शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उन्हाळ्यात कामी येईल ना मेट्रो..!

By अतुल कुलकर्णी | Updated: July 11, 2018 00:28 IST

दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला.

प्रिय देवेंद्रभाऊ,दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला. शिवाय विधानसभेच्या अध्यक्षांना न विचारता विधानभवन कुणाच्या परवानगीनं जलयुक्त केलं असंही विचारलं. त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटलं. एवढं होऊन टोप्या उडवणारा मिश्किल स्वभाव तसूभरही कमी झालेला नाही हे पाहून जरा गंमतही वाटली...टीका करायला काय जातंय. जे कामं करतात त्यांच्यावरच टीका होते असं त्यांचे जीवलग मित्र आर.आर. नेहमी सांगायचेच की... संत्रानगरी एक नंबरचे शहर होण्यासाठी आपण काय काय करतोय याची जाणीव त्यांना कशी होणार? आपल्या इथं एवढे विविध विभाग, एवढे अधिकारी, पण आपण याचं त्याला त्याचं याला कळू न देता सगळ्या विभागांना कामाला लावलंय. कोण, कुणासाठी, कुणाचं काम करतोय याचा थांगपत्ता अजून ठेकेदारांना लागलेला नाही तर यांना कुठून लागणार सांगा बरं...? त्यामुळे सगळ्या शहरात एकाचवेळी विकासाची दंगल सुरू झालीय. ही त्यांना पाहावत नाही. त्यांना वाटतं ही दंगल मुंबई विरुद्ध दिल्ली आहे. खरं खोटं आपलं आपल्याला माहिती. त्यांना काय करायचं यात पडून...?आमच्या संत्रानगरीनं दोन्ही ठिकाणी तुल्यबळ नेते दिले आहेत. एवढे भारी की यांची माणसं त्यांना विचारत नाहीत आणि त्यांची यांना...त्यामुळे विकास कामं कशी सुसाट सुटलीत ते टीकाकारांना नाही कळायचं. आमच्याकडं त्यांच्यासारखा पुतण्या पण नाही, त्यामुळं आम्हाला कुणाला विचारत पण बसावं लागत नाही. आलं मनात की सुरू करतो कामं आपण.आता आमच्याकडे काही नतद्रष्ट अधिकारी आहेत. ते उगाच काही रिपोर्ट देत राहतात. आता त्या अग्निशमन विभागाने आग विझवायचं काम सोडून आग लावण्याचं काम कशासाठी करावं बरं...? त्यांनी एक अहवाल दिला होता. काय तर म्हणे, आपल्या शहरात चालू असलेल्या कामांमध्ये कसलाही ताळमेळ नाही. कुणाचा कुणाला पायपोस नाही, त्यामुळे मोठा पाऊस आला तर आमच्या शहरातल्या किमान ७० वस्त्या पाण्याखाली जातील. असा अहवाल देतात का बरं...? बरं दिला तर दिला, आमच्या संत्रानगरीच्याच माणसांनी दिलाय ना. मग त्यांचा शब्द पण खरा नको का ठरवायला. उलट आम्ही त्यांचा शब्द ११० टक्के खरा ठरवला. ७० नाही तर थेट १०० वस्त्या पाण्याखाली जाऊ दिल्या या पावसात. पण त्यांना आपल्या चांगल्या कामाचं काही कौतुकच नाही. उगाच नावं ठेवत राहतात. जेव्हा का आमच्या शहरातून मेट्रो सुरू होईल ना साहेब, तेव्हा कळेल त्यांना काय मजा असते ती. आपल्याकडं उन्हाळा किती कडक राहतो, माहिती नाही त्यांना. अहो उन्हाळ्याच्या दिवसात आपले लोक सकाळी मेट्रोत बसतील. मस्त थंडगार एसीमध्ये, जाईना का कुठेही मग मेट्रो. उन्हापासून बचाव तर होईल ना भाऊऽऽ. आपल्याला फार दूरचा विचार करनं पडतं भाऊ. तुम्ही काही काळजी नका करू... चालू द्या जे चालूय ते. 

टॅग्स :Metroमेट्रोMaharashtraमहाराष्ट्र