शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कामी येईल ना मेट्रो..!

By अतुल कुलकर्णी | Updated: July 11, 2018 00:28 IST

दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला.

प्रिय देवेंद्रभाऊ,दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला. शिवाय विधानसभेच्या अध्यक्षांना न विचारता विधानभवन कुणाच्या परवानगीनं जलयुक्त केलं असंही विचारलं. त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटलं. एवढं होऊन टोप्या उडवणारा मिश्किल स्वभाव तसूभरही कमी झालेला नाही हे पाहून जरा गंमतही वाटली...टीका करायला काय जातंय. जे कामं करतात त्यांच्यावरच टीका होते असं त्यांचे जीवलग मित्र आर.आर. नेहमी सांगायचेच की... संत्रानगरी एक नंबरचे शहर होण्यासाठी आपण काय काय करतोय याची जाणीव त्यांना कशी होणार? आपल्या इथं एवढे विविध विभाग, एवढे अधिकारी, पण आपण याचं त्याला त्याचं याला कळू न देता सगळ्या विभागांना कामाला लावलंय. कोण, कुणासाठी, कुणाचं काम करतोय याचा थांगपत्ता अजून ठेकेदारांना लागलेला नाही तर यांना कुठून लागणार सांगा बरं...? त्यामुळे सगळ्या शहरात एकाचवेळी विकासाची दंगल सुरू झालीय. ही त्यांना पाहावत नाही. त्यांना वाटतं ही दंगल मुंबई विरुद्ध दिल्ली आहे. खरं खोटं आपलं आपल्याला माहिती. त्यांना काय करायचं यात पडून...?आमच्या संत्रानगरीनं दोन्ही ठिकाणी तुल्यबळ नेते दिले आहेत. एवढे भारी की यांची माणसं त्यांना विचारत नाहीत आणि त्यांची यांना...त्यामुळे विकास कामं कशी सुसाट सुटलीत ते टीकाकारांना नाही कळायचं. आमच्याकडं त्यांच्यासारखा पुतण्या पण नाही, त्यामुळं आम्हाला कुणाला विचारत पण बसावं लागत नाही. आलं मनात की सुरू करतो कामं आपण.आता आमच्याकडे काही नतद्रष्ट अधिकारी आहेत. ते उगाच काही रिपोर्ट देत राहतात. आता त्या अग्निशमन विभागाने आग विझवायचं काम सोडून आग लावण्याचं काम कशासाठी करावं बरं...? त्यांनी एक अहवाल दिला होता. काय तर म्हणे, आपल्या शहरात चालू असलेल्या कामांमध्ये कसलाही ताळमेळ नाही. कुणाचा कुणाला पायपोस नाही, त्यामुळे मोठा पाऊस आला तर आमच्या शहरातल्या किमान ७० वस्त्या पाण्याखाली जातील. असा अहवाल देतात का बरं...? बरं दिला तर दिला, आमच्या संत्रानगरीच्याच माणसांनी दिलाय ना. मग त्यांचा शब्द पण खरा नको का ठरवायला. उलट आम्ही त्यांचा शब्द ११० टक्के खरा ठरवला. ७० नाही तर थेट १०० वस्त्या पाण्याखाली जाऊ दिल्या या पावसात. पण त्यांना आपल्या चांगल्या कामाचं काही कौतुकच नाही. उगाच नावं ठेवत राहतात. जेव्हा का आमच्या शहरातून मेट्रो सुरू होईल ना साहेब, तेव्हा कळेल त्यांना काय मजा असते ती. आपल्याकडं उन्हाळा किती कडक राहतो, माहिती नाही त्यांना. अहो उन्हाळ्याच्या दिवसात आपले लोक सकाळी मेट्रोत बसतील. मस्त थंडगार एसीमध्ये, जाईना का कुठेही मग मेट्रो. उन्हापासून बचाव तर होईल ना भाऊऽऽ. आपल्याला फार दूरचा विचार करनं पडतं भाऊ. तुम्ही काही काळजी नका करू... चालू द्या जे चालूय ते. 

टॅग्स :Metroमेट्रोMaharashtraमहाराष्ट्र