शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमचंच जमेना, तिथं आमचं काय?

By नंदकिशोर पाटील | Updated: March 26, 2024 13:13 IST

दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या टप्प्यातील १९ एप्रिल रोजी होणाऱ्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना निघाली आहे. यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. शेजारील गुजरात अथवा राजस्थानमध्ये एका टप्प्यात आणि महाराष्ट्र, प.बंगालमध्ये निवडणुकीचे पाच टप्पे का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा देण्यामागे नेमके कारण काय, असे प्रश्न उपस्थित करायचे नसतात. निवडणूक आयोगाची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी अशा आसेतू हिमाचल अखंड भारतवर्षातील लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात सर्वच गोष्टी सर्वांच्या मर्जीने होणे नाहीत. विशेषांची विशेष काळजी घेतली की पुरे!

असो; जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकशाहीचा महोत्सव असे सार्थ वर्णन केले गेलेल्या या राजकीय कुंभमेळ्यासाठी आखाडे सजले असले तरी, जागावाटपातील मानापमान नाट्य अजून संपलेले नाही. किंबहुना त्यात रोज नव्या पात्रांची एन्ट्री होत असल्याने हे नाट्य उत्तरोत्तर अधिक रंगतदार होऊ लागले आहे; मात्र ठरलेल्या स्क्रीप्टप्रमाणे हे नाट्य पुढे सरकत नसल्याने सूत्रधार आणि निर्मात्यांची पुरती दमछाक होताना दिसते. बरे, ज्यांच्यासाठी हे नाटक सादर करावयाचे ती प्रेक्षकरूपी जनता पुरती गोंधळात पडली आहे. रोज नवे दावे-प्रतिदावे सुरू असल्याने पात्रांचाही गोंधळ उडालेला दिसतो. लोकशाहीच्या ‘वस्त्रहरणा’चा हा खेळ ‘रोख्या’च्या आकड्याने तर अधिक बीभत्स झाला आहे. ज्यांची कमाईच मुळात आठण्णी आहे, त्यांनी केलेली दौलतजादा सर्वसामान्यांच्या आकलनशक्तीला मोठेच आव्हान आहे. कोणाच्या खात्यात किती आले, याचे हिशेब पाहिले तर आपल्या देशातील श्रीमंतीचा गर्व वाटू लागतो. १४० कोटी देशातील ८० कोटी गरिबांना आपण मोफत अन्नदान करतो ते उगीच नाही!

असो; तर विषय होता. जागावाटपाचा. काल-परवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते अथवा जे एकमेकांना पाण्यात पाहत होते; त्यांचीच सोयरीक झाल्याने देण्या-घेण्याची बोलणी लांबणारच. या नव्या राजकीय सग्यासोयऱ्यांतील गोतावळ्याची सोय लावता-लावता थोडी दमछाक होणार, हे आपण समजून घेतले पाहिजे. खरं म्हणजे, आपणांस अजून बरंच काही समजून घेण्यासारखं आहे. ‘काही झाले तरी मी अमुक-तमुकास आमच्या पक्षात कदापि घेणार नाही. तशी वेळ आलीच तर राजकीय संन्यास घेईन!’ हे ऐतिहासिक विधान कोणी, कोणासाठी, कधी आणि का केले होते, हे विचारत बसायचे नाही. किंवा ‘लाव रे तो व्हिडीओ’ नावाचा करमणूकप्रधान एकपात्री प्रयोग करणाऱ्यांनी अचानक आपल्या अंगावरील शाल का झटकली, असे देखील विचारायचे नाही. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘आदर्शा’चे ‘सिंचन’ गंगेला मिळून पवित्र होणार असेल तर आपली हरकत काय? नाहीतरी सर्व गटारी शेवटी गंगेलाच तर मिळतात... आपण आपल्या नाकातोंडात पाणी शिरू नये म्हणून नाक दाबून, डोळे बंद करून डुबकी मारायची!

असो; मुद्दा काय तर, जागावाटपाचे घोडे नेमके कुठे अडलेय! घोड्याच्या काही खोडी असतात. कितीही खाकरा केला तरी ऐनवेळी तो कसा उधळेल, याचा भरवसा नसतो. या तबेल्यात तर निरनिराळ्या जातींचे, वर्णाचे, सवयीचे घोडे. काही घोडेबाजारातून आणलेले, तर काही दुसऱ्या तबेल्यातून पळविलेले! या साऱ्यांची सोय कशी लावायची? मैदानात उतरण्यासाठी तर सारेच उतावीळ आहेत. बरे, समोरून कोणता काठेवाडी मैदानात उतरेल याचा अंदाज येत नसल्याने तालेवार देखील ताटकळलेत! शिवाय, तबेल्यातील धुसफूस, राजी-नाराजी कशी शमवायची, हा देखील मोठाच प्रश्न आहे की!

असो; तर मग आपण काय करायचे? हा प्रश्न आहेच. कारण. काल-परवापर्यंत आपण ज्यांचे पाठीराखे होतो, त्यांनीच आपणास पाठ दाखवल्याने आपली तर मोठीच पंचायत होऊन बसली आहे. आपल्यापुढे तसे अनेक पर्याय आहेत; पण त्यातल्या त्यात दोन सशक्त पर्याय आहेत. ते असे- एक म्हणजे, ते देतील तो गडी आपला मानून त्याची पाठराखण करायची. दुसरा-ऐकावे जनाचे, करावे मनाचे! लोकशाहीत म्हणे, मतदार राजा असतो. तर मग आपणही जरा राजासारखं वागूया !

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक