शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण बदलेल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:30 IST

मार्चच्या आरंभी याला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीच्या १६ आणि व वायएसआर रेड्डींच्या ९ खासदारांनी मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला.

मार्चच्या आरंभी याला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीच्या १६ आणि व वायएसआर रेड्डींच्या ९ खासदारांनी मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला. असा प्रस्ताव मांडायला किमान ५४ सभासदांची गरज असल्याने सभापती सुमित्रा महाजन यांनी तो स्वीकारायला नकार दिला. काही दिवसांनी लगेच तेलंगण राष्टÑ समितीने मोदींच्या रालोआशी संबंध तोडत असल्याचे जाहीर करून त्या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. याच सुमारास काँग्रेसच्या पूर्वाध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशातील सर्व रालोआविरोधी पक्षांची बैठक बोलावून तीत भाजपला संयुक्त विरोध करण्याची भूमिका मांडली. त्याचवेळी शरद पवारांनीही तशीच बैठक बोलावून सोनिया गांधींच्या प्रस्तावाशी त्यांची सहमती जाहीर केली. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे सरकार ३१ टक्के मते मिळवून सत्तारूढ झाले. त्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या विखुरलेल्या मतांची टक्केवारी ६९ एवढी म्हणजे दोनतृतीयांशांहून अधिक होती. आता हे पक्ष एकत्र येऊ शकले तर देशाच्या राजकारणाचे चित्र बदलेल हे उघड आहे. अशा शक्यतेत भर घालणाऱ्या घटनांमध्ये रालोआमध्येच राहिलेल्या तेलगू देसमची नाराजी, अकाली दलाचे तणाव आणि काश्मीरच्या मेहबुबा मुफ्तींनी लावलेल्या वेगळ्या सुराची भर पडली आहे. भाजपने गोवा, मेघालय, नागालँड आणि मिझोरमच्या विधानसभांमध्ये आमदारांची ठोक खरेदी करून बहुमत मिळविले असले तरी ते जनमताचे निदर्शक नाही. त्या मताचे खरे निदर्शन उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूरच्या लोकसभा क्षेत्रात झाले. समाजवादी व बसपा या दोनच पक्षांनी एकत्र येऊन त्या क्षेत्रात भाजपाचा अनुक्रमे सव्वा व अडीच लाख मतांनी पराभव केला. या दोन्ही क्षेत्रातून भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातवेळा तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे अनेकवेळा निवडून आले आहेत. केवळ दोन विरोधी पक्ष एकत्र आल्याने उत्तर प्रदेशात भाजपाला धूळ चाखावी लागली असेल तर सगळे विरोधक एकत्र आले तर निर्माण होणारे चित्र कसे असेल याची आपण कल्पना करू शकतो. आश्चर्य याचे की २०१४ मध्ये त्या दोन क्षेत्रात सपा व बसपा यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या बेरजेहून आताचे त्यांचे मताधिक्य ५० हजारांनी मोठे आहे. हा जास्तीचा मतदार भाजपावरील नाराजीमुळे नव्याने विरोधकांकडे वळला असल्याचे सांगणारे हे चित्र आहे. मोदींचे जोरकसपण आणि शहांची मुजोरी या गोष्टी यामुळे कमी झाल्या नसल्या तरी त्यांनाही या घटनाक्रमाने विचार करायला व धास्तावायला भाग पाडलेच असणार. ‘आम्हाला काँग्रेसमुक्त भारत नको’ ही भागवतांची मोहनवाणीही त्यातूनच आली असणार. यापुढचा खरा प्रश्न विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा व त्यांच्यात जागांचे वाटप सुरळीतपणे करण्याचा आहे. त्यासाठी शरद पवारांनी सुचविलेला तोडगा त्या साºयांना मान्य व्हावा असा आहे. ज्या क्षेत्रात ज्या पक्षाची मते जास्त तेथे त्या पक्षाचा उमेदवार उभा करावा व इतर साºयांनी त्याला पाठिंबा द्यावा हे त्यांचे सूत्र आहे. पवारांचा राजकारणातील अनुभव व त्यातील त्यांची हातोटी सर्वज्ञात आहे. त्यांचा हा तोडगा इतरांनाही मान्य होण्याजोगा आहे. अशावेळी नेमकी अडचण येते ती पुढाºयांच्या अहंतांची. आम्हाला पूर्वीहून अधिक जागा मिळाव्या यासाठी त्यांच्यातला प्रत्येकजण आपला दावा पुढे करतो. पराभवात संयम राखण्याचे भान मग त्यांना उरत नाही. त्याखेरीज आपली एक महत्त्वाची अडचण वा वस्तुस्थितीही येथे महत्त्वाची ठरावी अशी आहे. या विरोधी पक्षांत काँग्रेसचा अपवाद वगळला तर बाकीचे सारे प्रादेशिक व राज्यस्तरावरील पक्ष आहेत, हे वास्तवही साºयांना मान्य व्हावे असे आहे. नावाने राष्टÑीय असणारे पण एका प्रदेशापलीकडे नसणारे पक्षही अनेकदा साºया देशावर हक्क सांगताना दिसतात. तेव्हा तो प्रकारच एखाद्या अनधिकार चेष्टेसारखा होतो. पवारांचा तोडगा स्वीकारताना हे वास्तव ओळखण्याचे व आपल्या सामर्थ्याएवढ्याच मर्यादाही समजून घेण्याचे डोळसपण साºयांनी दाखविणे गरजेचे आहे. तसे झाल्यास देशाच्या राजकारणाचे चित्र खरोखरीच पालटू शकणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण