शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

By सुधीर लंके | Updated: September 14, 2017 00:10 IST

दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे.

 दस-याच्या निमित्ताने भगवानगडाभोवतीचा राजकीय शिमगा यावर्षीही सुरू झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मेळावा गडावरच घेण्याचा इशारा देऊन या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मेळाव्याविषयी ओघानेच सालाबादप्रमाणे उत्सुकता निर्माण झाली आहे.दसºयाच्या निमित्ताने राज्याचे राजकीय लक्ष आपणाकडे वेधले जावे, अशी तजवीजच पंकजा यांचे समर्थक करू लागले आहेत की काय अशी शंका येते. हे इशारे बहुधा त्याचाच भाग आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणा-या भगवानगडावर संत भगवानबाबा यांची समाधी आहे. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे असल्याने हा समाज या गडाला आपले दैवत मानतो. अर्थात भगवानबाबा हे स्वत: कधीही जातीपुरते मर्यादित राहिले नाहीत. जातीपातीच्या बाहेर पडत त्यांनी व्यापक सामाजिक व आध्यात्मिक काम उभे केले. त्यामुळे इतरही समाजात त्यांचे मोठे भक्तगण आहेत. भगवानबाबांनीच या गडावर दसरा महोत्सवाची परंपरा सुरु केली. राज्यातील ऊसतोड कामगार व कष्टकरी समाज यानिमित्ताने गडावर जमतो. मात्र, या महोत्सवाला आता राजकीय स्वरूप देण्याची प्रथा पडू पाहत आहे.गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी दस-याला गडावर भाषण करण्याची परंपरा सुरू केली. या मेळाव्यांचा वापर त्यांनी नकळतपणे वंजारी व ओबीसी समाजाची एकजूट उभारण्यासाठी केला. आपण गडावर राजकीय भाषण करीत नाहीत, असे मुंडे म्हणायचे. पण, त्यांच्या भाषणांचा ‘अर्क’ हा राजकीयच असायचा. अर्थात उपेक्षित समाजाला व्यासपीठ मिळत असल्याने मुंडे यांच्या मेळाव्यांना कधी फारसा विरोध झाला नाही. मुंडे यांच्या हयातीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनीही मेळाव्यांना विरोध केला नव्हता. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ‘गोपीनाथगड’ नावाचा स्वतंत्र गड विकसित केल्यानंतर मात्र महंतांनी भगवानगडावर राजकीय भाषणांना बंदी केली. राजकीय भाषणे आता नवीन गडावरून व्हावीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंकजा यांच्या समर्थकांना ही बाब मान्य नाही. भगवानगडावर ते राजकीय हक्कच सांगत आहेत. गतवर्षी महंतांनी गडावर परवानगी नाकारल्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत त्यास उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी त्यावेळी यथेच्छ राजकीय भाषणे केली. जानकर यांच्या भाषणावरून तर वादळ उठले. या गडावरून राजकारण सुरू झाले आहे याची ती पावतीच होती.अस्मितांचा राजकीय वापर करण्याची जुनी परंपरा या देशात आहे. भाजपचा तर त्यात हातखंडा आहे. पंकजा यांचे समर्थक त्याच पावलाने निघाले आहेत. आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणा देणारी जी शक्तिस्थळे आहेत त्यांचा वापर नेमका कसा करायचा? याची एक आचारसंहिताच यानिमित्ताने ठरण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर व आळंदीला येणारी गर्दी ही जातीधर्माच्या व पक्षपार्ट्यांच्या पलीकडची आहे. अशीच गर्दी भगवानगडावर जमत असताना ही आपली ताकद आहे, असे भासविण्याचा नेत्यांचा प्रयत्न दिसतोय.नगर जिल्ह्यात वंजारी व ऊसतोड कामगार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या प्रश्नांसाठी एकही नेता जोरकसपणे बोलताना दिसत नाही. बबनराव ढाकणे, दगडू बडे या नेत्यांनंतर या समाजाला नगर जिल्ह्यातून आमदारकी मिळू शकलेली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर राजकीय पदेही अभावानेच मिळताना दिसतात. त्याबाबत नेते शल्य बाळगताना दिसत नाहीत. दसरा मेळाव्यावरून मात्र राजकारण पेटविले जाते. पंकजा यांनी स्वत: अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. विचाराअंती बोलू, असे त्या मुंबईत म्हणाल्या. भगवानगडाला वेठीला धरायचे की तो निरपेक्ष ठेवायचा? हे आता पंकजाच ठरवतील.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा