शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

By नंदकिशोर पाटील | Updated: March 26, 2024 13:13 IST

दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या टप्प्यातील १९ एप्रिल रोजी होणाऱ्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना निघाली आहे. यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. शेजारील गुजरात अथवा राजस्थानमध्ये एका टप्प्यात आणि महाराष्ट्र, प.बंगालमध्ये निवडणुकीचे पाच टप्पे का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा देण्यामागे नेमके कारण काय, असे प्रश्न उपस्थित करायचे नसतात. निवडणूक आयोगाची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी अशा आसेतू हिमाचल अखंड भारतवर्षातील लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात सर्वच गोष्टी सर्वांच्या मर्जीने होणे नाहीत. विशेषांची विशेष काळजी घेतली की पुरे!

असो; जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकशाहीचा महोत्सव असे सार्थ वर्णन केले गेलेल्या या राजकीय कुंभमेळ्यासाठी आखाडे सजले असले तरी, जागावाटपातील मानापमान नाट्य अजून संपलेले नाही. किंबहुना त्यात रोज नव्या पात्रांची एन्ट्री होत असल्याने हे नाट्य उत्तरोत्तर अधिक रंगतदार होऊ लागले आहे; मात्र ठरलेल्या स्क्रीप्टप्रमाणे हे नाट्य पुढे सरकत नसल्याने सूत्रधार आणि निर्मात्यांची पुरती दमछाक होताना दिसते. बरे, ज्यांच्यासाठी हे नाटक सादर करावयाचे ती प्रेक्षकरूपी जनता पुरती गोंधळात पडली आहे. रोज नवे दावे-प्रतिदावे सुरू असल्याने पात्रांचाही गोंधळ उडालेला दिसतो. लोकशाहीच्या ‘वस्त्रहरणा’चा हा खेळ ‘रोख्या’च्या आकड्याने तर अधिक बीभत्स झाला आहे. ज्यांची कमाईच मुळात आठण्णी आहे, त्यांनी केलेली दौलतजादा सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीला मोठेच आव्हान आहे. कोणाच्या खात्यात किती आले, याचे हिशेब पाहिले तर आपल्या देशातील श्रीमंतीचा गर्व वाटू लागतो. १४० कोटी देशातील ८० कोटी गरिबांना आपण मोफत अन्नदान करतो ते उगीच नाही!

असो; तर विषय होता. जागावाटपाचा. काल-परवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते अथवा जे एकमेकांना पाण्यात पाहत होते; त्यांचीच सोयरीक झाल्याने देण्या-घेण्याची बोलणी लांबणारच. या नव्या राजकीय सग्यासोयऱ्यांतील गोतावळ्याची सोय लावता-लावता थोडी दमछाक होणार, हे आपण समजून घेतले पाहिजे. खरं म्हणजे, आपणांस अजून बरंच काही समजून घेण्यासारखं आहे. ‘काही झाले तरी मी अमुक-तमुकास आमच्या पक्षात कदापि घेणार नाही. तशी वेळ आलीच तर राजकीय संन्यास घेईन!’ हे ऐतिहासिक विधान कोणी, कोणासाठी, कधी आणि का केले होते, हे विचारत बसायचे नाही. किंवा ‘लाव रे तो व्हिडीओ’ नावाचा करमणूकप्रधान एकपात्री प्रयोग करणाऱ्यांनी अचानक आपल्या अंगावरील शाल का झटकली, असे देखील विचारायचे नाही. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘आदर्शा’चे ‘सिंचन’ गंगेला मिळून पवित्र होणार असेल तर आपली हरकत काय? नाहीतरी सर्व गटारी शेवटी गंगेलाच तर मिळतात... आपण आपल्या नाकातोंडात पाणी शिरू नये म्हणून नाक दाबून, डोळे बंद करून डुबकी मारायची!

असो; मुद्दा काय तर, जागावाटपाचे घोडे नेमके कुठे अडलेय! घोड्याच्या काही खोडी असतात. कितीही खाकरा केला तरी ऐनवेळी तो कसा उधळेल, याचा भरवसा नसतो. या तबेल्यात तर निरनिराळ्या जातींचे, वर्णाचे, सवयीचे घोडे. काही घोडेबाजारातून आणलेले, तर काही दुसऱ्या तबेल्यातून पळविलेले! या साऱ्यांची सोय कशी लावायची? मैदानात उतरण्यासाठी तर सारेच उतावीळ आहेत. बरे, समोरून कोणता काठेवाडी मैदानात उतरेल याचा अंदाज येत नसल्याने तालेवार देखील ताटकळलेत! शिवाय, तबेल्यातील धुसफूस, राजी-नाराजी कशी शमवायची, हा देखील मोठाच प्रश्न आहे की!

असो; तर मग आपण काय करायचे? हा प्रश्न आहेच. कारण. काल-परवापर्यंत आपण ज्यांचे पाठीराखे होतो, त्यांनीच आपणास पाठ दाखवल्याने आपली तर मोठीच पंचायत होऊन बसली आहे. आपल्यापुढे तसे अनेक पर्याय आहेत; पण त्यातल्या त्यात दोन सशक्त पर्याय आहेत. ते असे- एक म्हणजे, ते देतील तो गडी आपला मानून त्याची पाठराखण करायची. दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक