शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

By सुधीर लंके | Updated: September 14, 2017 00:10 IST

दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे.

 दस-याच्या निमित्ताने भगवानगडाभोवतीचा राजकीय शिमगा यावर्षीही सुरू झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मेळावा गडावरच घेण्याचा इशारा देऊन या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मेळाव्याविषयी ओघानेच सालाबादप्रमाणे उत्सुकता निर्माण झाली आहे.दसºयाच्या निमित्ताने राज्याचे राजकीय लक्ष आपणाकडे वेधले जावे, अशी तजवीजच पंकजा यांचे समर्थक करू लागले आहेत की काय अशी शंका येते. हे इशारे बहुधा त्याचाच भाग आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणा-या भगवानगडावर संत भगवानबाबा यांची समाधी आहे. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे असल्याने हा समाज या गडाला आपले दैवत मानतो. अर्थात भगवानबाबा हे स्वत: कधीही जातीपुरते मर्यादित राहिले नाहीत. जातीपातीच्या बाहेर पडत त्यांनी व्यापक सामाजिक व आध्यात्मिक काम उभे केले. त्यामुळे इतरही समाजात त्यांचे मोठे भक्तगण आहेत. भगवानबाबांनीच या गडावर दसरा महोत्सवाची परंपरा सुरु केली. राज्यातील ऊसतोड कामगार व कष्टकरी समाज यानिमित्ताने गडावर जमतो. मात्र, या महोत्सवाला आता राजकीय स्वरूप देण्याची प्रथा पडू पाहत आहे.गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी दस-याला गडावर भाषण करण्याची परंपरा सुरू केली. या मेळाव्यांचा वापर त्यांनी नकळतपणे वंजारी व ओबीसी समाजाची एकजूट उभारण्यासाठी केला. आपण गडावर राजकीय भाषण करीत नाहीत, असे मुंडे म्हणायचे. पण, त्यांच्या भाषणांचा ‘अर्क’ हा राजकीयच असायचा. अर्थात उपेक्षित समाजाला व्यासपीठ मिळत असल्याने मुंडे यांच्या मेळाव्यांना कधी फारसा विरोध झाला नाही. मुंडे यांच्या हयातीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनीही मेळाव्यांना विरोध केला नव्हता. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ‘गोपीनाथगड’ नावाचा स्वतंत्र गड विकसित केल्यानंतर मात्र महंतांनी भगवानगडावर राजकीय भाषणांना बंदी केली. राजकीय भाषणे आता नवीन गडावरून व्हावीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंकजा यांच्या समर्थकांना ही बाब मान्य नाही. भगवानगडावर ते राजकीय हक्कच सांगत आहेत. गतवर्षी महंतांनी गडावर परवानगी नाकारल्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत त्यास उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी त्यावेळी यथेच्छ राजकीय भाषणे केली. जानकर यांच्या भाषणावरून तर वादळ उठले. या गडावरून राजकारण सुरू झाले आहे याची ती पावतीच होती.अस्मितांचा राजकीय वापर करण्याची जुनी परंपरा या देशात आहे. भाजपचा तर त्यात हातखंडा आहे. पंकजा यांचे समर्थक त्याच पावलाने निघाले आहेत. आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणा देणारी जी शक्तिस्थळे आहेत त्यांचा वापर नेमका कसा करायचा? याची एक आचारसंहिताच यानिमित्ताने ठरण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर व आळंदीला येणारी गर्दी ही जातीधर्माच्या व पक्षपार्ट्यांच्या पलीकडची आहे. अशीच गर्दी भगवानगडावर जमत असताना ही आपली ताकद आहे, असे भासविण्याचा नेत्यांचा प्रयत्न दिसतोय.नगर जिल्ह्यात वंजारी व ऊसतोड कामगार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या प्रश्नांसाठी एकही नेता जोरकसपणे बोलताना दिसत नाही. बबनराव ढाकणे, दगडू बडे या नेत्यांनंतर या समाजाला नगर जिल्ह्यातून आमदारकी मिळू शकलेली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर राजकीय पदेही अभावानेच मिळताना दिसतात. त्याबाबत नेते शल्य बाळगताना दिसत नाहीत. दसरा मेळाव्यावरून मात्र राजकारण पेटविले जाते. पंकजा यांनी स्वत: अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. विचाराअंती बोलू, असे त्या मुंबईत म्हणाल्या. भगवानगडाला वेठीला धरायचे की तो निरपेक्ष ठेवायचा? हे आता पंकजाच ठरवतील.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा