शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचे उलटलेले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:05 IST

लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा व त्याला अल्पसंख्यक म्हणून मान्यता देण्याचा कर्नाटकातील सिद्धरामैय्या सरकारने घेतलेला निर्णय देशात वाढीला लागलेल्या धार्मिक पर्यावरणात नवी भर घालणारा आहे

लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा व त्याला अल्पसंख्यक म्हणून मान्यता देण्याचा कर्नाटकातील सिद्धरामैय्या सरकारने घेतलेला निर्णय देशात वाढीला लागलेल्या धार्मिक पर्यावरणात नवी भर घालणारा आहे आणि त्याचवेळी ‘धर्माचे राजकारण केवळ तुम्हालाच नव्हे तर आम्हालाही करता येते’ हे मोदींसह भाजपला ऐकविणारा आहे. कर्नाटकात लिंगायत समाजाची मते १७ टक्क्याहून अधिक आहेत आणि त्या राज्यातील किमान १०० विधानसभा क्षेत्रात त्याचे प्राबल्य आहे. बी.एस. येदियुरप्पा या लिंगायत समाजाच्या पुढाऱ्याच्या मागे असलेला हा समाज बºयाच अंशी भाजपसोबत राहिला आहे. येदियुरप्पा हे भाजपाचे कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही आहेत. त्यांची अडचण समाजाविरुद्ध जाता न येणे आणि लिंगायत हे हिंदूच आहेत असे म्हणणाºया भाजपची साथ सोडता न येणे ही आहे. येत्या काही दिवसात कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता मोठी आहे. कर्नाटक सरकारने आपला निर्णय केंद्राकडे मान्यतेसाठी टाकलेला आहे आणि तो त्या मान्यतेची वाट पाहत असताना तिकडे भाजपने आपल्याला तो मान्य नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मोदी आणि केंद्र सरकार यांच्यासमोरही एक मोठा पेच उभा झाला आहे. कर्नाटकातील लिंगायतांना नाराज करून त्यांची मते गमावायची की आपल्या पक्षाला दुखवून तो वर्ग सांभाळायचा हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. लिंगायत हा हिंदू समाजाचाच एक भाग असल्याची भूमिका घेतलेल्या भाजपने व संघ परिवाराने त्याला वेगळा धर्म म्हणून मान्यता द्यायला आरंभापासूनच विरोध केला आहे. हिंदू एकतेची घोषणा करणाºया या परिवाराला लिंगायतांचे वेगळे होणे तसेही अमान्यच होणारे आहे. बाराव्या शतकात झालेल्या महात्मा बसवेश्वराने जाती पंथ नाकारणारे व समाजात समतेची प्रस्थापना करणारे तत्त्वज्ञान मांडले. त्यासाठी त्या महापुरुषाने तेव्हाच्या हिंदू कर्मठांचा रोष स्वत:वर ओढवून घेतला. मात्र त्याचे मोठेपण व ज्ञानाधिकार एवढा तेजस्वी की त्याच्या अनुयायांचा वर्ग त्याला आणि त्याच्या शिकवणीला शिरोधार्ह मानत राहिला. कर्नाटक व महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात लिंगायत समाज आहे आणि त्याची संख्या लक्षणीय आहे. त्याचे सामाजिक व्यवहार हिंदूसारखेच असले तरी त्याची उपासना पद्धती वेगळी आहे. त्याला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा झाली. त्यासाठी न्या. एच.एम. नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक अध्ययन समितीही काही काळापूर्वी नेमली गेली. या समितीने लिंगायतांची उपासना पद्धती वेगळी असली तरी तो हिंदू समाजाचाच भाग असल्याचा निर्वाळा दिला. मात्र भावनांचे आणि श्रद्धांचे प्रश्न कायद्याने वा न्यायमूर्तींच्या निकालाने निकालात निघत नसतात. बरेचदा असे निर्णय व कायदे तशा मागण्यांची तीव्रताच अधिक वाढवीत असतात. शिवाय भावनांची तीव्रता आणि त्यातही जाती-धर्माबाबतच्या भावनांना येणारी धार राजकारणी माणसांना तात्काळ उपयोगातही आणता येते. कर्नाटकात आज जे घडत आहे तो याच घटनाक्रमाचा परिपाक आहे. मात्र त्यासाठी सिद्धरामैय्या यांनाच केवळ ‘ते धर्माचे राजकारण करीत आहेत’ म्हणून दोषी ठरविण्याचे कारण नाही. तशा राजकारणाचा आरंभ देशात प्रथम संघ व भाजप यांनी केला आहे. सबब हा कमालीच्या सावधपणे विचारात घ्यावयाचा प्रश्न आहे. सिद्धरामैय्यांची भूमिका केंद्राने मान्य केली तर त्यातून आणखीही अनेक प्रश्न व आव्हाने उभी होणार आहेत. आम्हालाही वेगळा धर्म म्हणून मान्यता द्या अशी मागणी अनेक वर्गांकडून आता होऊ लागली आहे. सिद्धरामैय्या यांनी उभे केलेले आव्हान त्याचमुळे अतिशय मोठे आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटक