शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नांदेडच्या दुर्घटनेत पोलिसांच्या संयमाने अनर्थ टळला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:54 IST

शेकडो महिला, लहान मुले उपस्थित असताना घडलेल्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखून ज्येष्ठ शीख बांधव आणि पोलिसांनी दाखविलेल्या संयमामुळेच मोठा अनर्थ टळला.

- धर्मराज हल्लाळेहोला महल्ला निमित्त नांदेडमध्ये आयोजित सोहळ्यात परवानगीची सीमा ओलांडून काही तरुणांनी पोलिसांवर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. परंतु, घटनेची दुसरी बाजू पोलिसांचा आणि शीख बांधवांचा संयम दाखविणारी आहे. कोरोनामुळे सबंध जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधूनमधून व्यापार, रोजगारावर येणारी बंधने आणि संचारावरील मर्यादेमुळे अशा कोणत्या तरी प्रसंगात  तरुणांचा उद्रेक होत आहे की काय, असा प्रश्न पडतो. नांदेडमध्ये होला महल्ला, दसरा महल्ला, दिवाळी महल्ला असे उत्सव शीख बांधव साजरा करतात. नगर कीर्तन, अरदास (प्रार्थना) झाल्यानंतर शहरातील महावीर स्तंभापासून दोनशे मीटरपर्यंत शीख बांधव शस्त्र घेऊन जातात. हे सर्व प्रतीकात्मक असते. सुमारे तीनशे वर्षांची ही उज्ज्वल परंपरा  आहे. त्यामध्ये सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. देश-विदेशातून भाविक येतात. निश्चितच कोरोनामुळे सर्वच सोहळ्यांवर मर्यादा आल्या. त्या परिस्थितीची समाजातील सुजाण नागरिकांना जाणीवही आहे. ते प्रशासनाच्या सोबत आहेत. त्यामुळेच होला महल्ला परिसराबाहेर होणार नाही, याबद्दल सहमती होती. घटनेदिवशी महिला, लहान मुले आणि परगावातील भाविक उपस्थित होते. त्याचवेळी पाच-पन्नास जणांनी सुरक्षा कडे भेदून पोलिसांची वाहने आणि पोलीस जवानांनाच लक्ष्य केले. मात्र जमेची आणि चांगली बाजू म्हणजे धार्मिक उत्सवात सहभागी झालेल्या बहुतांश बांधवांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य केले. किंबहुना कायदा हातात घेणाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले झाले. त्यांच्या वाहनांची नासधूस झाली. परंतु, लाठीचार्ज वा साधा अश्रुधुराचाही वापर पोलिसांनी केला नाही. बहुतांश समाज बांधवांचे सहकार्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संयमामुळे  काही मिनिटांतच सर्वकाही पूर्वपदावर आले. नांदेडमधील घटनेचे जे वाहिन्यांवर चित्रीकरण दिसले, ते काही मिनिटांचे होते. त्यात परिस्थिती आटोक्यात आणणारे हात दिसू शकले नाहीत. अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीत पोलिसांनी थोडाही संयम सोडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. एकीकडे थरकाप उडविणारा हल्ला दिसत असताना दुसरीकडे पोलीस आणि शांतताप्रिय शीख बांधव ज्या तऱ्हेने सर्व सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत होते, त्यामुळे उद्रेक वेगळ्या वळणाला गेला नाही. जे घडले त्याचा शीख धर्मगुरु पंचप्यारे साहेबांनी व गुरुद्वारा प्रशासनाने निषेधच केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका धर्मगुरुंनी आणि बांधवांनी घेतली आहे. याच सद्‌विचारांमुळे अपप्रवृत्तीवर यंत्रणेला अल्पावधीत नियंत्रण मिळविता आले. पुढे नगर कीर्तन शांततेत गेले आणि इतर कोणालाही, कोणतीही हानी झाली नाही. कोरोनामुळे प्रशासन जारी करीत असलेले निर्बंध आपल्या स्वातंत्र्यावर, परंपरेवर बंधने घालीत आहे, ही भावना काही तरुणांमध्ये निर्माण झाली अन्‌ त्यातून असा उद्रेक घडला असावा. त्यावर संवाद हाच उपाय आहे. नांदेडच्या दुर्घटनेतून आम्ही काय शिकले पाहिजे? ही वेळ एकमेकांना साथ देण्याची आहे. जात-धर्म-पंथ, पक्ष या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्याची अतिशय गरज आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. साचलेपण आले आहे. त्याला वाट मोकळी करून देणारे सण-उत्सव यावरही बंधने आहेत. त्यातूनच एकमेकांवर चालून जाण्याची वृत्ती वाढीला लागत आहे. नांदेडच्या दुर्घटनेचा संबंध धर्म आणि धार्मिकतेशी तसूभरही नाही. उद्रेकाची भावना हा सामाजिक प्रश्न आहे आणि तो सर्व समाजघटकांमध्ये आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. आता त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, हा सर्वांत महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षाचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुण पिढीची समाजाला गरज आहे. 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस