शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

राजकारण बदलेल, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:30 IST

मार्चच्या आरंभी याला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीच्या १६ आणि व वायएसआर रेड्डींच्या ९ खासदारांनी मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला.

मार्चच्या आरंभी याला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीच्या १६ आणि व वायएसआर रेड्डींच्या ९ खासदारांनी मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला. असा प्रस्ताव मांडायला किमान ५४ सभासदांची गरज असल्याने सभापती सुमित्रा महाजन यांनी तो स्वीकारायला नकार दिला. काही दिवसांनी लगेच तेलंगण राष्टÑ समितीने मोदींच्या रालोआशी संबंध तोडत असल्याचे जाहीर करून त्या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. याच सुमारास काँग्रेसच्या पूर्वाध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशातील सर्व रालोआविरोधी पक्षांची बैठक बोलावून तीत भाजपला संयुक्त विरोध करण्याची भूमिका मांडली. त्याचवेळी शरद पवारांनीही तशीच बैठक बोलावून सोनिया गांधींच्या प्रस्तावाशी त्यांची सहमती जाहीर केली. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे सरकार ३१ टक्के मते मिळवून सत्तारूढ झाले. त्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या विखुरलेल्या मतांची टक्केवारी ६९ एवढी म्हणजे दोनतृतीयांशांहून अधिक होती. आता हे पक्ष एकत्र येऊ शकले तर देशाच्या राजकारणाचे चित्र बदलेल हे उघड आहे. अशा शक्यतेत भर घालणाऱ्या घटनांमध्ये रालोआमध्येच राहिलेल्या तेलगू देसमची नाराजी, अकाली दलाचे तणाव आणि काश्मीरच्या मेहबुबा मुफ्तींनी लावलेल्या वेगळ्या सुराची भर पडली आहे. भाजपने गोवा, मेघालय, नागालँड आणि मिझोरमच्या विधानसभांमध्ये आमदारांची ठोक खरेदी करून बहुमत मिळविले असले तरी ते जनमताचे निदर्शक नाही. त्या मताचे खरे निदर्शन उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूरच्या लोकसभा क्षेत्रात झाले. समाजवादी व बसपा या दोनच पक्षांनी एकत्र येऊन त्या क्षेत्रात भाजपाचा अनुक्रमे सव्वा व अडीच लाख मतांनी पराभव केला. या दोन्ही क्षेत्रातून भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सातवेळा तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे अनेकवेळा निवडून आले आहेत. केवळ दोन विरोधी पक्ष एकत्र आल्याने उत्तर प्रदेशात भाजपाला धूळ चाखावी लागली असेल तर सगळे विरोधक एकत्र आले तर निर्माण होणारे चित्र कसे असेल याची आपण कल्पना करू शकतो. आश्चर्य याचे की २०१४ मध्ये त्या दोन क्षेत्रात सपा व बसपा यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या बेरजेहून आताचे त्यांचे मताधिक्य ५० हजारांनी मोठे आहे. हा जास्तीचा मतदार भाजपावरील नाराजीमुळे नव्याने विरोधकांकडे वळला असल्याचे सांगणारे हे चित्र आहे. मोदींचे जोरकसपण आणि शहांची मुजोरी या गोष्टी यामुळे कमी झाल्या नसल्या तरी त्यांनाही या घटनाक्रमाने विचार करायला व धास्तावायला भाग पाडलेच असणार. ‘आम्हाला काँग्रेसमुक्त भारत नको’ ही भागवतांची मोहनवाणीही त्यातूनच आली असणार. यापुढचा खरा प्रश्न विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा व त्यांच्यात जागांचे वाटप सुरळीतपणे करण्याचा आहे. त्यासाठी शरद पवारांनी सुचविलेला तोडगा त्या साºयांना मान्य व्हावा असा आहे. ज्या क्षेत्रात ज्या पक्षाची मते जास्त तेथे त्या पक्षाचा उमेदवार उभा करावा व इतर साºयांनी त्याला पाठिंबा द्यावा हे त्यांचे सूत्र आहे. पवारांचा राजकारणातील अनुभव व त्यातील त्यांची हातोटी सर्वज्ञात आहे. त्यांचा हा तोडगा इतरांनाही मान्य होण्याजोगा आहे. अशावेळी नेमकी अडचण येते ती पुढाºयांच्या अहंतांची. आम्हाला पूर्वीहून अधिक जागा मिळाव्या यासाठी त्यांच्यातला प्रत्येकजण आपला दावा पुढे करतो. पराभवात संयम राखण्याचे भान मग त्यांना उरत नाही. त्याखेरीज आपली एक महत्त्वाची अडचण वा वस्तुस्थितीही येथे महत्त्वाची ठरावी अशी आहे. या विरोधी पक्षांत काँग्रेसचा अपवाद वगळला तर बाकीचे सारे प्रादेशिक व राज्यस्तरावरील पक्ष आहेत, हे वास्तवही साºयांना मान्य व्हावे असे आहे. नावाने राष्टÑीय असणारे पण एका प्रदेशापलीकडे नसणारे पक्षही अनेकदा साºया देशावर हक्क सांगताना दिसतात. तेव्हा तो प्रकारच एखाद्या अनधिकार चेष्टेसारखा होतो. पवारांचा तोडगा स्वीकारताना हे वास्तव ओळखण्याचे व आपल्या सामर्थ्याएवढ्याच मर्यादाही समजून घेण्याचे डोळसपण साºयांनी दाखविणे गरजेचे आहे. तसे झाल्यास देशाच्या राजकारणाचे चित्र खरोखरीच पालटू शकणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण