्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी ‘ तंत्रनिकेतन बचाव’ मोहीम हाती घेतली.खरे तर, १९५६ पासून ‘जीपीएस’ या नावाने सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवाचा एक अविभाज्य भाग बनलेली संस्था बंद होणार म्हटल्यावर ती वाचविण्याचा प्रयत्न होणे साहजिकच होते. तंत्र व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सर्वांचा पाठपुरावा सुरू झाला. त्याच पाठपुराव्याचा एक भाग म्हणून मंत्र्यांना मेसेज पाठविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात काही अभिरुचीहीन व शिष्टाचाराला न शोभणाऱ्या भाषेतील मेसेजचाही समावेश होता. तिथेच बिनसले! संघ संस्कारांच्या मुशीतून उदयास आलेले विनोदभाऊ त्यामुळे विचलित झाले.त्यावेळी विनोदभाऊ सोलापूरकरांवर रुसल्याची सर्वांचीच धारणा झाली. आता त्या रुसव्याची आठवण व्हायलाही कारण घडले आहे. विनोदभाऊंनी सोलापूरवरील रुसवा सोडावा, अशी तमाम सोलापूरकरांची इच्छा आहे. लातूरच्या संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मागणीवरून लातूरचे तंत्रनिकेतन बंद करू नये तसेच नवे अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करावे, अशा आशयाचे आदेश खुद्द विनोदभाऊंनी प्रधान सचिवांना दिले आहेत. त्याच आदेशाचा धागा पकडून लातूरप्रमाणेच सोलापूरचेही तंत्रनिकेतन कायमस्वरूपी सुरू ठेवून नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही सोलापूर जिल्ह्याला द्यावे, अशी मागणी सोलापूर तंत्रनिकेतन बचाव कृती समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष विष्णू राठी, उपाध्यक्ष अंकुश आसबे, समन्वयक मनोजकुमार गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, दत्ता मुळे, चेतन चौधरी, मिलिंद भोसले, प्रा. अशोक काजळे, गणेश डोंगरे, दत्ता चव्हाण, समद हुसेन शेख, गजानन जमदाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचीही तशीच मागणी आहे. ४३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याच्या मागणीची दखल घेणे ही काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर देशात टेक्स्टाईल आणि गारमेंट हब म्हणून पुढे येत असलेल्या या जिल्ह्यात यंत्रमाग व विडी कामगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता कौशल्य विकास उपक्रमात आहे. गणवेश निर्मिती, साखर उद्योग यांसह जिल्ह्याच्या सर्व चांगल्या बाबींचे मार्केटिंग करण्याची मोहीम राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतलेली आहे. त्याला पूरक अशीच भूमिका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही दिसते. त्याच कारणाने आता ‘विनोदभाऊ, रुसवा सोडा आणि सोलापूरकरांना तंत्रनिकेतनसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय द्या’ असेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यक्ती म्हणू लागल्या आहेत !- राजा माने​​​​​​​raja.mane@lokmat.com 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेeducationशैक्षणिक