शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरपंचाला अपात्र ठरविण्यामागचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 21:26 IST

नेत्रावळी हा गोव्याच्या दक्षिण हद्दीवरील सुंदर, हिरवा गाव.

- राजू नायकनेत्रावळी हा गोव्याच्या दक्षिण हद्दीवरील सुंदर, हिरवा गाव. गोव्यातील एकमेव गाव जेथे दमट हवामान नाही, निसर्गाच्या कुशीत असल्याने तापमान कमी आहे आणि तेथे स्ट्रॉबेरी पिकविण्याचाही यशस्वी प्रयोग चालतो. हा गाव प्रकाशात येण्याचे कारण म्हणजे पंचायत संचालनालयाने तेथील सरपंच व उपसरपंचांना अपात्र घोषित केलेय. आरोप आहे त्यांनी प्रवेश कर लागू केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मते बाहेरचे पर्यटक गावात येतात व व्यवस्थेवर बोजा निर्माण करतात. त्या वेळी प्रवेश कर गोळा करून स्वच्छतेवर तो खर्च केला जाणार होता.हा प्रस्ताव योग्य असाच आहे. जगभर अशा प्रकारचे कर पर्यटकांकडून घेतले जातात. महाराष्ट्रातील शिरोडा किना-यावर जाण्यासाठी प्रवेश कर गोळा केला जातो. गोव्यात तसा कर कुठेही नाही. त्यामुळे किना-यांवरची सफाई हा पंचायतींसमोर मोठाच प्रश्न असून उच्च न्यायालयाने सतत तंबी देऊनही ते स्वच्छता राखू शकलेले नाहीत. त्यादृष्टीने नेत्रावळी गावाने योग्य पावले उचलली होती. मात्र, स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांच्या मते पंचायतीचा हेतू चांगला होता; परंतु त्यांनी योग्य पद्धतीचा अवलंब केला नाही. त्यांनी पंचायत संचालनालयाची रीतसर मान्यता घेतली नाही व भाजपा नेत्यांशी वितुष्ट निर्माण केले.सूत्रांच्या मते, एका स्थानिक व्यक्तीने भाजपा नेत्याला धक्काबुक्की केली होती. हा नेता एका उच्चपदस्थाचा नातेवाईक निघाला. त्यामुळे एका बाजूला व्यवस्थेला बगल देण्याचा प्रयत्न व दुस-या बाजूला सत्तेचा कोप. या कात्रीत पंचायतीतील नेते मंडळी सापडली. वास्तविक गावच्या सरपंच रजनी गावकर या भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्या. परंतु, सरकारची त्यांच्यावर वक्रदृष्टी झाली आणि पंचायत संचालनालयाने सरपंच व उपसरपंचांवर पुढची पाच वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी लागू केली आहे.नेत्रावळीसाठी ज्या वेगाने निर्णय झाला तसाच कडक निर्णय वेळ्ळी पंचायतीबाबत होईल काय, हा सध्या गोव्यात चर्चेचा विषय आहे. कारण, वेळ्ळी पंचायतीने मासळीच्या ट्रकांना पार्किंग कर लागू केला. दिवसाला या ट्रकांकडून त्यांना ३० हजार रुपये शुल्क प्राप्त होत असता या पंचायतीने एका कंत्राटदाराला महिन्याचे पार्किग कॉण्ट्रॅक्ट केवळ ६० हजार रुपयांना दिले. त्याबाबत पंचायत संचालनालय चौकशी करीत आहे. परंतु, जसा घाईने निर्णय नेत्रावळीबाबत झाला तसा वेग काही वेळ्ळीबाबत दिसत नाही.गावातील पर्यावरण व्यवस्थित राखून पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभिनव व कल्पक पर्याय शोधू पाहाणा-या ग्रामीण नेतृत्वाला हा जबर धक्का आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गैरव्यवहार आणि बेफिकिरी यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि सरकारी हस्तक्षेपामुळे स्थानिक स्वराज्य संस्था संपूर्णत: ढेपाळल्या आहेत.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा