शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

राजकीय अगतिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:51 IST

फडणवीस सरकारने जे निर्णय घेतले, ते वरकरणी सर्वसामान्यांच्या हिताचे भासत असले तरी त्याचे दूरगामी परिणाम राज्याला भोगावे लागतील. एकीकडे उद्योग धोरण जाहीर करायचे आणि नाणार रिफायनरी प्रकल्प वाऱ्यावर सोडून द्यायचा, हे कसे?

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ते एकाअर्थी बरेच झाले. गेल्या काही दिवसांपासून लोकानुनयासाठी लाभाचे निर्णय करण्याची जी लगीनघाई सुरू होती, त्याला आता चाप बसेल. सरकार निर्णयक्षम असायला हवे, यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जे काही चालले होते, ते आक्षेपार्ह आणि आदर्श आचारसंहितेत बसणारे मुळीच नव्हते. पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या सरकारांकडे धोरणात्मक निर्णय घेण्यास पुरेसा वेळ असतो. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट वर्गाला खूश करणारे निर्णय घेऊन मतांची बेगमी करण्याचा जणू प्रघातच पडला आहे. राज्यातील फडणवीस सरकारही त्यास अपवाद नाही.गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने दोन डझनांहून अधिक निर्णय घेतले आणि सातशे ते आठशे जीआर काढले. समाजातील सर्व घटकांना खूश करण्याच्या हेतूने घेतलेल्या निर्णयांपैकी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय झाला, त्याचा राजकीय लाभ भलेही सत्ताधारी पक्षाला होईल; मात्र त्याचे दूरगामी परिणाम या महानगरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेला दोन हजार कोेटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे जकातीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे पालिका प्रशासन उत्पन्नाचे नवे स्रोत शोधत असताना, केवळ राजकीय लाभापायी सरकारने दोन हजार कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडले.५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी आणि नाणार प्रकल्प नको, या प्रमुख दोन अटी शिवसेनेने भाजपापुढे ठेवल्या होत्या. या दोन्ही अटींची पूर्तता करून फडणवीस यांनी राजकीय शहाणपण दाखवले असले, तरी या निर्णयाची झळ भविष्यात राज्यालाच सोसावी लागणार आहे. मुंबईतील घरांच्या किमती बघता ५०० चौ. फुटांचे घर ही मध्यमवर्गीयांना नव्हे, तर उच्चवर्गीयांनाच परवडणारी बाब आहे. या वर्गासाठी करमाफीचा निर्णय घेऊन शहराच्या विकासासाठी लागणारे उत्पन्नच बुडवले गेले. मुंबई हे आता आंतरराष्ट्रीय महानगर म्हणून ओळखले जाते, मात्र दिवसेंदिवस या शहराची बकालावस्था होत चालली आहे. रोजगाराच्या निमित्ताने वाढणारे प्ररप्रांतीयांचे लोंढे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी या शहराला अक्षरश: वेढले आहे.नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा निर्णयही असाच राजकीय अगतिकतेपोटी घेतला गेला. एकीकडे राज्यात परकीय भांडवली गुंतवणूक व्हावी म्हणून, ‘मेक इन महाराष्टÑ’, ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ’ यासारखे उद्योगस्नेही मेळावे भरवायचे आणि दुसरीकडे आलेल्या गुंतवणुकीला लाथाडायचे. नाणार रिफायनरी प्रकल्पात सौदी अरेबियाची मोठी गुंतवणूक होऊ घातली आहे. तसा करार दोन्ही राष्ट्रांमध्ये झाला आहे. असे असताना केवळ स्थानिकांचा विरोध एवढ्या कारणास्तव हा प्रकल्पच तिथून हलविणे महाराष्ट्रासारख्या उद्यमी राज्याला शोभा देणारे नाही. पण इथेही पुन्हा तीच राजकीय अगतिकता आडवी आली. एन्रॉन प्रकल्पाचा अनुभव गाठीशी असताना त्यातून काही शिकण्याऐवजी आपण पुन्हा तीच चूक करून बसलो आहोत.फडणवीस सरकारने ज्या धोरणाचा डांगोरा पिटला त्या व्यवसाय सुलभतेतही (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) लागोपाठ दुसऱ्या वर्षी राज्य तळाला गेले आहे. गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणुकीबाबत सरकारने केलेले दावेही फसवे ठरले आहेत. आता पुन्हा नव्या उद्योग धोरणात दहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचा दावा केला गेला आहे. औद्योगिक क्षेत्रात सध्या मोठी घसरण सुरू आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात निर्मिती क्षेत्राचा विकास दर १० टक्के होता. मात्र २०१७-१८ मध्ये हाच दर ७.६ टक्क्यांपर्यंत घसरला. आघाडी सरकारने औद्योगिक वसाहतींमधील जमिनींवर बांधकामांना परवानगी दिली होती. फडणवीस सरकारनेही त्याचीच री ओढली आहे. २० हजार चौरस मीटरची जागा असली आणि सलग पाच वर्षे कारखाना बंद असल्यास या जागेपैकी ४० टक्के जमिनीवर बांधकामांना परवानगी दिली जाईल, अशी धोरणात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात घरबांधणी हाच एकमेव उद्योग असेल आणि त्यातून मूठभरांची घरे भरली जातील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूकnanar refinery projectनाणार प्रकल्प